एकनाथ शिंदे सभागृहात उद्धव ठाकरेंबद्दल चांगलं बोलले, त्यावर संजय राऊत म्हणतात…
इराण-इस्रायल युद्धात मध्यस्थता करायला ते तयार आहेत. पण भारत सरकार अशी भूमिका घेत नाही. ट्रम्प पाकिस्तानचं स्वागत करत असतील तर विश्वगुरु कुठे आहेत?

“निवडणुक काळात खरात भक्तांवर दबाव आणून भाजपचा प्रचार करा, मतदान करा अशी भूमिका अशोक खरात घेता होता. असं नसतं तर बच्चू कडू यांना भाजपाचे मंत्री बनून भेटायला या अशा आशिर्वाद दिला नसता” असं राऊत म्हणाले. अजित पवार विमान अपघात प्रकरणात कर्नाटकात झिरो एफआयआर नोंदवण्यात आला. त्यावर संजय राऊत म्हणाले की, “फडणवीस सांगत होते की, अजित पवार माझे जिवाभावाचे मित्र आहेत. मित्र आहेत, मग पवार कुटुंबाचा एक एफआयआर दाखल केला असता, तस काही झालं नाही”.
काल विधान परिषदेत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे साहेब असा उल्लेख केला. प्रकृती, आरोग्य चांगलं रहावं अशी इच्छा व्यक्त केली. त्यावर राऊत बोलले की, “शिष्टाचार आहे. संस्कार आहे. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना असंख्य पदं दिली आहेत. त्यांची जडणघडण केली आहे. ती जर केली नसती, तर 50-50 कोटींची आज जी क्षमता निर्माण झाली, ती झाली नसती. ती कृतज्ञतेची भावना त्यांच्या मनात असेल. उद्धव ठाकरेंमुळेच एकनाथ शिंदे आज फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात बसले आहेत”
विश्वगुरु कुठे आहेत?
“सर्वपक्षीय बैठकीला आम्ही उपस्थित राहणार . सर्व प्रमुख पक्षाच्या नेत्यांनी आपलं म्हणणं सरकारसमोर मांडलं पाहिजे. युद्धानंतर अशी स्थिती आहे. भारताचं अस्तित्व आहे की नाही या सगळया प्रकरणात हे समजतच नाहीय. पाकिस्तानचं ट्रम्प यांनी अभिनंदन केलय. पाकिस्तानने पुढाकार घेतला.इराण-इस्रायल युद्धात मध्यस्थता करायला ते तयार आहेत. पण भारत सरकार अशी भूमिका घेत नाही. ट्रम्प पाकिस्तानचं स्वागत करत असतील तर विश्वगुरु कुठे आहेत?” असे प्रश्न संजय राऊत यांनी विचारलेत.
