AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे पोलीस दलात मोठा भूकंप, एका रात्रीत अनेकांच्या बदल्या, नेमकं काय घडलं?

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील ३२ कर्मचाऱ्यांची एकाच वेळी बदली करून पोलीस दलात खळबळ उडवून दिली आहे. अकार्यक्षमता आणि स्थानिक हितसंबंधांमुळे ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

पुणे पोलीस दलात मोठा भूकंप, एका रात्रीत अनेकांच्या बदल्या, नेमकं काय घडलं?
pune police
| Updated on: Feb 20, 2026 | 11:33 AM
Share

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील गुन्हेगारीत सातत्याने वाढ होत आहे. अनेक ठिकाणी चोरी, लूट, हत्या, अपहरण, अत्याचाराच्या घटनांना पेव फुटले आहे. त्यातच आता पुणे शहर पोलीस दलात गुरुवारी मोठी खळबळ उडाली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रशासकीय शिस्तीचा बडगा उगारला आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील तब्बल ३२ पोलीस कर्मचाऱ्यांची एकाच वेळी बदली करण्यात आली आहे. एकाच पोलीस ठाण्यातून इतक्या मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांची उचलबांगडी केल्याने संपूर्ण पोलीस दलात मोठा दणका बसला आहे.

नेमकी कारवाई काय?

पुणे पोलीस आयुक्तांनी प्रशासकीय शिस्तीचा बडगा उगारत ३२ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकृत आदेश जारी केले आहेत. या कारवाईमध्ये प्रामुख्याने ३ सहाय्यक पोलीस फौजदार (ASI), १० पोलीस हवालदार (HC) आणि १९ पोलीस अंमलदारांचा (PC) समावेश आहे. या सर्व कर्मचाऱ्यांची तातडीने पुणे विमानतळ आणि सिंहगड रोड पोलीस ठाण्यांत रवानगी करण्यात आली आहे. या बदल्यांचे कारण अधिकृत आदेशात प्रशासकीय असे नमूद करण्यात आले आहे. तरी पोलीस दलातील अंतर्गत वर्तुळात ही केवळ नियमित बदली नसून एक प्रकारची शिक्षात्मक कारवाई असल्याची चर्चा रंगली आहे. या ३२ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमागे काही अत्यंत गंभीर आणि महत्त्वाची कारणे समोर आली आहे.

कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये महत्त्वाची कारणं काय?

१. अनेक कर्मचारी आपला ५ वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतरही विविध वशिल्यांचा वापर करून लोणी काळभोरमध्येच ठाण मांडून बसले होते. २. काही कर्मचारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतच राहत होते. यामुळे त्यांचे स्थानिक गुन्हेगार आणि वाळू उपसा करणाऱ्या टोळ्यांशी जवळचे संबंध निर्माण झाल्याच्या तक्रारी वरिष्ठांकडे पोहोचल्या होत्या. ३. लोणी काळभोर परिसरात वाढती गुन्हेगारी, कोयता गँगचा धुमाकूळ आणि बेकायदेशीर धंद्यांवर वचक ठेवण्यात हे कर्मचारी अपयशी ठरल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. ४. पोलीस आयुक्तांनी गुप्तचर विभागाकडून घेतलेल्या गोपनीय अहवालात या कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.

पोलीस दलात मोठी चर्चा

अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यापासून झिरो टॉलरन्स (Zero Tolerance) धोरण अवलंबले आहे. लोणी काळभोरमधील या मास ट्रान्सफरमुळे शहरातील इतर पोलीस ठाण्यांतील आरामदायी खुर्ची उबवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. एकाच वेळी ३२ लोकांची बदली होणे म्हणजे पोलीस ठाणे अर्धे साफ झाल्यासारखेच आहे.

Follow Us
पहिला वार करायचा असेल तर माझ्यावर करा', लांडगेंना सुळेंचं थेट आव्हान
Supriya Sule on Mahesh Landge :पहिला वार करायचा असेल तर माझ्यावर करा', लांडगेंना सुळेंचं थेट आव्हान
CM फडणवीसांचा जेन-झींशी संवाद, क्रिकेटपटू तिलक वर्मासह 10 हजार...
Devendra Fadnavis : CM फडणवीसांचा जेन-झींशी संवाद, क्रिकेटपटू तिलक वर्मासह 10 हजारांहून अधिक तरुणांची उपस्थिती
भाजप आमदार संजय उपाध्याय यांची मोठी घोषणा! गणेशोत्सवासाठी कोकण...
भाजप आमदार संजय उपाध्याय यांची मोठी घोषणा! यंदाही गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना मोफत बससेवा
राष्ट्रवादीचा अखेरचा पत्ता उलगडणार? कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक
राष्ट्रावादी अखेरचा पत्ता उलगडणार? एकाच आठवड्यात सलग बैठका, विलिनिकरणाबाबत....
आयकर विभागाची मोठी कारवाई! 16 नामांकित कंपन्यावर गुन्हा दाखल
आयकर विभागाची मोठी कारवाई! तब्बल 2143 कोटी... 16 नामांकित कंपन्यावर गुन्हा दाखल
तुकाराम मुंढेंच्या भीतीने जुनी परंपरा मोडली! पुण्यातील सुप्रिसिद्ध...
तुकाराम मुंढेंच्या भीतीने जुनी परंपरा मोडली! बऱ्याच काळापासूनची पुण्यातील प्रसिद्ध खाऊगल्ली बंद?
'सातारा जिल्हा बँकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार' गोरेंचं विधान
सातारा जिल्हा बँकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार- जयकुमार गोरे
उत्पादन घट आणि वाहतूक खर्च वाढल्याने सुकामेवा महागला...
उत्पादन घट आणि वाहतूक खर्च वाढल्याने सुकामेवा महागला; बदाम, पिस्त्याच्या दरात ३०० रुपयांपर्यंत वाढ
भोरमध्ये पुणे ट्रान्समिशन थ्री प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचा रास्ता रोको
भोरमध्ये पुणे ट्रान्समिशन थ्री प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचा रास्ता रोको
मनोज जरांगे पाटील यांची जालन्यात 130 गावांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची जालन्यात 130 गावांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा