AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PUNE-Mumbai : पुणे आणि मुंबई प्रवास फक्त २५ मिनिटांत शक्य, कसा होणार वाचा

पुणे आणि मुंबई प्रवास फक्त २५ मिनिटांत करता येणार आहे. पुणे आणि मुंबई हवाईमार्ग सुरु करण्यासंदर्भात हालचाली सुरु झाल्या आहे. यासाठी एअर इंडिया आणि इंडिगो या दोन कंपन्यांनी तयारी दर्शवली आहे. मुंबई विमानतळावर स्लॉट मिळणे अवघड आहे.

PUNE-Mumbai : पुणे आणि मुंबई प्रवास फक्त २५ मिनिटांत शक्य, कसा होणार वाचा
Airlines offerImage Credit source: Social Media
| Updated on: Jan 12, 2023 | 11:52 AM
Share

पुणे  : मुंबई-पुणे (PUNE-Mumbai)नियमित प्रवास करणारे अनेक जण आहेत. त्यांना रेल्वे व रस्ते मार्गाने तीन ते चार तासांचा प्रवास करावा लागतो. मात्र आता हा प्रवासाचा वेळ कमी होणार आहे. पुणे आणि मुंबई प्रवास फक्त २५ मिनिटांत करता येणार आहे. पुणे आणि मुंबई हवाईमार्ग सुरु करण्यासंदर्भात हालचाली सुरु झाल्या आहे. यासाठी एअर इंडिया आणि इंडिगो या दोन कंपन्यांनी तयारी दर्शवली आहे. मुंबई विमानतळावर स्लॉट मिळणे अवघड असल्याने दिवसातून एकतरी विमान सुरु करावे, यासाठी प्रयत्न सुरु आहे. यासंदर्भात विमानतळ प्राधिकरणाकडेही प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

पुणे-मुंबई हवाई मार्ग सुरु झाल्यास रस्ते वाहतुकीला आणखी एक जलद पर्याय मिळणार आहे. त्यामुळे वेळेत बचत होणार आहे. तसेच प्रवाशांना मुंबई विमानतळावरुनच आंतराराष्ट्री प्रवास करता येणार आहे.

२००८ मध्ये सुरु होती सेवा : पुणे-मुंबई विमानसेवा २००८ मध्ये सुरु होती. या सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसादही मिळाला होता. त्यानंतर २०१७ मध्ये जेट एअरवेजने पुणे-मुंबई विमानसेवा सुरु केली. मात्र ही सेवाही काही कारणांमुळे बंद झाली. त्यानंतर विमानसेवा सुरु करण्याच्या चर्चा झाल्या. परंतु ठोस काहीच भूमिका घेतली गेली नाही.

काय होणार फायदा : पुण्यातील लोहगाव विमानतळावरून देशांतर्गत सेवा वाढली आहे. पुण्यातून परदेशात दुबई, सिंगापूर आणि बँकॉक या ठिकाणी विमानसेवा सुरू आहे. परंतु पुण्यातून इतर देशांसाठी विमानसेवा नाही. पुणे-मुंबई विमानसेवा सुरु झाल्यास इतर देशांमध्ये जाण्यास या प्रवाशांना फायदा होणार आहे.

हायपरलूपची होती चर्चा : मुंबई-पुणे हायपरलूप मार्ग मुंबई-पुणे महामार्गावरुनच समांतर जाईल. हायपरलुप वाहतूक सध्याची आधुनिक प्रकारातील वाहतूक मानली जाते. याद्वारे कमीत कमी वेळात प्रवाशांना एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी पोहचता येते. ही वाहतूक विशेष अशा हायपरलुप वाहनातून कमी दाबाच्या ट्युबमध्ये वीजेच्या वेगाप्रमाणे होते. हे वाहन चुंबकीय क्षेत्राचा उपयोग करुन ट्रॅकच्या वर तरंगत प्रवास करते.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.