AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रातील असा एक लपलेला गड, जिथे राम आणि सीता येऊन गेले… दर्शनानंतर सर्व इच्छा होतील पूर्ण

नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये भव्य उत्सवाचे आयोजन केले जाते. देवीच्या दर्शनासाठी केवळ अकोला जिल्ह्यांतूनच नाही, तर दूरदूरच्या भागांतून भाविकांची अलोट गर्दी होते. या देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना भक्तीभावाने ३६० पायऱ्यांची चढाई करावी लागते.

महाराष्ट्रातील असा एक लपलेला गड, जिथे राम आणि सीता येऊन गेले... दर्शनानंतर सर्व इच्छा होतील पूर्ण
| Updated on: Sep 27, 2025 | 2:52 PM
Share

नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत अकोला जिल्ह्याच्या बार्शीटाकळी तालुक्यात असलेल्या रुद्रायणी देवीचा गड भाविकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू बनला आहे. अकोला शहरापासून अवघ्या ५० किलोमीटरवर असलेला हा गड आपल्या नैसर्गिक सौंदर्य आणि ऐतिहासिक महत्त्वामुळे नाशिकच्या सप्तशृंगी गडासारखा अनुभव देतो. या प्राचीन देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना तब्बल ३६० पायऱ्या चढाव्या लागत आहे.

चिंचोली गावानजीक एका उंच पहाडावर रुद्रायणी देवीचा निवास आहे. हा परिसर सभोवतालच्या निसर्गाने नटलेला असल्याने, गडावरून दूरदूरपर्यंतचे निसर्गरम्य आणि विहंगम दृश्य पाहण्यासाठी मिळते. निसर्गाची ही सुंदर छटा भाविकांना वेगळी शांती आणि ऊर्जा देते. स्थानिक परंपरेनुसार, हे मंदिर अतिशय पुरातन आहे. देवीची मूर्तीसुद्धा दगडी आणि प्राचीन आहे. तिच्या दर्शनासाठी ठिकठिकाणाहून हजारो भक्त वर्षातून अनेकवेळा येत असतात. या देवीला साकडं घातल्यास मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची दृढ श्रद्धा आहे.

धार्मिक महत्त्व प्राप्त

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या मंदिराच्या इतिहासाबाबत एक अनोखी आख्यायिका सांगितली जाते. त्रेतायुगात प्रभू राम आणि सीता या ठिकाणी दोन वेळा येऊन गेल्याचे मानले जाते. यामुळे या स्थळाला एक वेगळे धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये भव्य उत्सवाचे आयोजन केले जाते. देवीच्या दर्शनासाठी केवळ अकोला जिल्ह्यांतूनच नाही, तर दूरदूरच्या भागांतून भाविकांची अलोट गर्दी होते. या देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना भक्तीभावाने ३६० पायऱ्यांची चढाई करावी लागते.

चैतन्य आणि उत्साहाचे वातावरण

पायऱ्या चढून गडावर पोहोचल्यावर होणारे रुद्रायणी मातेचे दर्शन, हा अनुभव भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि समाधानकारक असतो. पायथ्याशी नऊ दिवस मोठी यात्रा भरते, ज्यामुळे संपूर्ण परिसरात चैतन्य आणि उत्साहाचे वातावरण तयार होते. भक्ती, निसर्गरम्यता आणि ऐतिहासिक वारसा यांचा संगम म्हणून या गडाला ओळखले जाते. अकोल्यातील रुद्रायनी मातेचा गड हा या नवरात्रोत्सवातील मुख्य श्रद्धास्थान मानला जातो.

नऊ दिवस उत्साहाचे वातावरण

दरम्यान अकोला जिल्ह्याच्या धार्मिक आणि सामाजिक जीवनात नवरात्रोत्सवाचे स्थान खूप मोठे आहे. शहरातील विविध मंदिरे आणि ग्रामीण भागातील शक्तीपीठांवर नऊ दिवस उत्साहाचे वातावरण असते. या काळात केवळ रुद्रायणी मातेचा गडच नव्हे, तर शहरातही मोठे धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. मात्र, रुद्रायणी मातेच्या गडावर असलेले हे अनोखे ऐतिहासिक आणि नैसर्गिक पावित्र्य आहे. हा गड अकोला जिल्ह्याच्या नवरात्रोत्सवाचे एक मुख्य आणि अविभाज्य प्रतीक बनला आहे. या काळात अकोला जिल्ह्यातील भक्तांची श्रद्धा आणि उत्साह खऱ्या अर्थाने शिगेला पोहोचलेला दिसतो.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
‘अभी भी जिंदा हूं’ सोनम वांगचूक यांचा रुग्णालयातून पहिला व्हिडीओ समोर, सरकारला काय म्हटलं?.

‘अभी भी जिंदा हूं’ सोनम वांगचूक यांचा रुग्णालयातून पहिला व्हिडीओ समोर, सरकारला काय म्हटलं?

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण….

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण…

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी.

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी