AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MPSC उत्तीर्ण दर्शना पवार मृत्यू प्रकरणास धक्कादायक वळण, पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून मोठा खुलासा

Pune Darshana Pawar : पुणे येथील MPSC परीक्षा पास उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार हिचा मृत्यूबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून ही माहिती आली आहे. यामुळे या प्रकरणास वेगळेच वळण मिळाले आहे.

MPSC उत्तीर्ण दर्शना पवार मृत्यू प्रकरणास धक्कादायक वळण, पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून मोठा खुलासा
darshana pawar
| Updated on: Jun 20, 2023 | 9:18 AM
Share

पुणे : पुण्याच्या वेल्हा तालुक्यातील राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी रविवारी सकाळी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार हिचा मृतदेह सापडला. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. त्याची ओळख पटवणे अवघड जात होते. या प्रकरणात पोलिसांनी घातपाताची शक्यता व्यक्त केली होती. या मुलीसोबत असलेला तरुणीही बेपत्ता आहे. या प्रकारात पोस्टमॉर्टमचा अहवाल आला आहे. त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

काय आहे अहवालात

रविवारी दर्शना पवार हिचा मृतदेह सापडल्यानंतर त्याचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. या पोस्टमॉर्टम रिपोर्टचा अहवाल समोर आला आहे. त्यातून धक्कादायक माहिती मिळाली आहे. दर्शना पवार हिचा मृत्यू सामान्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तिच्या डोक्यावर आणि शरीरावर जखमा आढळल्या आहे. यामुळेच तिचा मृत्यू झाला असल्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये स्पष्ट केले आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट येतात पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या खून प्रकरणात दर्शनाच्या मित्रावर संशयाची सूई जात आहे. तो दर्शनासोबत होता. परंतु अजूनही बेपत्ता आहे.

पोलिसांनी केली पाच पथके

दर्शनाचा खून झाल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी 5 पथके तयार केली आहेत. दर्शनाचा मित्र राहुल दत्तात्रय हांडोरे याच्या शोधासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची पथके रवाना झाली आहे. दर्शना ९ जून रोजी पुण्यातील सत्काराच्या कार्यक्रमासाठी स्पॉट लाईट ॲकॅडमी येथे आली होती. ११ जून सायंकाळी चार वाजेपर्यंत घरच्या मंडळीच्या संपर्कात होती. मात्र १२ रोजी दर्शनाने फोन उचलले नाहीत. यामुळे कुटुंबियांनी स्पॉट लाईट ॲकॅडमी येथे येऊन तिची चौकशी केली. त्यावेळी सांगण्यात आले की, दर्शना ही त्याचा मित्र राहुल दत्तात्रय हांडोरे हिच्यासोबत सिंहगड आणि राजगड याठिकाणी फिरण्यासाठी गेली आहे. मात्र हे दोघेही संपर्कात नाहीत.

रविवारी सापडला मृतदेह

पुण्याच्या वेल्हा तालुक्यातील किल्ले राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी रविवारी १८ जून रोजी दर्शना दत्तू पवार हिचा मृतदेह सापडला. रविवारी सकाळी राजगडच्या पायथ्याशी हा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. परंतु दर्शनाचा मित्र राहुल संपर्कात अजूनही नाही किंवा त्याचा पत्ताही लागला नाही.

राहुल आहे तरी कुठे

दर्शना आणि राहुल दोघेही 12 जूनला साधारण 8 वाजून 15 मिनिटांनी गडाच्या पायथ्याशी पोहचले. त्यानंतर दोघांनीही गड चढायला सुरुवात केली. हे सर्व CCTV फुटेजमध्ये दिसले. फुटेजमध्ये दोघेही राजगडावर जाताना दिसत आहेत. मात्र त्यानंतर 10 वाजताच्या सुमारास राहुल एकटाच परत आला. त्याचे मोबाइलचं लोकेशन परराज्यात दिसत आहे. त्यानंतर तो बेपत्ता आहे? राहुल नेमका कुठे आहे? याचा शोध पोलीस घेत आहेत.

हे ही वाचा

पुण्यातून आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या MPSC उत्तीर्ण विद्यार्थीनीचा गुढ मृत्यू

Follow Us
उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदेचा शेवटचा दिवस, एकनाथ शिंदेंकडून शुभेच्छा
उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदेचा शेवटचा दिवस, एकनाथ शिंदेंकडून शुभेच्छा.
भोंदूबाबाच्या संपत्तीबाबात फडणवीसांचा मोठा खुलासा, एकूण संपत्ती....
भोंदूबाबाच्या संपत्तीबाबात फडणवीसांचा मोठा खुलासा, एकूण संपत्ती.....
खरातकडून फोटो व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी
खरातकडून फोटो व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी.
5 नरबळी, हरणाची शिकार, अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती
5 नरबळी, हरणाची शिकार, अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती.
भोंदूबाबा अशोक खरातच्या तपासाला वेग, सरकारी वकिलांची नियुक्ती
भोंदूबाबा अशोक खरातच्या तपासाला वेग, सरकारी वकिलांची नियुक्ती.
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या.
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष.
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार.
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले....
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले.....
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत.