AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : शनिवार आला, मुंबई-पुणे महामार्गावर झाली वाहतूक कोंडी

Pune-Mumbai Expressway : पुणे-मुंबई महामार्गावर शनिवारी पुन्हा वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे. महामार्गावरील वाहतूक कोंडीचा फटका हजारो वाहनधाराकांना बसला आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस दाखल झाले आहे.

Video : शनिवार आला, मुंबई-पुणे महामार्गावर झाली वाहतूक कोंडी
pune mumbai way traffic jam
| Updated on: Jun 10, 2023 | 11:01 AM
Share

रणजित जाधव, पुणे : पुणे शहरात वाहतूक कोंडी (Pune Traffic Issue) ही एक गंभीर समस्या बनली आहे. पुण्यात जिथे जाल तिथे तुम्हाला वाहतूक कोंडीच्या समस्या असते. मग शनिवार, रविवारी पुणे-मुंबई अन् मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या लोकांनाही वाहतूक कोंडीचा फटका बसतो. शनिवारी सकाळी पुन्हा मुंबईच्या बाजूला वाहतूक कोंडी झाली आहे. अमृतांजन पुलाजवळ वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक कोडींमुळे वाहनांच्या लांब रांगा लागल्याचं चित्र आहे. त्यामुळे मोठा टोल भरुन एक्स्प्रेस वे वरुन प्रवास करणाऱ्या लोकांचा वेळ वाया जात आहे.

मुंबई- पुणे हायवेवर वाहतूक कोंडी झाली आहे. लोणावळा येथील बोरघाटात वाहतुकीची कोंडी झाली आहे. घाटातील अमृतांजन पुलाजवळ वाहतूक कोंडी झाल्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या लेनवर मोठी वाहतूक कोंडी झाली.

का झाली वाहतूक कोंडी

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर सुट्या आल्या की वाहतूक कोंडी होण्याचा प्रकार नेहमी घडत असतो. आता पुन्हा शनिवार आल्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. शनिवार असल्याने मुंबईकर घराबाहेर पडले आहे. अनेक जण पर्यटनासाठी लोणावळा, खंडाळा गाठत आहे. तर काही जण पुण्याला जात आहे. मोठ्या संख्येने वाहने रस्त्यांवर आल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली आहे.

संथ गतीने वाहतूक

विकेंड आल्यामुळे पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावरील बोरघाटात वाहतूक संथ गतीने सुरू आहे. बोरघाटातील अमृतांजन पुलाजवळ वाहनांच्या रांगाच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत. विकएंडचा आनंद लुटण्यासाठी आणि आपल्या गावी जाण्यासाठी बाहेर पडलेले लोक वाहतूक कोंडीत अडकले आहेत. बोरघाटात महामार्ग पोलिस रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न करत आहेत.

टोल वाढला पण…

या महामार्गावर टोल वाढवण्यात आला आहे. परंतु वाहतूक कोंडीतून कायमस्वरुपी तोडगा काढण्यात आला नाही. दर आठवड्याला शनिवारी आणि रविवारी वाहतूक कोंडी होत असते. साप्ताहिक सुट्यांमुळे पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असल्यामुळे ही कोंडी होते. यामुळे शनिवारी अन् रविवारी एक्स्प्रेस वे फक्त नावालाच एक्स्प्रेस असतो.

देशात सर्वाधिक टोल

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर 2004 ला हा टोल सुरू करताना दर तीन वर्षांनी 18% दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार टोलच्या दरात 18 टक्के वाढ 1 एप्रिल 2023 पासून करण्यात येणार आहे. त्यामुळे या महामार्गावरुन जाताना आता वाढीव टोल देऊन प्रवास करावा लागणार आहे. परंतु ही दरवाढ देशात सर्वाधिक आहे. राष्ट्रीय महामार्गावर प्रतिकिलोमोटीर 1.73 रुपये टोल कारसाठी आकारला जातो. तो मुंबई-पुणे एक्प्रेस वेवर तब्बल 3.40 रुपये प्रतिकिलोमीटर आहे. इतका टोल देशात कुठेही नाही.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.