AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rupee bank : रुपी बँकेच्या ठेवीदारांच्या खात्यात जमा झाले 687 कोटी रुपये; विलीनीकरण मात्र अधांतरीच

रुपीच्या 64 हजार 24 ठेवीदारांनी त्यांच्या विविध 1 लाख 25 हजार ठेव खात्यांसाठी अर्ज सादर केले. त्यांची छाननी झाल्यानंतर महामंडळाकडून सातशे कोटी रुपयांचे क्लेम मंजूर करण्यात आले. बँक ऑफ बडोदाद्वारे ठेवीदारांच्या खात्यात 687 कोटी 42 लाख रुपये इतकी रक्कम जमा करण्यात आली.

Rupee bank : रुपी बँकेच्या ठेवीदारांच्या खात्यात जमा झाले 687 कोटी रुपये; विलीनीकरण मात्र अधांतरीच
रुपी बँक (संग्रहित छायाचित्र)Image Credit source: Indiancooperative
| Edited By: | Updated on: Apr 24, 2022 | 12:27 PM
Share

पुणे : रुपी सहकारी बँकेच्या (Rupee cooperative bank) ठेवीदारांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. ठेव विमा महामंडळाकडून रुपी बँकेच्या पाच लाख रुपयांच्या आतील ठेवीदारांच्या बँक खात्यात 687 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. दुसरीकडे बँकेच्या विलीनीकरणाचा प्रश्न मात्र प्रलंबित असून पाच लाखांवरील ठेवीदारांचे भवितव्य अधांतरीच आहे. ठेवी (Deposits) परत कधी मिळतील, याकडे तब्बल 9 वर्ष ठेवीदार डोळे लावून बसले होते. अखेर त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तत्कालीन संचालकांच्या आर्थिक गैरव्यवहारामुळे रिझर्व्ह बँकेने रुपी बँकेवर फेब्रुवारी 2013पासून आर्थिक निर्बंध (Restrictions) लावले आहेत. सुमारे पाच लाख ठेवीदारांच्या ठेवी बँकेत अडकल्या होत्या. त्यामुळे ठेवीदारांना नऊ वर्षे वाट पाहावी लागली. ठेव विमा संरक्षण सुधारित कायद्यानुसार पाच लाखांच्या आतील ठेवी असलेल्या ठेवीदारांना 90 दिवसांत पैसे परत करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार महामंडळाने रुपीच्या खातेदारांकडून अर्ज मागवून घेतले.

‘महामंडळाकडून सातशे कोटी रुपयांचे क्लेम मंजूर’

प्रशासक सुधीर पंडित म्हणाले, की रुपीच्या 64 हजार 24 ठेवीदारांनी त्यांच्या विविध 1 लाख 25 हजार ठेव खात्यांसाठी अर्ज सादर केले. त्यांची छाननी झाल्यानंतर महामंडळाकडून सातशे कोटी रुपयांचे क्लेम मंजूर करण्यात आले. बँक ऑफ बडोदाद्वारे ठेवीदारांच्या खात्यात 687 कोटी 42 लाख रुपये इतकी रक्कम जमा करण्यात आली.

विलीनीकरणाचे काय?

सारस्वत बँकेने रुपीच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेकडे जानेवारीमध्ये दिला होता. रिझर्व्ह बँकेने तब्बल दीड महिन्यानंतर या प्रस्तावाला तत्त्वतः मान्यता दिली. आता ठेवीदारांना सातशे कोटी रुपये परत करण्यात आले. त्यामुळे सारस्वत बँकेसोबतच्या विलीनीकरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आणखी वाचा :

Rajgad Honey bee Attack : राजगडावर पर्यटनासाठी गेलेल्या चौघा जणांवर मधमाशांचा हल्ला, हल्ल्यानंतर पळापळीत महिला दरीत कोसळली

Pune crime : पुण्याच्या सिंहगड रस्त्यावरच्या अवैध धंद्यांवर पोलिसांची धाड; मद्य अन् गुटख्यासह वाहनही जप्त

Bullock cart racing : ‘सनी’चा रुबाबच न्यारा..! पुण्याच्या दावडीतल्या ग्रामस्थांनी साजरा केला वाढदिवस; चांदीची गदाही दिली…

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.