AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोना गेला खड्यात, पहिल्यांदा एफआरपीचे पैसे द्या, राजू शेट्टींची आक्रमक भूमिका

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी एफआरपीच्या मुद्यावर आक्रमक झाले आहेत. Raju Shetti sugarcane frp

कोरोना गेला खड्यात, पहिल्यांदा एफआरपीचे पैसे द्या, राजू शेट्टींची आक्रमक भूमिका
राजू शेट्टी
| Updated on: Mar 15, 2021 | 7:16 PM
Share

सांगली: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी एफआरपी आणि वीज बिलाच्या मुद्यावर आक्रमक झाले आहेत. कोरोना गेला खड्यात, पहिल्यांदा एफआरपीचे पैसे द्या अशी भूमिका येथून पुढे आम्ही घेणार, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. विधिमंडळाचं सर्व अधिवेशन अंबानी स्फोटक प्रकरणामध्ये गेले. बाकीचे प्रश्न नाहीत का, असा सवाल राजू शेट्टी यांनी केला आहे. ( Raju Shetti warning Maharashtra Government over sugarcane frp and electricity bill issue )

मी महाआघाडी मध्ये आहे म्हणून माझ्या आंदोलनाची दखल घेतली जात नाही असे नाही. या कोरोनाच्या काळात आम्ही शांत आहे. आता कोरोना गेला खड्यात पाहिले एफआरपीचे पैसे द्या, अशी भूमिका येथून पुढे स्वाभिमानी शेतकरी संघटना घेणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. ते सांगली मध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते.

सरकारला मंत्र्यांची दालन सजवायला पैसे

सरकारला मंत्र्याची दालन सजवायला पैसे आहेत आणि वीज ग्राहकाची वीज बिल माफ करायला यांच्याकडे पैसे नाहीत. यासाठी आम्हाला आता रस्स्यावर उतरवावे लागेल, असा इशारा ही शेट्टी यांनी दिला.विधिमंडळाचे अधिवेशन हे मुकेश अंबानी यांच्याघराजवळ सापडलेल्या स्फोटक प्रकरणावरुन गाजले गेले.महाराष्ट्रात दुसरे कोण राहत नाही का? शेतकऱ्याचे अनेक प्रश्न आहेत, वाढीव वीजबिल हे सर्व प्रश्न बाजूला राहिले, अशी टीका शेट्टी यांनी केली. जोपर्यंत सर्व सामान्य माणसामध्ये बदल होत नाही. तो पर्यंत हे बदलले जाणार नाही. सामान्य माणूस बोलला पाहिजे.तरच हे सर्व जण बदलतील, असेही शेट्टी म्हणाले.

वीज बिल प्रश्नी राज्यभर सर्वपक्षीय आंदोलन

लॉकडाऊन काळातील वीज बिल सरकारने माफ करावे ही मागणी आमची आजही ठाम आहे. 19 मार्चला महाराष्ट्रात पाहिल्यांदा शेतकऱ्यांची आत्महत्या झाली होती. त्यामुळे त्याच दिवशी राज्यभर आंदोलन केले जाणार आहे, असंही राजू शेट्टी यांनी सांगितलं. 19 मार्चच्या आंदोलनात सर्वसामान्य जनतेचा रोष दिसेल. सर्वसामान्यांमध्ये बीजबिलावरुन सरकारवर नाराजी आहे. सरकारने ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी, असंही राजू शेट्टी म्हणाले.

संबंधित बातम्या :

सरकारमध्ये दम असेल तर वीज बिलाचीसुली करुन दाखवावीच; राजू शेट्टींचे आव्हान

जे काही ठरलं असेल ते मला माहित नाही, वीजबिल वसुलीवर अजित पवारांचं उत्तर

( Raju Shetti warning Maharashtra Government over sugarcane frp and electricity bill issue )

अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार
अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार.
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला.
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg.
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार.
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत.
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?.
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?.
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान.
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा.
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला.