AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackrey : सध्याचे आजार आणि महाराष्ट्राचं राजकारण फारसं वेगळं नाही – राज ठाकरे

सध्याचे आजार आणि महाराष्ट्राचं राजकारण फारसं वेगळं नाही अशा शब्दात महाराष्टर नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टिप्पणी केली. शेकापच्या वर्धापनदिनानिमित्तच्या मेळाव्यात ते बोलत होते.

Raj Thackrey : सध्याचे आजार आणि महाराष्ट्राचं राजकारण फारसं वेगळं नाही - राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरेImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Aug 02, 2025 | 1:24 PM
Share

सध्याचे आजार आणि महाराष्ट्राचं राजकारण फारसं वेगळं नाही अशा शब्दात महाराष्टर नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टिप्पणी केली. शेतकरी कामगार पक्षाच्या (शेकाप) 78 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या मेळाव्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज आवर्जून हजेरी लावली. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतही उपस्थित होते. यावेळी त्यांनी त्यांच्या मिश्कील शैलीत भाषण करत राज्यातील सध्याच्या राजकारणावरून टोला हाणला.

काय म्हणाले राज ठाकरे ?

गेले 2 दिवस जरा तब्येत नरम आहे. मी आज इथे आलो, खरा, पण सकाळीच माझ्यात ताकद नव्हती. काय झालंय ते आजकाल डॉक्टर सांगत नाहीत. पूर्वीचे आजार कसे ताठ मानेने नाव घेऊन समोर यायचे, हल्लीचे येत नाही. म्हणजे हल्लीचे आजार आणि सध्याचं राजकारण फारसं वेगळं नाही. हा या पक्षातून त्या पक्षात गेला, तो त्या पक्षातुन या पक्षात आला. मग आपण म्हणतो काय झालं ? व्हायरल होता.  महाराष्ट्रात हे व्हायरल खूप फिरत आहे असा मिश्कील टोला राज ठाकरे यांनी हाणला.

शेकापबद्दल राज ठाकरेंनी काय सांगितलं ?

स्वातंत्र्य मिळायच्या आगोदर ज्या पक्षाची स्थापना झाली तो शेतकरी कामगार पक्ष, ३ ऑगस्ट १९४७ ला स्थापन. १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळालं,. स्वातंत्र्य पूर्व काळात स्थापन झालेला राज्यातील एकमेव पक्ष. इतक्या वर्षानंतरही हे टिकून आहे. हे आश्चर्य आहे. १९८१ साली शिवसेनेचं पहिलं अधिवेशन मुंबईत झालं होतं. त्याला डांगे प्रमुख पाहूणे म्हणून आले होते. कम्युनिस्ट पक्षाचे. कम्युनिस्ट आणि शिवसेनेत विस्तवही जात नव्हते. पण राजकारण आणि राजकारणी उदार होते. मोठ्या मनाचे होते. ते मोठं मन संकुचित झालं आहे. शिवसेनेच्या व्यासपीठावर डांगे येणं म्हणजे भगव्या व्यासपीठावर लाल ध्वज येणं. आज लाल ध्वजाच्या व्यासपीठावर दोन भगवे ध्वज आले आहेत असं राज ठाकरे म्हणाले.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.