AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संतोष देशमुख हत्या प्रकरण: मुख्य आरोपी कराड याचा जामीनासाठी हायकोर्टात अर्ज

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला जवळपास एक वर्ष होत आले आहे. या प्रकरणात अटकेत असलेला प्रमुख आरोपी वाल्मिक कराड याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे जामीनासाठी अर्ज केला आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरण: मुख्य आरोपी कराड याचा जामीनासाठी हायकोर्टात अर्ज
Santosh Deshmukh murder case
| Edited By: | Updated on: Dec 12, 2025 | 9:58 PM
Share

छत्रपती संभाजीनगर : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामीन अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर आज सुनावणी कोर्टात सुनावणी झाली. आज सरकारी पक्षाचा युक्तीवाद अपूर्ण राहिल्याने पुढील सुनावणी आता १६ डिसेंबर रोजी ठेवण्यात आली आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी केज पोलीस ठाण्यात आरोपी वाल्मिक कराडसह त्याच्या साथीदारांवर खून आणि मकोका कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संतोष देशमुख हत्ये प्रकरणात ३१ डिसेंबर २०२४ पासून आरोपी वाल्मिक कराड अटकेत आहे. याप्रकरणात जामीन मिळावा यासाठी कराड याने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

न्यायमूर्ती सुशिल एम.घोडेस्वार यांच्या न्यायालयात या याचिकेवर आज सुनावणी आली झाली. कराडच्यावतीने जेष्ठ विधीज्ञ शिरीष गुप्ते यांनी युक्तीवाद करताना सांगितले की, कराड याला त्याच्या अटकेची कारणे पोलिसांनी लेखी स्वरुपात दिलेले नाही. यामुळे त्याची अटकच बेकायदेशीर आहे असा युक्तीवाद त्यांनी यावेळी केला. आपल्या अशिलाला या गुन्ह्यात चुकीच्या पद्धतीने मकोका लावण्यात आला. मकोका आदेशाची मंजूरी ही चुकीच्या पद्धतीने देण्यात आली आहे. तसेच कराड याचा या घटनेशी कोणताही संबंध नाही असाही यु्क्तीवाद जेष्ठ विधीज्ञ शिरीष गुप्ते यांनी केला.

देशमुख यांच्या हत्येच्यावेळी तो घटनास्थळापासून शेकडो किलोमीटर दूर होता. खोट्या पद्धतीने कराडला या गुन्ह्यात गोवण्यात आले आहे., त्याच्याविरोधात कोणताही पुरावा नसल्याचे नमूद करीत त्यास जामीन देण्याची विनंती यावेळी त्यांनी केली. कराड याच्या वकिलांचा युक्तीवाद खोडून काढताना मुख्य सरकारी वकिल अमरजितसिंह गिरासे देशमुख यांनी या हत्याकांडाचा संपूर्ण घटनाक्रम उलगडून सांगितला. प्रत्येक घटनेत साक्षीदार आहेत, सीडीआर रिपोर्ट, सीसीटीव्ही फुटेज आणि आरोपींची आपआपसातील ऑडिओ रेकॉर्डिंग सरकारी पक्षाकडे आहे. शिवाय या सर्व पुराव्यांना पुष्टी देणारे न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे अहवाल आहेत असेही सरकारी वकीलांनी कोर्टात सांगितले.

पुढील सुनावणी मंगळवारी

कराड हाच या घटनेचा मुख्य सूत्रधार असून अवादा कंपनीकडे २ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. खंडणी न दिल्याने कंपनी बंद करण्याचा प्रयत्न आरोपींनी केला.कंपनी बंद करू नका, रोजगार जाईल यासाठी सरपंच संतोष देशमुख यांनी विनंती केली. यामुळे चिडून जाऊन आरोपींनी त्यांचे अपहरण करुन निघृण हत्या केल्याचे गिरासे यांनी कोर्टास सांगितले.प्रत्यक्ष मारेकरी हे घटनेच्या वेळी आणि नंतर विष्णू चाटे आणि कराड याच्या कायम संपर्कात होते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.आज सरकारी पक्षाचा युक्तीवाद अपूर्ण राहिल्याने आता ही सुनावणी मंगळवारी ठेवण्यात आली आहे.

मुनगंटीवार म्हणाले, मंत्री सभागृहात येत नसतील तर त्याच्यावर बिबटे सोडा
मुनगंटीवार म्हणाले, मंत्री सभागृहात येत नसतील तर त्याच्यावर बिबटे सोडा.
उदे गं आई उदे उदे... सांगलीत यल्लमा देवाच्या यात्रेत भक्तीचा महापूर
उदे गं आई उदे उदे... सांगलीत यल्लमा देवाच्या यात्रेत भक्तीचा महापूर.
विरोधी पक्षनेतेपद निवडीसंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याकडून भेटी-गाठी
विरोधी पक्षनेतेपद निवडीसंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याकडून भेटी-गाठी.
मुंबईचा फॉर्म्युला फिक्स? शिंदे म्हणाले, येणाऱ्या निवडणुका महायुती...
मुंबईचा फॉर्म्युला फिक्स? शिंदे म्हणाले, येणाऱ्या निवडणुका महायुती....
नाशिक तपोवनमधील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाकडून स्थगिती
नाशिक तपोवनमधील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाकडून स्थगिती.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; 2027 मध्ये जनगणना दोन टप्प्यात
केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; 2027 मध्ये जनगणना दोन टप्प्यात.
महायुतीचा BMC साठी फॉर्म्युला ठरला, कुठं 100% युती? कोणाला किती जागा?
महायुतीचा BMC साठी फॉर्म्युला ठरला, कुठं 100% युती? कोणाला किती जागा?.
विधानभवन लॉबीतील राडा प्रकरणी विशेषाधिकार समितीचा अहवाल सादर
विधानभवन लॉबीतील राडा प्रकरणी विशेषाधिकार समितीचा अहवाल सादर.
कोण कुणाचे लाडके, उदय सामंत मुख्यमंत्र्यांचे की उपमुख्यमंत्र्यांचे?
कोण कुणाचे लाडके, उदय सामंत मुख्यमंत्र्यांचे की उपमुख्यमंत्र्यांचे?.
वडेट्टीवार दुसऱ्या दिवशी सभागृहात भडकले, शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्य
वडेट्टीवार दुसऱ्या दिवशी सभागृहात भडकले, शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्य.