AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांनो सतर्क राहा, राज्यात पुन्हा पावसाचे संकट

नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, नवापूर तालुक्यात वादळवाऱ्यासह पाऊस पडला. या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेत पिकांचे नुकसान झाला आहे.

शेतकऱ्यांनो सतर्क राहा,  राज्यात पुन्हा पावसाचे संकट
राज्यात पावसाचा अंदाजImage Credit source: social media
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Mar 14, 2023 | 10:02 AM
Share

पुणे : राज्यात फेब्रुवारी महिना सर्वात हॉट ठरला होता. १९०१ नंतर आतापर्यंतचा सर्वात उष्ण फेब्रुवारी महिना राहिला होता. फेब्रुवारी महिन्यातील सरासरी तापमान २९.५ अंश सेल्सियसवर गेले होते. १९०१ नंतर हे सर्वाधिक सरासरी तापमान होते. यामुळे यंदा मार्चमध्येही तापमानाचा नवा विक्रम होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्याची सुरुवात पावसाने झाली. आता पुढील चार दिवस पुन्हा राज्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

पुणे, नाशिक, नगर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, धुळे आणि जालन्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाने यांनी १४ ते १८ मार्चसाठी हा इशारा दिला आहे. त्यानुसार, १४ ते १८ मार्च दरम्यान महाराष्ट्राच्या काही भागांत काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी, हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज आहे.

नंदुरबारमध्ये पाऊस

नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, नवापूर तालुक्यात वादळवाऱ्यासह पाऊस पडला. या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेत पिकांचे नुकसान झाला आहे. नवापूर तालुक्यातील करंजाळी गावात नारळाचा झाडावर वीज पडल्याने झाड जळाले आहे. सोमवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास नवापूर तालुक्यात जोरदार वारा आणि विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊसाला सुरवात झाली.

शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी

राज्यात पाऊस पडणार आहे, ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणी झाली की लागलीच पिकांची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करणे गरजेचे आहे. शेतीमालाची सुरक्षा ही महत्वाची आहे. शिवाय या वातावरणामुळे शेतातील पिकांवर रोगराई पसरण्याचा धोका आहे. शेतातील काढणीआणि लागलीच मळणी कामे उरकून घेण्याचा सल्ला कृषितज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.

‘ला-नीना’ निरोप

सलग तीन वर्षे चांगला मान्सून दिल्यानंतर ‘ला-नीना’ निरोप घेतला. यामुळे भारतातील मान्सूनला आता अल निनोचा धोका आहे. त्यामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल. मे ते जुलैदरम्यान ‘अल-नीनो’ची स्थिती राहू शकते. याच काळात जूनमध्ये मॉन्सून दाखल होतो. जून ते ऑगस्ट दरम्यान अल निनो सक्रिय असू शकते. जून ते सप्टेंबर हा काळ पावसाळ्याचा असतो. अमेरिकेच्या हवामान विभाग नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (NOAA) ने दिलेल्या अहवालात हा इशारा दिला आहे. आता पुढील तीन महिने मध्य फेब्रुवारी ते मध्य एप्रिलदरम्यान एनसो-न्यूट्रल स्थिती राहण्याची शक्यता आहे.

अल निनोचा भारतातील मान्सूनच्या पावसावर थेट परिणाम होणार असल्याचे NOAAने म्हटले आहे. सलग दुसऱ्या महिन्यात अल निनोबाबत अमेरिकेच्या हवामान संस्थेने हा अंदाज वर्तवला आहे. यापूर्वी जानेवारीमध्येही एजन्सीने असाच अंदाज व्यक्त केला होता. मात्र, जानेवारीच्या अहवालात जुलैनंतर अल निनोची स्थिती निर्माण होईल, असे म्हटले होते.

Follow Us
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्..
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्...हादरवून टाकणारं प्रकरण समोर!
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, 'माझं...
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, “माझं रक्तच तसं नाही जे कोणी...
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; 1.1 कोटींची गुंतवणूक
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; सिंगापूर करणार 1.1 कोटींची गुंतवणूक अन्...
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट,
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट, पहा नेमकं काय काय म्हणाले?
राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक...
मोठी बातमी! राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची चौकशी होणार
गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना....
Gunratna Sadavarte | पळा, पळा, पळा अरे...जरांगेंचा काळ...गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना गाण्यातून डिवचलं
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा कारभारावर साधू-महंत नाराज? अचानक... कारण काय?
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा कारभारावर साधू-महंत नाराज? अचानक... नेमकं काय घडलं?
FCRA बिलावर सुप्रिया सुळे आक्रमक; आमच्यावर लादू नका, आधी चर्चा करा!
FCRA बिलावर सुप्रिया सुळे आक्रमक; आमच्यावर लादू नका, आधी चर्चा करा! सरकारला थेट आवाहन
मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मराठ्यांच्या नोंदी रद्द...
Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मराठ्यांच्या नोंदी रद्द का करता? सरकारला थेट सवाल
शासकीय खुर्चीवर महिला उपध्यक्षांच्या जागेवर पती बसला अन्...
शासकीय खुर्चीवर महिला उपध्यक्षांच्या जागेवर पती बसला अन्...  चक्क धनंजय मुंडेंसमोर हे काय घडलं?