AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादांचा पहाटेचा शपथविधी हा तिसरा प्रयोग, रावसाहेब दानवे यांचं मोठं विधान

भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी अजित पवार यांच्याबद्दल बोलताना मोठं विधान केलं आहे. दादांनी सकाळचा शपथविधी घेतला तो पहिला प्रयोग नव्हता तर तिसरा प्रयोग होता, असं दानवे यांनी म्हटलं आहे.

अजितदादांचा पहाटेचा शपथविधी हा तिसरा प्रयोग, रावसाहेब दानवे यांचं मोठं विधान
RAVSAHEB DANVEImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 29, 2026 | 9:02 PM
Share

उपमुख्यमंत्री  अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये अजित पवार यांचं निधन झालं, अजित पवार यांचं विमान बारामतीवरून मुंबईच्या दिशेनं निघालं होतं. बारामतीमध्ये धावपट्टीवर उतरताना विमानाचं नियंत्रण सुटलं आणि ते थेट जमिनीवर धडकलं, क्षणात मोठा स्फोट झाला आणि विमानाला आग लागली. या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला, अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.  आज अजित पवार यांच्यावर बारामतीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.  दरम्यान अजित पवार यांच्या निधनानंतर शोकसभेत बोलताना भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी मोठं विधान केलं आहे, ते जालन्यात बोलत होते.

नेमकं काय म्हणाले दानवे? 

आज जालना शहरात  अजित पवार यांच्या निधनानंतर सर्वपक्षीय शोक सभा आयोजित करण्यात आली होती, यावेळी भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी बोलताना अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला, त्यांचे काही किस्से सांगितले. यावेळी बोलताना दानवे यांनी मोठं विधान केलं आहे. दादांनी सकाळचा जो शपथविधी घेतला होता, तो पहिला प्रयोग नव्हता तर तिसरा प्रयोग होता, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की,  शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस तिघं मिळून सरकार चालू असं ठरलं होतं, कोण मंत्री होणार? पालकमंत्री होणार? हेही ठरलं होतं. मात्र मोठ्या पवार साहेबांनी सांगितलं की शिवसेना नको म्हणून पहिला प्रयोग फसला. त्यानंतर दुसराही प्रयोग फसला, त्यानंतर हा तिसरा प्रयोग असं दानवे यांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्याला मोठा धक्का बसला आहे, आज अजित पवार यांच्यावर शोकाकूल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात शोककळा पसरली असून, आज अनेक ठिकाणी बाजारपेठा बंद ठेवून अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बीड, पुणे सह अनेक ठिकाणच्या बाजारपेठा आज बंद होत्या.

Follow Us
हे सगळं पैशासाठी असेल तर...; पवनराजे निकालावर अंजली दमानियांचा संताप
Anjali Damania | हे सगळं पैशासाठी असेल तर...; पवनराजे निकालावर अंजली दमानियांचा संताप अनावर
एकही खासदार कुठंही जाणार नाही, कारण... शिंदे सेनेतील नेत्याने सांगितलं
Big Breaking | एकही खासदार कुठंही जाणार नाही, कारण... शिंदे सेनेतील नेत्याने सांगितलं गुपित
पवनराजे निंबाळकर प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिय
पवनराजे निंबाळकर प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; थेट अमित शाह...
निंबाळकरांचा निर्णय आता उद्धव ठाकरेंच्या कोर्टात!
Omraje Nimbalkar | निंबाळकरांचा निर्णय आता उद्धव ठाकरेंच्या कोर्टात! अनिल देसाईंच्या त्या विधानाने महाराष्ट्रात खळबळ
ओमराजेंचे कट्टर समर्थक कैलास पाटील मातोश्रीवर, राजकारणात मोठं घडणार?
Omraje Nimbalkar | ओमराजेंचे कट्टर समर्थक कैलास पाटील अचानक 'मातोश्री'वर, राजकारणात मोठं घडणार?
मी शिंदे गटात... ओमराजेंचा निर्णय बदलला? त्या एका विधानानं खळबळ
Omraje Nimbakakar | मी शिंदे गटात... ओमराजेंचा निर्णय बदलला? त्या एका विधानानं खळबळ
दुर्दैव! हायकोर्टात जाणार... निंबाळकर निकालावर ओमराजेंची प्रतिक्रिया
दुर्दैव! हायकोर्टात जाणार...पवनराजे निंबाळकर निकालावर ओमराजेंची पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! आरोपींची निर्दोष मुक्तता, मात्र खोट्या साक्षीदारामुळे खटला
मोठी बातमी! आरोपींची निर्दोष मुक्तता, मात्र खोट्या साक्षीदारामुळे खटला... पवनराजे निंबाळकर प्रकरणात कायदेतज्ज्ञ काय म्हणाले?
20 वर्षांनंतरचा निकाल! माफीचा साक्षीदार विश्वासार्ह नाही; सर्व आरोपी..
मोठी बातमी! 20 वर्षांनंतरचा निकाल! माफीचा साक्षीदार विश्वासार्ह नाही; पद्मसिंह पाटलांसह सर्व आरोपी निर्दोष
1 रुपया देतात, 100 रुपये काढतात, ठाकरेंकडून लाडकी बहीण योजनेची पोलखोल
Raj Thackeray | 1 रुपया देतात, 100 रुपये काढतात, राज ठाकरेंकडून लाडकी बहीण योजनेची पोलखोल; सरकारची पिसेच काढली