AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune rain : सासवड वीर लोणंद रस्ता वाहतुकीसाठी बंद, वीर धरणातून 42 हजार 933 क्युसेक पाण्याच्या विसर्गानंतर पूल पाण्याखाली

सासवडहून लोणंदला जाण्यासाठी किंवा वीर येथील श्री मस्कोबा नाथाच्या मंदिरात मोठ्या प्रमाणावर लोक या मार्गावरून दर्शनसाठी येत असतात. सातारा जिल्ह्यातील लोणंद भागातील लोक मोठ्याप्रमाणावर पुण्याकडे येण्यासाठी या पुलाचा वापर करतात.

Pune rain : सासवड वीर लोणंद रस्ता वाहतुकीसाठी बंद, वीर धरणातून 42 हजार 933 क्युसेक पाण्याच्या विसर्गानंतर पूल पाण्याखाली
वीर धरणातून पाण्याचा विसर्गImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Aug 12, 2022 | 11:32 AM
Share

पुणे : सासवड वीर लोणंद रस्ता (Saswad Veer Lonand road) वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गाने सध्या पूल पाण्याखाली गेला आहे. वीर धरणातून 42 हजार 933 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे हा मार्ग बंद करण्यात आला आहे. सासवडहून वीरमार्गे लोणंदला जाणाऱ्या मार्गावरच्या पुलावर मुसळधार पावसामुळे सध्या प्रचंड पाणी आले आहे. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. वीर धरण 100 टक्के भरले आहे. धरणारून नीरा नदीत 42 हजार 933 क्युसेकने पाण्याचा विसर्ग (Water released) सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे वीर गावाजवळ असलेल्या नीरा नदीच्या पुलावर पाणी आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हा मार्ग बंद प्रशासनाकडून करण्यात आला आहे. या मार्गावरून न जाता पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पुरंदरच्या (Purandar) तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी केले आहे.

‘पर्यायी मार्गांचा वापर करावा’

सासवडहून लोणंदला जाण्यासाठी किंवा वीर येथील श्री मस्कोबा नाथाच्या मंदिरात मोठ्या प्रमाणावर लोक या मार्गावरून दर्शनसाठी येत असतात. सातारा जिल्ह्यातील लोणंद भागातील लोक मोठ्याप्रमाणावर पुण्याकडे येण्यासाठी या पुलाचा वापर करतात. त्यापार्श्वभूमीवर या मार्गावरून न येण्याचे आणि पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन आता प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. धरणसाखळी परिसरातही अतिवृष्टी होत असल्याने धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

वीर धरणातून पाण्याचा विसर्ग

जिल्ह्यातील इतर धरणांतूनही विसर्ग

पुण्याला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरणही भरले आहे. तर साखळी क्षेत्रातील इतर धरणे टेमघर, वरसगाव आणि पानशेत धरणदेखील 96 टक्क्यांच्या वर भरली आहेत. या धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. वीर धरणातूनही पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने दोन ठिकाणांना जोडणारे पूल पाण्याखाली गेले आहेत. मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे पाणीपातळीत आणखी वाढ होणार आहे. या पार्श्वभूमीवर नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Follow Us
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.