AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरे यांचा शरद पवारांवर मोठा हल्ला, फोडाफोडीचे राजकारण अन् जातीचे राजकारण…

raj thackeray press conference: शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापन करताना फोडाफोडी केली. फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात राज्यात शरद पवार यांनी सुरु केले. तसेच जातीचे विष देखील त्यांनीच कालवले. 1999 मध्ये राष्ट्रवादीच्या जन्म झाला त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारण पाहा.

राज ठाकरे यांचा शरद पवारांवर मोठा हल्ला, फोडाफोडीचे राजकारण अन् जातीचे राजकारण...
Raj Thackeray
| Updated on: Aug 24, 2024 | 1:01 PM
Share

राज्यातील फोडाफोडीचे आणि जातीपातीच्या राजकारणास शरद पवार जबाबदार आहे. त्यांनी त्याची सुरुवात केली, असा घाणाघाती हल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केला. विदर्भातील दौऱ्यात बोलताना नागपूरमधून राज ठाकरे यांनी हे आरोप केले. राज ठाकरे म्हणाले की, शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापन करताना फोडाफोडी केली. फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात राज्यात शरद पवार यांनी सुरु केले. तसेच जातीचे विष देखील त्यांनीच कालवले. 1999 मध्ये राष्ट्रवादीच्या जन्म झाला त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारण पाहा. त्यापूर्वीच्या काळात कधी संत आणि कधी महापुरुषांची विभागणी झाली नव्हती. राष्ट्रवादीच्या जन्मानंतरच हा प्रकार सुरु झाला.

महाराष्ट्रात पुरोगामी महाराष्ट्राचा पुनरावृत्ती होत आहे. जाती वाद फोडफोडी सुरू झाली. शरद पवार यांनी त्याची सुरवात पुलोदपासून केली. फोडा फोडीचा राजकारण आणि जातीच राजकारण शरद पवार यांनी सुरू केले. संत महापुरुष जाती जातीत कधीच विभागले नव्हते ते 1999 पासून सुरू झाले. हा विषय सगळ्यांनी बंद केला पाहिजे.

लोकसभा निवडणुकीत मतदान असे…

लोकसभा निवडणुकीत आघाडी आणि महायुतीला झालेले मतदान आपण समजून घेतले पाहिजे. त्यावेळी भाजपच्या विरोधात मुस्लिम लोकांनी मतदान केले. संविधान बदलणार म्हणून भाजप विरोधात दलित समुदायाने मतदान केले. त्या काळात झालेले मतदान मोदी आणि शहा विरोधात झाले होते. ते उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या प्रेमासाठी मतदान नव्हते. गेल्या पाच वर्षांत या लोकांनी राज्यात जे गलिच्छ राजकारण केले, ते राजकारण महाराष्ट्रातील जनता विसरणार नाही. महाराष्ट्रातील जनतेने कधीही विचार केला नसेल की महाराष्ट्रात असे राजकारण चालणार आहे.

लोक राज्यातील राजकारणास कंटाळले

मी यापूर्वी सांगितले होते निवडणुकीच्या आधी हाणामाऱ्या सुरू होतील, त्याची झलक आपण लोकसभेत काहीशी पहिली आता पुन्हा दिसेल. आमच्यासाठी वातावरण पोषक आहे. लोक राजकारणाला कंटाळले आहे. दिवाळी नंतर विधानसभा निवडणूक लागतील असे वाटत असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.

हे ही वाचा…

लाडकी बहीण योजनेवर राज ठाकरे यांचे पहिल्यांदा थेट भाष्य, ही योजना म्हणजे…

हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने...
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने....
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.