AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Ajit Pawar : माझं बोलणं काहींना झोंबत असेल, तर त्याला माझा नाईलाज; पुण्यातल्या वरूणराज भिडे पुरस्कार सोहळ्यात अजित पवारांची फटकेबाजी

मला थेट तोंडावर बोलायची सवय आहे. माझे बोलणे काही लोकांना झोंबत असेल, तर त्याला माझा नाईलाज आहे, असे अजित पवार यावेळी म्हणाले. तर प्रत्यकाने बोलताना भान ठेवले पाहिजे, असे म्हणत अमोल मिटकरी यांना पुन्हा एकदा अप्रत्यक्ष टोला त्यांनी लगावला आहे.

Pune Ajit Pawar : माझं बोलणं काहींना झोंबत असेल, तर त्याला माझा नाईलाज; पुण्यातल्या वरूणराज भिडे पुरस्कार सोहळ्यात अजित पवारांची फटकेबाजी
पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवारImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: May 01, 2022 | 11:43 AM
Share

पुणे : पत्रकार आणि राजकारणी यांचे नाते हे एकमेकांना पूरक असते. दोघांची पाठ फिरली की ते कसा उद्धार करतात, हे आम्हाला माहीत आहे, अशी फटकेबाजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. ज्येष्ठ पत्रकार वरूणराज भिडे स्मृती पुरस्कार वितरण सोहळा पुण्यात (Pune) पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, की महाराष्ट्राच्या इतिहासात पत्रकारितेचे मोलाचे योगदान आहे. जे काम करतात ते चुकत असतात, जे कामच करत नाहीत, ते चुकणार कसे, असा सवाल त्यांनी केला. माध्यमांच्या (Media) बदलत्या स्वरुपावर ते म्हणाले, की कुणी काय दाखवावे हे ज्याचा त्याचा अधिकार आहे. काही वर्षांपासून मीडियाचे स्वरूप बदलत आहे. हे बदलते स्वरूप थक्क करणारे आहे. तर चार-दोन वर्षे काम केले, की लगेच त्याला ज्येष्ठ पत्रकार म्हटले पाहिजे, असे अनेकांना वाटते, असा टोला यावेळी अजित पवारांनी पत्रकारांना लगावला.

नोंद करण्यासारखी परिस्थिती

आताची जी परिस्थिती देशात आणि राज्यात निर्माण झाली आहे, त्याची नोंद घेतली पाहिजे, असे ते पत्रकारांना म्हणाले. सोशल मीडियावर बोलताना ते म्हणाले, की सोशल मीडियामुळे सेकंद सेकंदाची माहिती मिळत असते. भारतात 53 कोटी व्हाट्सअॅप वापरकर्ते आहेत. या आकडेवारीवरून सोशल मीडियाची ताकद कळते. सोशल मीडिया हे दुधारी हत्यार आहे. सोशल मीडियाला कायद्याच्या चौकटीत बसवणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. यामध्ये मोठा धोका निर्माण झाले आहे. त्यामुळे हे वापरताना भान जपले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला. सोशल मीडियाकडे एक नजर टाकली, तर अभासी जगात काय खरे आणि काय खोटे काही कळत नाही, असेही ते म्हणाले.

‘अनावश्यक लोकांना प्रसिद्धी नको’

मला थेट तोंडावर बोलायची सवय आहे. माझे बोलणे काही लोकांना झोंबत असेल, तर त्याला माझा नाईलाज आहे, असे अजित पवार यावेळी म्हणाले. तर प्रत्यकाने बोलताना भान ठेवले पाहिजे, असे म्हणत अमोल मिटकरी यांना पुन्हा एकदा अप्रत्यक्ष टोला त्यांनी लगावला आहे. अनावश्यक लोकांना प्रसिद्धी देऊ नये, असे पत्रकारांना सांगत राज ठाकरे यांच्यासह भावनिक राजकारण करणाऱ्यांनाही अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.