AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हैदराबाद गॅझेटबाबत रामदास आठवलेंचं मोठं भाकीत, स्पष्टच बोलले…, मराठा आरक्षणासंदर्भात मोठं वक्तव्य

मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनानंतर अखेर हैदराबाद गॅझेट लागू करण्यात आलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना रामदास आठवले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

हैदराबाद गॅझेटबाबत रामदास आठवलेंचं मोठं भाकीत, स्पष्टच बोलले..., मराठा आरक्षणासंदर्भात मोठं वक्तव्य
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 07, 2025 | 7:55 PM
Share

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची हाक दिली होती. लाखोच्या संख्येनं मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईत एकवटला,  या आंदोलनाला मोठं यश मिळालं, जरांगे पाटील यांच्या अनेक मागण्या मान्य झाल्या आहेत. हैदराबाद गॅझेटचा जीआर देखील काढण्यात आला.

मात्र दुसरीकडे सरकारने घेतलेल्या या निर्णयाला ओबीसी समाजाकडून विरोध होत आहे. मराठा समाजाला स्वतंत्र्य आरक्षण द्या, ओबीसी समाजामधून आरक्षण देऊ नये, अशी भूमिका ओबीसी समाजाची आहे. तर दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळावं अशी मागणी मराठा समाजाची आहे, या सर्व पार्श्वभूमीवर बोलताना आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाले आठवले? 

ओबीसी समाजाला आधीच आरक्षण कमी मिळालं आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय नको. मराठा समाजाला यापूर्वीचं दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे. हैदराबाद गॅझेट लागू केलं तरी सरसकट मराठा समाजाला त्याचा फायदा होणार नाही, असं आठवले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांची युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर देखील आठवले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा असतो त्यात राज ठाकरेंना कदाचित बोलावल्या जाऊ शकतं.  पण जरी दोन्ही भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणात कुठलाही फरक पडणार नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना मुंबईची सत्ता मिळणं अवघड आहे. मुंबई महापालिका महायुती जिंकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही यावेळी आठवले यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान मराठा आरक्षणावरून आता फडणवीस यांचे फोटो लागल्याचं पहायला मिळत आहे, यावर देखील आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. श्रेय घेण्याचा प्रश्नच नाही ते ब्राह्मण असल्यामुळे त्यांना टार्गेट करण्यात आलं होतं. ब्राह्मण असतानाही त्यांनी हा निर्णय घेतला आहे. सत्तर वर्षात अनेक मराठा मुख्यमंत्री राहिले, मात्र मराठा मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय घेतला नव्हता. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी तो निर्णय घेतल्यामुळे त्यांचे पोस्टर लागलेच पाहिजेत, असंही यावेळी आठवले यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.