AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांनो सतर्क राहा, राज्यात पुन्हा पावसाचे संकट

नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, नवापूर तालुक्यात वादळवाऱ्यासह पाऊस पडला. या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेत पिकांचे नुकसान झाला आहे.

शेतकऱ्यांनो सतर्क राहा,  राज्यात पुन्हा पावसाचे संकट
राज्यात पावसाचा अंदाजImage Credit source: social media
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Mar 14, 2023 | 10:02 AM
Share

पुणे : राज्यात फेब्रुवारी महिना सर्वात हॉट ठरला होता. १९०१ नंतर आतापर्यंतचा सर्वात उष्ण फेब्रुवारी महिना राहिला होता. फेब्रुवारी महिन्यातील सरासरी तापमान २९.५ अंश सेल्सियसवर गेले होते. १९०१ नंतर हे सर्वाधिक सरासरी तापमान होते. यामुळे यंदा मार्चमध्येही तापमानाचा नवा विक्रम होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्याची सुरुवात पावसाने झाली. आता पुढील चार दिवस पुन्हा राज्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

पुणे, नाशिक, नगर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, धुळे आणि जालन्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाने यांनी १४ ते १८ मार्चसाठी हा इशारा दिला आहे. त्यानुसार, १४ ते १८ मार्च दरम्यान महाराष्ट्राच्या काही भागांत काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी, हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज आहे.

नंदुरबारमध्ये पाऊस

नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, नवापूर तालुक्यात वादळवाऱ्यासह पाऊस पडला. या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेत पिकांचे नुकसान झाला आहे. नवापूर तालुक्यातील करंजाळी गावात नारळाचा झाडावर वीज पडल्याने झाड जळाले आहे. सोमवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास नवापूर तालुक्यात जोरदार वारा आणि विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊसाला सुरवात झाली.

शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी

राज्यात पाऊस पडणार आहे, ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणी झाली की लागलीच पिकांची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करणे गरजेचे आहे. शेतीमालाची सुरक्षा ही महत्वाची आहे. शिवाय या वातावरणामुळे शेतातील पिकांवर रोगराई पसरण्याचा धोका आहे. शेतातील काढणीआणि लागलीच मळणी कामे उरकून घेण्याचा सल्ला कृषितज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.

‘ला-नीना’ निरोप

सलग तीन वर्षे चांगला मान्सून दिल्यानंतर ‘ला-नीना’ निरोप घेतला. यामुळे भारतातील मान्सूनला आता अल निनोचा धोका आहे. त्यामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल. मे ते जुलैदरम्यान ‘अल-नीनो’ची स्थिती राहू शकते. याच काळात जूनमध्ये मॉन्सून दाखल होतो. जून ते ऑगस्ट दरम्यान अल निनो सक्रिय असू शकते. जून ते सप्टेंबर हा काळ पावसाळ्याचा असतो. अमेरिकेच्या हवामान विभाग नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (NOAA) ने दिलेल्या अहवालात हा इशारा दिला आहे. आता पुढील तीन महिने मध्य फेब्रुवारी ते मध्य एप्रिलदरम्यान एनसो-न्यूट्रल स्थिती राहण्याची शक्यता आहे.

अल निनोचा भारतातील मान्सूनच्या पावसावर थेट परिणाम होणार असल्याचे NOAAने म्हटले आहे. सलग दुसऱ्या महिन्यात अल निनोबाबत अमेरिकेच्या हवामान संस्थेने हा अंदाज वर्तवला आहे. यापूर्वी जानेवारीमध्येही एजन्सीने असाच अंदाज व्यक्त केला होता. मात्र, जानेवारीच्या अहवालात जुलैनंतर अल निनोची स्थिती निर्माण होईल, असे म्हटले होते.

Follow Us
ओमराजेंच्या निर्णयावर 5 खासदारांचे भविष्य, तर ठाकरे गटाची मनधरणी सुरूच
Omraje Nimbalkar | ओमराजेंच्या एका निर्णयावर 5 खासदारांचे भविष्य, रोखण्यासाठी ठाकरे गटाची मनधरणी सुरूच
घरात बसून पक्ष वाढत नाही तर...; गिरीष महाजनांचा उद्धव ठाकरेंना टोला
घरात बसून पक्ष वाढत नाही तर...; गिरीष महाजनांचा उद्धव ठाकरेंना टोला
शिंदे हे अमित शाहांचे टेस्ट ट्यूब बेबी; संजय राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut UNCUT | शिंदे हे अमित शाहांचे टेस्ट ट्यूब बेबी; संजय राऊतांचा हल्लाबोल
15 कोटी घेतलेत, विकासाच्या गप्पा मारू नका! राऊतांचा मोठा खुलासा
Sanjay Raut | 15 कोटी घेतलेत, विकासाच्या गप्पा मारू नका! राऊतांचा मोठा खुलासा
राष्ट्रवादीला मोठा धक्का! बडा नेता भाजपच्या वाटेवर....
मोठी बातमी! राष्ट्रवादीला मोठा धक्का! बडा नेता भाजपच्या वाटेवर; तेव्हा गेलो असतो तर..म्हणत व्यक्त केली खंत
ठाकरे की शिंदे? आज ठरणार ओमराजेंचा राजकीय मार्ग! काही तासांत....
ठाकरे की शिंदे? आज ठरणार ओमराजेंचा राजकीय मार्ग! काही तासांत मोठा निर्णय
अखेर मुंबईत पावसाची हजेरी! पहाटेपासून रिमझिम सरी, मुंबईकर सुखावले
Mumbai Rain Update | अखेर मुंबईत पावसाने लावली हजेरी! पहाटेपासून रिमझिम सरी, मुंबईकर सुखावले
6 खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय; आराखडा तयार आता फक्त.
Uddhav Thackeray | विश्वासू खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय; आराखडा तयार आता फक्त...
रेवती सुळेंच्या लग्नाला शरद पवार व्हीलचेअरवरून हजर, सुनेत्रा पवारांचीह
रेवती सुळेंच्या लग्नाला शरद पवार व्हीलचेअरवरून हजर, सुनेत्रा पवारांचीही उपस्थिती
कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याने खळबळ; माजी नगरसेवकांसह 7 जणांवर गुन्हा
kalyan | कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याने खळबळ; माजी नगरसेवकांसह 7 जणांवर गुन्हा