AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Pawar : Disha Salian प्रकरणात FIR मध्ये आदित्य ठाकरेंचं नाव आल्यानंतर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया

Rohit Pawar : दिशा सालियान प्रकरणात सीबीआयने काल एफआयआर नोंदवला. या एफआयआरमध्ये आदित्य ठाकरेंसह अनेकांची नावं आहेत. त्या संदर्भात आज शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रोहित पवार बोलले आहेत.

Rohit Pawar : Disha Salian प्रकरणात FIR मध्ये आदित्य ठाकरेंचं नाव आल्यानंतर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Rohit Sharma
| Updated on: Sep 15, 2026 | 7:11 AM
Share

दिशा सालियान प्रकरणात सीबीआयने एफआयआर नोंदवला. या एफआयआरमध्ये आदित्य ठाकरेंसह अनेकांची नावं आहेत. त्या संदर्भात आज शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रोहित पवार यांना पत्रकारांनी विचारलं. “अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या बाबतीत काय झालं होतं? मुद्दामून राजकीय दृष्टीकोनातून आदित्य ठाकरेंचं नाव घेतलं होतं. क्लीनचीट मिळाली. आताही दिशा सालियानच्या बाबतीत क्लीनचीट मिळेल. सीबीआयवर विश्वास नसला, तरी न्यायालयावर आमचा विश्वास आहे. पुढच्या तीन वर्षात कुठलीही निवडणूक नसताना आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलं जात असेल तर लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुका मुदतीआधी होतील की काय असं वाटू लागलय” असं रोहित पवार म्हणाले.

मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण अजूनही सुटलेलं नाही. त्यावर रोहित पवार म्हणाले की, “मनोज जरांगे यांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. लोकांना येता-जाताना अडचणी सोसाव्या लागल्या. हॉटेल, रेस्टॉरंट तिथे होते. चहापणी बंद केलं” “स्वच्छतागृहाचं नियोजन नव्हतं. सरकारने लवकर यावर निर्णय घ्यावा. जरांगेंचं उपोषण पुढे न्यायचं की नाही हा सरकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा निर्णय आहे” असं रोहित पवार म्हणाले.

मग, पूर्णसत्य काय देसाईसाहेबांनी सांगावं

मंत्री शंभूराजे देसाई म्हणाले की, मनोज जरांगे पाटील हे अर्धसत्य बोलत आहेत, त्यांना भेटून त्यांचे गैरसमज दूर करणार यावरही रोहित पवार बोलले. “अर्धसत्य त्यांना वाटत असेल, तर पूर्णसत्य काय हे देसाईसाहेबांनी मीडियासमोर येऊन सांगावं. काय चर्चा झाली हे लोकांसमोर येणं महत्वाच आहे. महत्वाचं म्हणजे त्यातून मार्ग काढला पाहिजे” असं रोहित पवार म्हणाले.

निर्णय घेण्याची ताकद त्यांच्यात आहे

“मीडियात अर्धसत्य बोलून चालत नाही. सत्ता त्यांच्याकडे आहे. निर्णय घेण्याची ताकद त्यांच्यात आहे. स्पष्टता सर्व विषयात आणली पाहिजे. समाजाला दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत” असं रोहित पवार म्हणाले. “अवकाळी पाऊस झालेला त्याची मदत अजून मिळालेली नाही. MPSC चे विद्यार्थी लढत आहेत. सर्व समाजाच्या घटकांना वेगवेगळ्या अडचणी सोसाव्या लागत आहेत. सरकारकडून जर तो निर्णय घेतला जात नसेल, तर सरकार मुद्दामून तो विषय लांबवतय की काय असं वाटतं” असं रोहित पवार म्हणाले.

Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती