AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवारांच्या भेटीनंतर अजितदादांनी सस्पेन्स वाढवला, राजकीय भूकंप होणार?

Sharad Pawar-Ajit Pawar Meeting: पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील महापालिकेतील दारुण पराभवानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे. त्यातच निकालानंतर अजितदादांनी पुण्यात थेट शरद पवार यांची भेट घेतली. राज्यात काय घडतायेत मोठ्या घडामोडी, काय म्हणाले अजितदादा?

Ajit Pawar: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवारांच्या भेटीनंतर अजितदादांनी सस्पेन्स वाढवला, राजकीय भूकंप होणार?
अजित पवारImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Jan 17, 2026 | 1:33 PM
Share

Sharad Pawar-Ajit Pawar Meeting: राज्यातील महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीची कामगिरी अत्यंत सुमार दिसली. होम पिचवर, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादींचा दारूण पराभव झाला. भाजपच्या झंझावात या ठिकाणचा राष्ट्रवादीचा बुरूज ढासळला. दरम्यान महापालिका निवडणुकीनंतर आज सकाळीच अजितदादांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले. कृषी प्रदर्शनाच्या उद्धघाटनाला आलेल्या अजितदादांनी या प्रश्नाला बगल दिली नाही तर थेट उत्तर दिले.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील?

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची बैठक झाली का या प्रश्नाला अजितदादांनी थेट उत्तर दिले. अशी कुठलीही बैठक झाली नाही. असे सांगत दादांनी या विषयावर भाष्य टाळले. तर आज कृषी प्रदर्शन २०२६ चं उद्धघाटन होतं. आपण इथले लोकप्रतिनिधी आहोत. कुलगुरू येणार होते. मला सांगण्यात आले की शरद पवार पण आले आहेत. त्यामुळे आम्ही तिथं त्यांच्या घरी गेलो. मला पण शेतीची आवड आहे. कुटुंब म्हणून आम्ही एकत्र आहोतच. सध्या तरी आम्ही महायुती म्हणून काम करतोय. केंद्रात पण एनडीएचं सरकार आहे आणि इथं महायुतीचं सरकार आहे, असे अजितदादांनी सांगितले.

जिल्हा परिषद निवडणुकीत एकत्र?

गौतम अदानी येऊन गेल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का असे विचारले असता, गौतम अदानी हे उद्योगपती आहेत. ते एआय सेंटरच्या उद्धघाटनाला आले होते. त्यांचा याच्याशी संबंध काय असा सांगत कुटुंब म्हणून आम्ही एकत्र आहोत असे अजितदादांनी सांगितले. १२ जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. स्थानिक नेते याविषयीचा निर्णय घेतील.जिल्हा परिषद निवडणुकीबाबत स्थानिक नेत्यांना अधिकार देण्यात आले आहेत. स्थानिक कार्यकर्ते त्याविषयीची निर्णय घेतील असे अजितदादा म्हणाले.

पराभवाचं चिंतन करणार

शेवटी मतदार राजा हा सर्वात महत्त्वाचा असतो. प्रयत्न करणं हे प्रत्येक राजकीय पक्षाचं काम असतं. ज्याने त्याने भरपूर प्रयत्न केले. परंतू भाजपला अतियश चांगलं यश मिळालं. भाजपचं मोठं अभिनंदन, मनापासून कौतुक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपनं या निवडणुका लढवल्या.त्याला खूप चांगला प्रतिसाद झाला. इतरांचा पराभव झाला. माझं स्वतःचं असं गणित आहे की, पराभवानं खचून जाऊ नये.पुन्हा आपलं काम करत राहायचं असते. सगळेच म्हणत होते की राष्ट्रवादीला चांगलं वातावरण आहे. पण पराभव का झालं याचं सर्व मिळून चिंतन करू. आमचे अंदाज चुकले, अशी प्रतिक्रिया अजितदादांनी महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर दिली.

ईव्हीएमवर अनेकांनी आक्षेप घेतल्याबाबत अजितदादांनी महत्त्वाचे वक्तव्य केले. ते म्हणाले की मला यामध्ये पडायचं नाही. काय होतं की पराभव झालं की ईव्हीएमला दोष द्यायचा आणि यश आलं की ईव्हीएमबाबत बोलायचं नाही, असं अजितदादा म्हणाले. तर बोटावरील शाई पुसल्याप्रकरणी अजितदादांनी भाष्य करणे टाळले.

Follow Us
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट.

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?.

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?

तेलाचे भाव भडकले, अमेरिकेचे इराणमधील 5 शहरांवर हल्ले, भारताला फटका, होर्मुज खाडीतून...

तेलाचे भाव भडकले, अमेरिकेचे इराणमधील 5 शहरांवर हल्ले, भारताला फटका, होर्मुज खाडीतून..

भाजपच्या बड्या नेत्याने रात्री उशिरा रुग्णालयात घेतली सोनम वांगचूक यांची भेट; काय घडलं?.

भाजपच्या बड्या नेत्याने रात्री उशिरा रुग्णालयात घेतली सोनम वांगचूक यांची भेट; काय घडलं?

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा.

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा