AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात तिसऱ्या आघाडीचा प्रयोग, 20 एप्रिल रोजी नव्या आघाडीवर शिक्कामोर्तब?

राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांचा २० एप्रिल रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्त बच्चू कडू मोठा निर्णय घेणार आहे. राष्ट्रीय समाज पक्षाने पुण्यात युवा संघर्ष निर्धार परिषद भरवली आहे. त्यावेळी महादेव जानकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मेळाव्याच आयोजन करण्यात आले आहे.

राज्यात तिसऱ्या आघाडीचा प्रयोग, 20 एप्रिल रोजी नव्या आघाडीवर शिक्कामोर्तब?
राजू शेट्टी, महादेव जानकर, बच्चू कडूImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Apr 17, 2025 | 8:19 AM
Share

महाराष्ट्राचे राजकारण युती आणि आघाडीवर सुरु झाले आहे. राज्यात शिवसेना-भाजप युती होती. त्यानंतर त्या युतीमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आल्यानंतर महायुती झाली. महायुतीला आव्हान देण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उबाठा आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी निर्माण झाली. विधानसभा निवडणुकीपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांना सोबत घेऊन तिसरी आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो यशस्वी झाला नाही. आता राज्यातील तीन बडे नेते राजू शेट्टी, बच्चू कडू आणि महादेव जानकर एकत्र येत आहे. त्या नेत्यांनी तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यावर येत्या २० एप्रिल रोजी शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांचा २० एप्रिल रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्त बच्चू कडू मोठा निर्णय घेणार आहे. राष्ट्रीय समाज पक्षाने पुण्यात युवा संघर्ष निर्धार परिषद भरवली आहे. त्यावेळी महादेव जानकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मेळाव्याच आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला बच्चू कडू आणि राजू शेट्टी उपस्थित राहणार आहेत. या दिवशी राजू शेट्टी आणि बच्चू कडू मोठा निर्णय जाहीर करणार आहेत.

राज्यात तिसरी आघाडी निर्माण होण्याची शक्यता राजू शेट्टी, बच्चू कडू आणि महादेव जानकर या तिन्ही नेत्यांच्या माध्यमातून झाली आहे. हे तिन्ही नेते एकत्र येत मोठा निर्णय घेणार आहे, अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली. त्यासाठी त्यांनी फुले वाड्यात येण्याचे आवाहन सर्व कार्यकर्त्यांना केले आहे. यामुळे २० एप्रिल रोजी राज्याच्या राजकारणाचे लक्ष फुले वाडा राहणार आहे.

पुणे शहरात २० एप्रिल रोजी ‘युवा संघर्ष निर्धार परिषद २०२५’ होणार आहे. खोट्या आश्वासनांना कंटाळलेल्या तरुणांचा बुलंद निर्धार.! या टॅगलाईन खाली परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या मेळाव्यातून राज्यातील सत्ताधाऱ्यांना टीकेचे लक्ष केले जाणार आहे. राज्यात तयार होणारी ही तिसरी आघाडी प्रबळ विरोधक ठरणार का? या प्रश्नाचे उत्तर आगामी काळात मिळणार आहे.

अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण.
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान.
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!.
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक...
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक....
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!.
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच....
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच.....
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? नाव जाहीर करा... संजय राऊत यांचं आवाहन
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? नाव जाहीर करा... संजय राऊत यांचं आवाहन.
मुंबई महापालिकेत महापौर राज सुरू; रितू तावडे महापौर तर...
मुंबई महापालिकेत महापौर राज सुरू; रितू तावडे महापौर तर....
रितू तावडे यांनी सांगितला मास्टर प्लान, मुंबईतून या लोकांना...
रितू तावडे यांनी सांगितला मास्टर प्लान, मुंबईतून या लोकांना....
तो फोन, विदर्भातील नेता आणि... रोहित पवारांनी मांडल्या तीन मोठ्या शंका
तो फोन, विदर्भातील नेता आणि... रोहित पवारांनी मांडल्या तीन मोठ्या शंका.