AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Temperature : राज्यात पाऊस अन् तापमान वाढही, वाढत्या तापमानामुळे शासनाचा मोठा निर्णय

Maharashtra City-Wise Temperature / Heat Wave Today News : राज्यासह देशभरात तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. तापमान वाढत असताना अवकाळी पावसाचा फटकाही बसत आहे. पुढील ४८ तासांसाठी पुणे वेधशाळेने राज्यातील काही भागांत गारपीट होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

Maharashtra Temperature : राज्यात पाऊस अन् तापमान वाढही, वाढत्या तापमानामुळे शासनाचा मोठा निर्णय
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Apr 21, 2023 | 3:34 PM
Share

पुणे : महाराष्ट्रासह देशभरात उकाड्यामुळे नागरीक हैराण झाले आहेत. कधी कुठे पाऊस पडत आहे तर कधी ऊन प्रचंड तापले आहे. उष्माघाताचा त्रास लोकांना होत आहे. राज्यासह देशभरात तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. आता पुणे वेधशाळेने राज्यातील काही भागांत heat wave तर कुठे पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. विदर्भात गारपिटीसह पाऊस होणार आहे. दरम्यान वाढत्या तापमानामुळे शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील शाळांना सुटी जाहीर केली आहे. पुणे शहराचे तापमान वाढले आहे. पुण्यात गुरुवारी गारपीटही झाली होती.

काय आहे आयएमडीचा अंदाज

पुढील ४८ तासांत विदर्भातील यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गोंदीया आणि नागपूरसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी गारपीट होणार आहे. तर राज्यातील काही भागात तापमान वाढ होणार आहे. वाढत्या तापमानामुळे प्रशासकीय यंत्रणा देखिल सज्ज झाली आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर उपचारांची दिशा, औषधांची उपलब्धता, याबाबत शासनातर्फे जिल्हा शल्यचिकित्सक तसेच जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांना देण्यात आल्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

शाळांना सुटी

राज्यातील सर्व शाळांना २१ एप्रिलपासून सुट्टी जाहीर केली आहे. वाढत्या तापमानामुळे शासनाने हा निर्णय घेतला आहे. राज्यात वाढती उष्णतेची लाट पाहता शाळांना सुट्टी देण्याचे राज्य शासनाचे आदेश दिले आहे. विदर्भ वगळता इतर ठिकाणी आता सरळ 15 जूनला शाळा सुरू होणार आहे. तर विदर्भात 30 जूनला शाळा सुरू होणार आहे. राज्य शासनाने याबाबत आदेश काढला आहे.

कुठे किती आहे तापमान

Maharashtra temperature on 20th April 2023
शहर तापमान
जळगाव 41.7
सातारा 37.6
मुंबई 37.3
ठाणे 38
सोलापूर 41.1
परभ़णी 40
सांगली 38.6
बीड 39.7
बारामती 38.7
धारा़शीव 39.8
मालेगाव 42
जालना 39.8
नांदेड 38.2
पुणे 38.4

उष्णघातापासून अशी घ्या काळजी

उष्णता टाळायची असेल तर भरपूर पाणी प्या. कारण उन्हाळ्याच्या ऋतूत उन्हात चालल्याने खूप घाम येतो, ज्यामुळे आपल्या शरीरात पाण्याची कमतरता भासते. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी, ज्यूस, नारळपाणी, लिंबूपाणी यांचे सेवन करावे. त्याचबरोबर जर तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या असेल तर तुम्हाला चक्कर येणे, थकवा येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

जास्त वेळ बाहेर राहू नका

उन्हात बाहेर फिरण्यामुळे उष्माघात होऊ शकतो. त्यामुळे गरज नसेल तर बाहेर पडू नका. उन्हात जाताना कॅप, ओढणी, रुमालाच्या मदतीने शरीर झाकून ठेवा.

आरामदायी कपडे घाला

उन्हाळ्यात बाहेर गेल्यास आरामदायी कपडे घालावेत. कारण गडद रंगाचे कपडे जास्त उष्णता घेतात. त्यामुळे उन्हाळ्यात नेहमी हलके आणि सैल कपडे परिधान करा.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.