AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आघाडी सरकार आपल्याच ओझ्याने पडणार, फक्त वेळेचा प्रश्न आहे; राधाकृष्ण विखे-पाटलांचं भाकीत

राज्यातील आघाडी सरकार जास्त दिवस चालणार नाही. हे सरकार आपल्याच ओझ्याने पडणार असून फक्त वेळेचा प्रश्न आहे, असं भाकीत भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केलं आहे. (radhakrishna vikhe patil)

आघाडी सरकार आपल्याच ओझ्याने पडणार, फक्त वेळेचा प्रश्न आहे; राधाकृष्ण विखे-पाटलांचं भाकीत
radhakrishna vikhe patil
| Edited By: | Updated on: Jul 01, 2021 | 3:22 PM
Share

पुणे: राज्यातील आघाडी सरकार जास्त दिवस चालणार नाही. हे सरकार आपल्याच ओझ्याने पडणार असून फक्त वेळेचा प्रश्न आहे, असं भाकीत भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे सरकार पडण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. (Maharashtra govt will fall due to its own burden: radhakrishna vikhe patil)

पुण्यात मीडियाशी संवाद साधताना राधाकृष्ण विखे-पाटील यांनी हे भाकीत केलं. राज्यातील आघाडी सरकार विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला घाबरत आहे. त्यांचा आपल्या आमदारांवर विश्वास नाही, असं सांगतानाच विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवार देण्याबाबत भाजप निर्णय घेईल, असं विखे-पाटील यांनी स्पष्ट केलं.

पुनर्विचार याचिका दाखल करणार

यावेळी त्यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आघाडी सरकारवर टीका केली. मराठा आरक्षणाबाबत हे सरकार गंभीर नाही. हे सरकार काही करेल असं वाटत नाही. त्यामुळे आता मीच सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे. त्याची तयारीही सुरू केली आहे, असं त्यांना सांगितलं. सरकारच्या अनास्थेमुळे मराठा समाजाचं आरक्षण गेलं. ओबीसी आरक्षणाचंही तेच झालं. त्यामुळे सरकार विरोधात वातावरण आहे. सरकारला हेच करायचं होतं का?, असा संतप्त सवालही त्यांनी केला.

ती तर फॅशन झालीय

मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या निर्णयानंतर सरकारने प्रायश्चित्त घ्यायला पाहिजे होते. त्यांनी याबाबत श्वेतपत्रिका काढायला हवी होती. मात्र, ते न करता सर्व काही केंद्र सरकारवर ढकलंत आहे. काहीही झालं की केंद्र सरकारवर ढकलायचं ही आता फॅशन झाली आहे. त्यामुळेच मी स्वत: पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे, असं ते म्हणाले.

मराठा-ओबीसी विद्यार्थ्यांची फी भरणार

सारथीला अभिमत विद्यापीठाचा दर्जा द्या, मराठा-ओबीसी विद्यार्थ्यांची 100 टक्के फी सरकारने भरावी, इतर शिक्षण संस्थाचालकांनीही त्यासाठी पुढे येण्याची गरज आहे, असं सांगतानाच माझ्या मतदारसंघातील जे विद्यार्थी प्रवरा शिक्षण संस्थेत अॅडमिशन घेतील त्या मराठा आणि ओबीसी विद्यार्थ्यांची फी मी स्वत: भरणार आहे, अशी घोषणा त्यांनी केली. तसेच ज्या नेत्यांच्या शिक्षण संस्था आहेत, त्यांनी अशा प्रकारचा शिक्षणाचा भार उचलावा, असं आवाहनही त्यांनी केलं. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्याचा त्यांनी निषेध नोंदवला. सरकारमधील लोकांकडे संयम असायला हवा, असा टोला त्यांनी लगावला. तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर होणाऱ्या कारवाईचं त्यांनी समर्थनच केलं. (Maharashtra govt will fall due to its own burden: radhakrishna vikhe patil)

संबंधित बातम्या:

मुख्यमंत्र्यांचं राज्यातील डॉक्टरांना खास पत्र, म्हणाले, ‘तु्मच्यामुळेच कोरोना लढ्याचा गोवर्धन पेलणं शक्य झालं!’

इतिहासात पहिल्यांदाच ‘राजभवन’मधून भाजप कार्यालय सुरू; नाना पटोलेंची खोचक टीका

बाळासाहेब थोरात म्हणाले, विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचाच, पवार म्हणतात, निवडणुकीबाबत तिन्ही पक्षांनी एकत्र निर्णय घ्यावा!

(Maharashtra govt will fall due to its own burden: radhakrishna vikhe patil)

Follow Us
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू...
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू....
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल.
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान.
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;.
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा...
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा....
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला.
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका...
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका....
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?.
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं...
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं....
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर..
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर...