AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकोट किल्ल्यावर मविआ अन् भाजपमध्ये राडा, आदित्य ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांचा फोन

राजकोट किल्ल्यावर आंदोलन सुरु आहे. त्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी माहिती घेतली. काय चाललेले आहे, कसे चालले आहे. त्याची विचारणा केली. त्याठिकाणी किती भ्रष्टाचार झाला ते पाहून या. म्हणजे भाजपचा भ्रष्टाचार देशभरासमोर मांडता येईल, असे उद्धव ठाकरे यांनी विचारले.

राजकोट किल्ल्यावर मविआ अन् भाजपमध्ये राडा, आदित्य ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांचा फोन
राजकोट किल्ल्यावर आंदोलन
| Updated on: Aug 28, 2024 | 1:17 PM
Share

सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे शिवप्रेमी संतप्त झाले. त्याठिकाणी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्ते यांच्यात राडा झाला. यावेळी शिवसेना उबाठा नेते आदित्य ठाकरे यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फोन केला. आदित्य ठाकरे राजकोट किल्ल्यावर धरणा देत असताना उद्धव ठाकरे यांनी फोन करुन त्यांना हिंमत दिली. मुख्य प्रवेशद्वारावर नारायण राणे आणि त्यांचे समर्थक थांबून आहे. त्याच ठिकाणावरुन किल्ल्यावर जाण्याची मागणी महाविकास आघाडीचे नेत्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे राजकोट किल्ल्यावर तणाव निर्माण झाला आहे.

आदित्य ठाकरे यांना उद्धव ठाकरे काय म्हणाले

राजकोट किल्ल्यावर आंदोलन सुरु आहे. त्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी माहिती घेतली. काय चाललेले आहे, कसे चालले आहे. त्याची विचारणा केली. त्याठिकाणी किती भ्रष्टाचार झाला ते पाहून या. म्हणजे भाजपचा भ्रष्टाचार देशभरासमोर मांडता येईल. आम्ही शिवसैनिक आहोत. आम्ही घाबरणार नाही, अशी हिंमत देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी फोन केला, असे आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. पोलिसांनी आदित्य ठाकरे यांची सुरक्षा वाढवली आहे.

आदित्य ठाकरे आंदोलनावर ठाम

नारायण राणे समर्थकांनी किल्ल्याचा मुख्य दरवाजा दीड तासापासून अडवून धरला होता. त्यानंतर त्यांनी हा दरवाजा मोकळा करण्यास सुरुवात केली. भाजप आणि मविआमध्ये सुरु असलेला वाद मिटवण्यासाठी जयंत पाटील किल्ल्यावर दाखल झाले. त्यांनी नितेश राणे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी वैभव नाईक आणि आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा केली. दुसरीकडे आदित्य ठाकरे आंदोलनावर ठाम आहे. जोपर्यंत भाजप कार्यकर्ते किल्ल्यातून बाहेर पडणार नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरु राहणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. राणे आणि त्यांचे समर्थक निघून गेल्यावर आम्ही त्याठिकाणी जाऊ, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

दोन्ही बाजूने आपण वेळ घेतली असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, महाविकास आघाडीतर्फे आज मोर्चाही काढण्यात येणार आहे. मालवणमध्ये हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.