AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Vasant More : एखाद्या लढाईला एखादा सेनापती नसला म्हणून कुणी लढाई हरत नाही, पुण्यात येताच वसंत मोरेंची प्रतिक्रिया

ठाण्याच्या सभेला राज ठाकरेंनी स्वत: बोलावल्यामुळे नाही म्हणता आले नाही. घरच्या हळदीचा कार्यक्रमही त्यामुळे बाजूला ठेवावा लागला. यादरम्यान, सगळे मनसे नेते संपर्कात होते, असे वसंत मोरे यांनी सांगितले.

Pune Vasant More : एखाद्या लढाईला एखादा सेनापती नसला म्हणून कुणी लढाई हरत नाही, पुण्यात येताच वसंत मोरेंची प्रतिक्रिया
प्रातिनिधीक फोटोImage Credit source: tv9
Reporter Ashwini Satav Doke
Reporter Ashwini Satav Doke | Edited By: Pradeep Garad | Updated on: May 06, 2022 | 10:50 AM
Share

पुणे : संपूर्ण पक्ष पुण्यात होता. त्यामुळे पक्षाचे नेते असतील, नवीन शहराध्यक्ष असेल. एखाद्या लढाईला एखादा सेनापती नसला म्हणून कुणी लढाई हरत नाही, अशी प्रतिक्रिया मनसे नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी दिली आहे. ते पुण्यात बोलत होते. तिरुपती बालाजी आणि त्यानंतर कोल्हापूरच्या अंबाबाईचे (Kolkapur Ambabai) दर्शन घेऊन ते पुण्याला परतले. मनसेत ते नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यावर त्यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. ठाण्याच्या सभेवेळी आदल्या दिवशी राज साहेबांनी (Raj Thackeray) मला बोलावले होते. ठाण्यातील सभेला त्यांनी यायला सांगितले होते. तेव्हा माझ्या सख्ख्या भावाच्या मुलाच्या हळदीचा कार्यक्रम होता, तिथे गेलो नाही. मी जर आज ठाण्याच्या सभेला गेलो नाही, तर संभ्रम निर्माण होईल, म्हणून मी तिथे गेलो, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे कोणताही गैरसमज नसावा, असे त्यांचे म्हणणे होते.

‘मी नाराज नाही, केवळ शांत’

दरवर्षी मी बालाजीला जात असतो. अक्षय्य तृतीयेच्या दरम्यानच जात असतो. सतरा-अठरा वर्ष झाली मी जातो. मागील दोन वर्ष कोरोनामुळे जाता आले नाही. मार्च-एप्रिलनंतर मी निवडून येईल आणि बालाजीला जाईन म्हणून जवळपास दीड महिने आधीच रिझर्वेशन केले होते. ठाण्याच्या सभेला राज ठाकरेंनी स्वत: बोलावल्यामुळे नाही म्हणता आले नाही. घरच्या हळदीचा कार्यक्रमही त्यामुळे बाजूला ठेवावा लागला. यादरम्यान, सगळे मनसे नेते संपर्कात होते, असेही त्यांनी सांगितले. तर मी नाराज नाही, केवळ शांत आहे. मागच्या काही महिन्यांपासून धावपळ झाली, असे ते म्हणाले.

‘तेव्हा समजा तुम्ही योग्य मार्गावर आहात’

माझा प्रभाग उपनगरामध्ये मोडतो, याठिकाणी भोंग्यांच्या प्रश्नी सर्व सुरळीत सुरू असल्याचे ते म्हणाले. रस्ता चुकतोय या स्टेटसवरही त्यांनी स्पष्टीकरण दिले. स्वामी विवेकानंदांचे ते स्टेटस मला आवडते. ज्यावेळेला तुमचा संघर्ष होत असतो, निंदानालस्ती होत असते, ज्यावेळी तुम्हाला अडचणी येतात तेव्हा समजा तुम्ही योग्य मार्गावर आहात, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. तर बॅजवरूनही ते म्हणाले, की तिरुपतीला वर बॅज किंवा इतर कोणतेही झेंडे घेऊन जाण्याची परवानगी नाही. त्यामुळे दुसऱ्या गाडीतून गेलो. तर सोबत दोन बॅज ठेवले असल्याचे ते म्हणाले.

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप