AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune rain : मुसळधार पावसानंतर पुण्याची दैना! ठिकठिकाणी पाणीच पाणी, वाहतूककोंडी अन् बरंच काही…

खेड तालुक्याच्या पूर्व भागातील वरुडे, गाडकवाडी पाबळ केंदुर परिसरात पाऊसाचा जोर वाढल्याने वेळनदीला महापूर आला आहे. अशातच नदीपात्रातील केटीवेअर बंधारा फुटल्याने सर्वत्र पाणी झाले आहे.

Pune rain : मुसळधार पावसानंतर पुण्याची दैना! ठिकठिकाणी पाणीच पाणी, वाहतूककोंडी अन् बरंच काही...
पावसामुळे दुकानांमध्ये शिरलेले पाणी तसेच झाड कोसळण्याच्या घटनाImage Credit source: tv9
| Updated on: Sep 12, 2022 | 10:17 AM
Share

पुणे : पुणे शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy rain) अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या आहेत. काल पुण्यात मुसळधार पाऊस झाला. संध्याकाळच्या वेळी दाट ढग दाटून आले. त्यानंतर झालेल्या पावसाने पुणेकरांना झोडपले. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली, गैरसोय झाली. कारण पावसानंतर मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी पाणी साचले त्याचबरोबर वाहतूककोंडीलाही (Traffic jam) सामोरे जावे लागले. काही ठिकाणी तर अक्षरश: दुचाकीदेखील वाहून गेल्याचे प्रकार घडले. पाषाण, पंचवटी, स्टेट बँक नगर येथे पहाटे दोन चारचाकी वाहनांवर झाड (Tree collapsed) कोसळले. अग्निशामन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि हे झाड बाजूला करण्यात आले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. तिकडे हडपसरमधील भाजी मंडईत पाणीच पाणी झालेले पाहायला मिळाले. गुडघाभर पाणी साचल्याने मंत्री मार्केटमधील विक्रेत्यांचे हाल झाले.

लोहगावातील परिस्थिती

लोहगाव-वाघोली मुख्य रोड दादाची वस्तीजवळ अद्याप रस्त्यावर पाणी साचून आहे. शाळकरी मुले, दुचाकीवरील महिला, पादचारी यांना पाण्यातून वाट काढत ये जा करावे लागत आहे. साचलेल्या पाण्यात खड्डा तयार झाल्याने दुचाकीवरील महिला आपल्या लहान बाळाला घेऊन जाताना तिची दुचाकी गाडी खड्ड्यात बंद पडली. मागून कारमधून आलेल्या एका व्यक्तीने तीला गाडीतून उतरून मदत केली. याच पाण्यात गेल्या महिन्यात एका तरुणाला जीव गमावावा लागला होता. तरीदेखील महापालिकेने अद्याप उपाय योजना केली नसल्याने नागरिक तीव्र असंतोष व्यक्त करत आहेत.

आंबेगावात पूर

आंबेगाव तालुक्यातील पारगाव धामणी रोडवर पुलावरून पाणी जात असताना दुचाकीवरून पाण्याच्या प्रवाहातून जात असताना पाण्याचा जोर वाढल्याने दुचाकीस्वार दुचाकीस वाहून जात असताना स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे थोडक्यात बचावला. त्यामुळे सर्वत्र पावसाचा जोर कायम असताना नागरिकांना धोकादायक पाण्यातून प्रवास करणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

खेडच्या वेळनदीला पूर

खेड तालुक्याच्या पूर्व भागातील वरुडे, गाडकवाडी पाबळ केंदुर परिसरात पावसाचा जोर वाढल्याने वेळनदीला महापूर आला आहे. अशातच नदीपात्रातील केटीवेअर बंधारा फुटल्याने सर्वत्र पाणी झाले असून पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

वेळनदीला आला महापूर

मावळात धुके

लोणावळा परिसरात पाऊस थांबल्यानंतर सकाळच्या वेळी धुके मोठ्या प्रमाणावर पसरले. लोणावळ्यातील अंडा पॉइंट येथील परिसर धुक्यात हरवून गेला होता. या धुक्यामुळे वाहन चालकांना मात्र मोठी कसरत करावी लागली.

Follow Us
बारामती-राहुरी पोटनिवडणूक एक्झिट पोल; नेमकं कोण जिंकणार?
बारामती-राहुरी पोटनिवडणूक एक्झिट पोल; नेमकं कोण जिंकणार?.
पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराची चाहूल; ममता बॅनर्जींचा गड धोक्यात.....
पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराची चाहूल; ममता बॅनर्जींचा गड धोक्यात......
तामिळनाडूत सत्तांतर नाही?; पिपल्स इन्साईटच्या एक्झिट पोलनुसार DMK....
तामिळनाडूत सत्तांतर नाही?; पिपल्स इन्साईटच्या एक्झिट पोलनुसार DMK.....
केरळमध्ये काँग्रेसची सत्ता? बंगालमध्ये ममता दीदींना धक्का!
केरळमध्ये काँग्रेसची सत्ता? बंगालमध्ये ममता दीदींना धक्का!.
ममता बॅनर्जींना जबर धक्का? पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाची सत्ता?
ममता बॅनर्जींना जबर धक्का? पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाची सत्ता?.
पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान, आता नेमकी कोणाची सत्ता येणार?
पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान, आता नेमकी कोणाची सत्ता येणार?.
उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने मविआत नाराजी, भाजप या नाराजीचा घेणार फायद
उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने मविआत नाराजी, भाजप या नाराजीचा घेणार फायद.
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर..
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर...
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम.
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास...
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास....