AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Gandhi : ‘मी जेव्हा महाराष्ट्रात येतो, तेव्हा मला…’, काय म्हणाले राहुल गांधी?

Rahul Gandhi : "त्यांना निवडणुकीत निवडक लोकांना फायदा पोहोचवायचा आहे. मागासांनी मागास, दलित दलित रहावेत अशी त्यांची इच्छा आहे. जातीचा रचना जशी आहे, तशीच रहावी अशी त्यांची इच्छा आहे. ही आमच्या दोघांमध्ये लढाई आहे"

Rahul Gandhi : 'मी जेव्हा महाराष्ट्रात येतो, तेव्हा मला...', काय म्हणाले राहुल गांधी?
Rahul Gandhi
| Updated on: Sep 05, 2024 | 3:11 PM
Share

“तुम्ही भाजपवाल्यांना घाबरवून सोडलय. इथे येऊन मला आनंद होतोय. पंतगराव कदम यांच्या प्रेमाखातर आलो. विकास, शिक्षणाच काम त्यांनी केलं. काँग्रेस पक्षासोबत पूर्ण मनापासून आयुष्यभर उभे राहिले. इंदिरा गांधी निवडणुक हरल्यानंतरही पंतगराव कदम त्यांच्यासोबत होते. महाराष्ट्र प्रगतीशील राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर या या सर्वांनी फक्त महाराष्ट्रालाच नाही संपूर्ण देशाला प्रेरणा दिली” असं राहुल गांधी म्हणाले. ते सांगली येथे बोलत होते.

“मी खर्गेजीना आज बोललो. काँग्रेस अध्यक्ष आहेत. आम्ही लँड केलं. मी एक गोष्टी नोटीस केली आहे. मी तुमच्यासोबत कर्नाटकाला येतो, तेव्हा तुम्ही खुश होता. तुम्ही महाराष्ट्रात येता, तेव्हा सुद्धा आनंदी असता, एकासेकंदात त्यांनी उत्तर दिलं. महाराष्ट्रात काँग्रेसची विचारधारा रुजलेली आहे. त्यामुळे मी इथे येतो, तेव्हा आनंदी असतो. माझी सुद्धा तीच भावना आहे” असं राहुल गांधी म्हणाले.

‘आम्हाला सर्वांना जोडून पुढे न्यायच आहे’

“मी जेव्हा महाराष्ट्रात येतो, तेव्हा मला असं वाटत हा प्रदेश आमच्या विचारधारेचा गड आहे. तुमच्या डीएनएमध्ये ही विचारधार आहे. तुम्ही देशात आज भारतात विचारधारेची लढाई सुरु आहे. एकाबाजूला काँग्रेस पार्टीची विचारधारा दुसऱ्याबाजूला भाजपा आहे. आम्हाला सामाजिक विकास हवा आहे. आम्हाला सर्वांना जोडून पुढे न्यायच आहे. त्यांना निवडणुकीत निवडक लोकांना फायदा पोहोचवायचा आहे. मागासांनी मागास, दलित दलित रहावेत अशी त्यांची इच्छा आहे. जातीचा रचना जशी आहे, तशीच रहावी अशी त्यांची इच्छा आहे. ही आमच्या दोघांमध्ये लढाई आहे” असं राहुल गांधी म्हणाले.

‘एकाजातीला दुसऱ्या जातीशी लढायला लावतात’

“ते द्वेष पसरवतात. एका धर्माला दुसऱ्या धर्माशी, एकाजातीला दुसऱ्या जातीशी लढायला लावतात. मणिपूर बघा, भारताच्या इतिहासात पहिल्यांदा नागरी युद्धाची स्थिती निर्माण झाली आहे. दीडवर्ष झालं भारताचे पंतप्रधान तिथे गेले नाहीत, कारण तिथे भाजपाच्या लोकांनाी आग लावली आहे” असं राहुल गांधी म्हणाले.

Follow Us
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला...
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला....
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर...
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर....
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video.
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव...
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव....
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार.
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?.
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल.....
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल......
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ..
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ...
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार.
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको.