AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाविकास आघाडीत बिघाडी, सांगलीत काँग्रेस, राष्ट्रवादीने काम केले नाही… संजय राऊत यांचा आरोप

Sanjay Raut: मुख्यमंत्री येऊन गेले. ते कशासाठी येतात हे माहिती आहे. शेअर बाजाराप्रमाणे भाव लावला जातो. शिक्षकांना विकत घेऊ नका. परंपरा मोडू नाका, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

महाविकास आघाडीत बिघाडी, सांगलीत काँग्रेस, राष्ट्रवादीने काम केले नाही... संजय राऊत यांचा आरोप
sanjay raut
| Updated on: Jun 23, 2024 | 12:06 PM
Share

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. या यशानंतर महाविकास आघाडीत शरद पवार आक्रमक झाले आहे. महाविकास आघाडीत आमचा स्ट्राईक रेट जास्त आहे. आम्ही जास्त जागा लढवयला हव्या होत्या, परंतु महाविकास आघाडीत बिघाड होऊ नये, म्हणून दोन पावले मागे आलो, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. त्यांना शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. संजय राऊत म्हणाले की, शरद पवार यांचा स्ट्राईक जास्त हे खरे आहे. पण सांगलीच्या जागी काँग्रेसने काम केले नाही. या जागेवर राष्ट्रवादीने काम केले नाही. दुसरीकडे केंद्र सरकारने सगळ्यात जास्त आम्हाला टार्गेट केले. त्याचा फटका शिवसेनेच्या उमेदवारांना बसला, असे संजय राऊत यांनी म्हटले. शरद पवार विधान सभेसाठी जास्त जागा म्हणजे किती घेतील? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

सीएम यांच्या स्ट्राईक रेटवर हल्ला

संजय राऊत यांनी शरद पवार यांच्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, एकनाथ शिंदे म्हणतात, त्यांचा स्ट्राईक रेट चांगला आहे. परंतु त्यांचा बेईमानीचा स्ट्राईक रेट चांगला आहे. त्यांचा थैल्या आणि खोकेचा स्ट्राईक रेट जास्त आहे. त्यांनी पैशाने स्ट्राईक रेट घेतला आहे. त्यांनी मुंबईची जागा लुटली. महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चा अजून सुरू झाली नाही. त्यासंदर्भात बैठक ठरलेली होती. परंतु काँग्रेसची दिल्लीत बैठक आहे. यामुळे बैठकीसाठी पुढली तारीख ठरवू.

फसवणूक करुन मत घेतली जाताय…

विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघाची निवडणूक आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक दौरा केला. त्यावर संजय राऊत यांनी टीका केली. मुख्यमंत्री येऊन गेले. ते कशासाठी येतात हे माहिती आहे. शेअर बाजाराप्रमाणे भाव लावला जातो. शिक्षकांना विकत घेऊ नका. परंपरा मोडू नाका, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. पैसे वाटपाचा व्हिडिओ सुषमा अंधारे यांनी ट्विट केला. त्यावर बोलताना राऊत म्हणाले, हेलिकॉप्टरमध्ये 20 कोटी उतरवले हे सगळ्यांनी पाहिले. पदवीधर शिक्षक या वर्गात बाजारात ओढू नका. उघड्या डोळ्यांनी व्यभिचार पाहता आहे. लोकशाहीची हत्या होत आहे. निवडणूक आयोग धृतराष्ट्र प्रमाणे हे सर्व पाहत आहे. दिंडोरीत भगरे नावाचा उमेदवार उभा केला. भास्कर भगरे यांच्या नावाप्रमाणे हा उमेदवार दिला. त्याला पिपाणी चिन्ह दिले. लोकांना फसवणूक करुन मत घेतले जात आहे.

डमी उमेदवार पद्धत बंद करा

डमी उमेदवार पद्धत बंद व्हायला पाहिजे. लोकांना भ्रमित केले जाते आणि मते घेतली जातात. यातून मार्ग काढावा लागेल. संदीप गुळवे यांना मत द्यायचे तर डुप्लिकेटला दिले जाते. आदिवासी आणि शेतकरी वर्ग चुकतो. लोकसभा निवडणुकीत लोकांनी शिवसेना समजून धनुष्यबाणला मत दिली होती. त्यांना उद्धव ठाकरे यांना मत द्यायचे होते, असे संजय राऊत यांनी म्हटले.

Follow Us
1 हजार 900 रुपयांचं सिलेंडर 4500 रुपयांना, ठाण्यात काळाबाजाराचा हैदोस
1 हजार 900 रुपयांचं सिलेंडर 4500 रुपयांना, ठाण्यात काळाबाजाराचा हैदोस.
इराण–इस्त्रायल युद्धावर भारताची भूमिका कुठे?
इराण–इस्त्रायल युद्धावर भारताची भूमिका कुठे?.
जय श्रीराम म्हणा सर्व काही मिळेल;गॅस टंचाईवरून राऊतांचा सरकारवर निशाणा
जय श्रीराम म्हणा सर्व काही मिळेल;गॅस टंचाईवरून राऊतांचा सरकारवर निशाणा.
विधानभवन, मेट्रो, स्टॉक एक्सचेंज उडवण्याची धमकी?
विधानभवन, मेट्रो, स्टॉक एक्सचेंज उडवण्याची धमकी?.
युद्धाचा परिणाम घरगुती गॅस सिलेंडरवर, थेट पोलीस बंदोबस्तात वाटप
युद्धाचा परिणाम घरगुती गॅस सिलेंडरवर, थेट पोलीस बंदोबस्तात वाटप.
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.