AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गाववाल्यांनु लक्ष द्या, 13 ऑक्टोबरला होणार आरक्षण सोडत, तुमचा पंचायत समिती गट कोणासाठी राखीव?

राज्यातील 32 जिल्हा परिषदा व त्यांतर्गत येणाऱ्या 336 पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता सदस्यपदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी 13 ऑक्टोबर 2025 रोजी सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.

गाववाल्यांनु लक्ष द्या, 13 ऑक्टोबरला होणार आरक्षण सोडत, तुमचा पंचायत समिती गट कोणासाठी राखीव?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 01, 2025 | 7:53 PM
Share

राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आला आहे, काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी तसेच पंचायत समितीचे सभापती आणि उपसभापतीपदासाठी आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली होती, दरम्यान त्यानंतर आता राज्यातील जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांच्या आरक्षणाची सोडत येत्या 13  ऑक्टोबरला जाहीर होणार आहे.

राज्यातील 32 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 336 पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता सदस्यपदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी 13 ऑक्टोबर 2025 रोजी सोडत काढण्यात येणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार संबंधित जिल्हाधिकारी 10 ऑक्टोबर 2025 रोजी वृत्तपत्रांत आरक्षण सोडतीसंदर्भातील सूचना प्रसिद्ध करतील. 13 ऑक्टोबर 2025 रोजी सोडत काढल्यानंतर प्रारूप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. त्यावर 14 ते 17 ऑक्टोबर 2025 या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून 3 नोव्हेंबर 2025 रोजी शासन राजपत्रात अंतिम आरक्षण प्रसिद्ध केले जाईल, असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.

उत्सुकता वाढली  

महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती पहाता, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या प्रत्येक पक्षासाठी प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून या निवडणुका लढवल्या जाणार? की काही पक्ष या निवडणुकीच्या माध्यमातून स्वबळाची चाचपणी करणार? याच चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये, त्यातच आता राज्यात आणखी एका युतीची चर्चा सुरू आहे ती म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी दोन्ही ठाकरे बंधू मनसे प्रमुख राज  ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान हे काहीजरी असलं तरी उमेदवारी कोणाला द्यायची? याच सर्वच पक्षांचं गणित आता 13 ऑक्टोबरला होणाऱ्या आरक्षण सोडतीवर अवलंबून असणार आहे. त्यामुळे कोणाचं हे गणित बिघडणार आणि कोणाच्या पथ्थ्यावर पडणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे, येत्या 13 ऑक्टोबर रोजी ही सोडत जाहीर केली जाणार आहे.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक