AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : सीजफायरचं श्रेय पाकिस्तानला जाताच राऊत खूप जिव्हारी लागणारं बोलले, जयशंकर माकड, मोदी टेलिफोन ऑपरेटर

Sanjay Raut : "पण शेवटी युद्धात मध्यस्थी करण्याचं श्रेय पाकिस्तानला जातय. चीन मोठा देश आहे. पाकिस्तानला श्रेय जातय. पाकिस्तान पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर आला आहे या निमित्ताने" असं संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut : सीजफायरचं श्रेय पाकिस्तानला जाताच राऊत खूप जिव्हारी लागणारं बोलले, जयशंकर माकड, मोदी टेलिफोन ऑपरेटर
Modi-Jaishankar
| Updated on: Apr 08, 2026 | 10:48 AM
Share

“संपूर्ण जगाचा विद्धवंस होईल अशा पद्धतीच हे युद्ध सुरु होतं. हजारो लोक मारले गेले. आखाती राष्ट्रामधल्या दुबई, कुवैत, बहरीन, इस्रायल अशा अनेक ठिकाणी शेकडो लोकं मारली गेली. पण इराण सारखा देश हा इस्रायल आणि अमेरिकेसारख्या महाशक्तींना शरण गेला नाही. 35 दिवसापेक्षा जास्त काळ अमेरिका, इस्रायलला झुंजवत ठेवलं. अमेरिका, इस्रायलविषयी जी फालतू भिती होती ती इराणने मोडून काढली. देशासाठी कसं लढावं, राज्यकर्त्यांनी, जनतेने कसं बलिदान करावं हे इराणने जगाला दाखवून दिलं” असं संजय राऊत म्हणाले. “तरीही इराणचं नुकसान झालं. इस्रायलच त्याहून जास्त नुकसान झालं. अमेरिकेच्या ट्रम्प सारख्या झुंड राष्ट्रप्रमुखाला धडा शिकवला. पण शेवटी युद्धात मध्यस्थी करण्याचं श्रेय पाकिस्तानला जातय. चीन मोठा देश आहे. पाकिस्तानला श्रेय जातय. पाकिस्तान पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर आला आहे या निमित्ताने” असं संजय राऊत म्हणाले.

“हे श्रेय नरेंद्र मोदींनी घ्यायला पाहिजे होतं. हे श्रेय भारताला मिळायला पाहिजे होतं. महाविश्वगुरुला मिळायला पाहिजे होतं. ट्रम्प, इराणचे राज्यकर्ते आणि इस्रायलचे नेतन्याहू यांना आम्ही एकाटेबलावर आणलं. जगाला शांततेचा संदेश दिला. हे श्रेय आमच्या महाविश्वगुरुंना का मिळाल नाही? कारण त्यांना कोणतीची भूमिका नाही. जगात युद्ध सुरु आहे आणि महाविश्वगुरु केरळ, पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू या ठिकाणी आपल्या राजकीय विरोधकांवर बॉम्ब टाकत होते. शब्द, तोंडी बॉम्ब टाकत होते” अशा शब्दात राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली.

तर टेलिफोन ऑपरेटरच काम केलं

“भारताची अवस्था या काळात मोदींमुळे डरपोक उंदरासाखी झाली आहे. इतक्या मोठ्या घडामोडी आशिया खंडात घडत असताना हिंदुस्थानचे पंतप्रधान काय करत होते, तर टेलिफोन ऑपरेटरच काम केलं. युद्ध थांबवण्याचं श्रेय पाकिस्तानला मिळालं. ज्या पाकिस्तानबद्दल बोलताना जयशंकर म्हणाले की, आम्ही दलाल राष्ट्र नाही. त्या दलाल राष्ट्राला ट्रम्प यांनी युद्ध थांबवण्याचं श्रेय दिलं. जयशकंर यांनी राजीनामा दिला पाहिजे. तुम्ही आपल्या शत्रुला कमी लेखताय. जयशंकर सारखी माकडं आहेत. त्यांना दूर केल पाहिजे त्यांच्यामुळे नाचक्की झाली आहे” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

Follow Us
मराठी न आल्यास रिक्षा चालकांचा परवाना रद्द, या तारखेपासून नियम लागू
मराठी न आल्यास रिक्षा चालकांचा परवाना रद्द, या तारखेपासून नियम लागू.
हातात पिस्तूल, पैशांचे बंडल, अन्... अमरावतीतील आरोपीची रॉयल लाईफस्टाईल
हातात पिस्तूल, पैशांचे बंडल, अन्... अमरावतीतील आरोपीची रॉयल लाईफस्टाईल.
जय पवारांचं प्रत्येक मंगळवारी जनता दरबार भरवणार, कारण...
जय पवारांचं प्रत्येक मंगळवारी जनता दरबार भरवणार, कारण....
अमरावतीतील लैंगिक शोषण प्रकरणात अल्पवयीन मुलीने दिली संवेदनशील माहिती
अमरावतीतील लैंगिक शोषण प्रकरणात अल्पवयीन मुलीने दिली संवेदनशील माहिती.
नाशिक आयटी कंपनीतील फरार आरोपी निदा खानच्या जामीन अर्जावर सुनावणी
नाशिक आयटी कंपनीतील फरार आरोपी निदा खानच्या जामीन अर्जावर सुनावणी.
मुंबईतील ड्रग्स प्रकरणाचं बॉलिवूड कनेक्शन उघड, धक्कादायक माहिती समोर
मुंबईतील ड्रग्स प्रकरणाचं बॉलिवूड कनेक्शन उघड, धक्कादायक माहिती समोर.
देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना ओपन चॅलेंज, म्हणाले...
देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना ओपन चॅलेंज, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल, अडीच वर्षे झाली तरी आरक्ष
सुप्रिया सुळेंचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल, अडीच वर्षे झाली तरी आरक्ष.
गेल्या ३ तासांपासून प्रयत्न सुरू; मात्र डोंबिवलीजवळ घसरलेली लोकल रुळाव
गेल्या ३ तासांपासून प्रयत्न सुरू; मात्र डोंबिवलीजवळ घसरलेली लोकल रुळाव.
महिला आरक्षण विधेयकावर मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले "हे आधीच..
महिला आरक्षण विधेयकावर मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले