AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune rain : पुण्यात पावसाचा जोर राहणार कायम, ऑरेंज अलर्ट जारी करत हवामान विभागानं काय इशारा दिला? वाचा…

शहर आणि जिल्ह्याच्या लगतच्या घाट भागात गुरुवारपर्यंत मुसळधार पाऊस (24 तासांत 64.5 मि.मी. ते 115.4 मि.मी.) अतिवृष्टी (24 तासांत 115.5 मि.मी. ते 204.4 मि.मी. पाऊस) होण्याची दाट शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

Pune rain : पुण्यात पावसाचा जोर राहणार कायम, ऑरेंज अलर्ट जारी करत हवामान विभागानं काय इशारा दिला? वाचा...
धानोरी, पुणे येथे दाटून आलेले ढगImage Credit source: tv9
| Updated on: Sep 13, 2022 | 11:01 AM
Share

पुणे : पुणे शहरात आणखी 3 ते 4 दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे. आयएमडी येथील नेहा मदान यांनी याविषयी माहिती दिली आहे. शहरामध्ये बहुतांशी मध्यम (24 तासांत 15.5.5 मि.मी. ते 64.4 मि.मी.), घाट भागात (115.4 मि.मी. पर्यंत) तर काही ठिकाणी (204.4 मि.मी. पर्यंत) अतिवृष्टी (Heavy rain) होण्याची शक्यता आहे. दरम्यान, रविवारी अवघ्या काही तासांत सर्वाधिक पावसाची नोंद मगरपट्टा येथे जवळपास 100.5 मिमी झाली आहे. हवामान खात्याने शहरात आणखी तीन-चार दिवस 11 सप्टेंबरच्या पावसाप्रमाणेच जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग पुणे येथील हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी (Anupam Kashyapi) यांनी सांगितले, की लोकांनी सावधगिरी बाळगावी. कारण शहरातील तसेच जिल्ह्यातील रस्ते निसरडे झाले आहेत. अनेक ठिकाणी चिखलदेखील झाला आहे.

‘मोकळ्या जागेत जाऊ नये’

शहर आणि जिल्ह्याच्या लगतच्या घाट भागात गुरुवारपर्यंत मुसळधार पाऊस (24 तासांत 64.5 मि.मी. ते 115.4 मि.मी.) अतिवृष्टी (24 तासांत 115.5 मि.मी. ते 204.4 मि.मी. पाऊस) होण्याची दाट शक्यता त्यांनी वर्तवली आहे. सैल ओल्या मातीमुळे रस्त्यालगतची झाडे उन्मळून पडू शकतात. काही क्षणात आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे फांद्या पडू शकतात. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटावेळी मोकळ्या जागेत जाऊ नये, झाडांखाली आसरा घेऊ नये, असे कश्यपी म्हणाले.

पाणी तुंबणार?

सखल भागात येत्या तीन-चार दिवसांत पाणी तुंबण्याचा, तात्पुरता पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. लगतच्या डोंगराळ भागात दरड कोसळण्याच्याही घटना घडू शकतात. लोकांनी घाट परिसरात जाणे टाळावे, कारण पुढील दोन-तीन दिवसांसाठी ‘ऑरेंज’ अलर्ट जारी करण्यात आला आहे, असे कश्यपी यांनी म्हटले आहे.

आर्द्र वातावरण

अरबी समुद्रातून येणारे जोरदार पश्‍चिमी वारे तसेच बंगालच्या उपसागरातून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे पुण्यासह महाराष्ट्राच्या काही भागांत आर्द्रता निर्माण झाली आहे. दरम्यान, सोमवारी दिवसाचे तापमान शिवाजीनगर आणि मगरपट्टासह पुण्यातील काही ठिकाणी जवळपास 30 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक होते. सोमवारी संध्याकाळी सॅटेलाइट इमेजेसमध्ये पुणे जिल्हा आणि शहराजवळ काळे ढग दाटून आले होते. आयएमडीच्या आकडेवारीनुसार रविवारी, मगरपट्टा येथे अवघ्या काही तासांत सर्वाधिक 100.5 मिमी पावसाची नोंद झाली, तर पाषाणमध्ये 74 मिमी, लोहगाव 66.4 मिमी, शिवाजीनगरमध्ये 38.7 मिमी आणि चिंचवडमध्ये 9.5 मिमी पावसाची नोंद झाली.

Follow Us
बारामती-राहुरी पोटनिवडणूक एक्झिट पोल; नेमकं कोण जिंकणार?
बारामती-राहुरी पोटनिवडणूक एक्झिट पोल; नेमकं कोण जिंकणार?.
पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराची चाहूल; ममता बॅनर्जींचा गड धोक्यात.....
पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराची चाहूल; ममता बॅनर्जींचा गड धोक्यात......
तामिळनाडूत सत्तांतर नाही?; पिपल्स इन्साईटच्या एक्झिट पोलनुसार DMK....
तामिळनाडूत सत्तांतर नाही?; पिपल्स इन्साईटच्या एक्झिट पोलनुसार DMK.....
केरळमध्ये काँग्रेसची सत्ता? बंगालमध्ये ममता दीदींना धक्का!
केरळमध्ये काँग्रेसची सत्ता? बंगालमध्ये ममता दीदींना धक्का!.
ममता बॅनर्जींना जबर धक्का? पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाची सत्ता?
ममता बॅनर्जींना जबर धक्का? पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाची सत्ता?.
पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान, आता नेमकी कोणाची सत्ता येणार?
पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान, आता नेमकी कोणाची सत्ता येणार?.
उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने मविआत नाराजी, भाजप या नाराजीचा घेणार फायद
उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने मविआत नाराजी, भाजप या नाराजीचा घेणार फायद.
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर..
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर...
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम.
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास...
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास....