AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Israel Iran War : संपूर्ण जग भीषण इंधन टंचाईत अडकलं, पण भारतानं करून दाखवलं, 7 सर्वात मोठ्या गुड न्यूज

युद्धाच्या पार्श्वभूमीवर मध्य पूर्वेत मोठा तणाव आहे, त्यामुळे सध्या संपूर्ण जग भीषण इंधन टंचाईचा सामना करत आहे. मात्र याच दरम्यान भारतासाठी सात मोठ्या गुड न्यूज समोर आल्या आहेत.

Israel Iran War : संपूर्ण जग भीषण इंधन टंचाईत अडकलं, पण भारतानं करून दाखवलं, 7 सर्वात मोठ्या गुड न्यूज
PM MODIImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 14, 2026 | 9:08 PM
Share

अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धाचा आज 15 दिवस आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने होर्मुज स्ट्रेट तेल वाहतूक करणाऱ्या जहाजांसाठी बंद केलं आहे. त्यामुळे अनेक जहाज याच मार्गावर अडकून पडले आहे. यामुळे सध्या संपूर्ण जग इंधन टंचाईच्या मोठ्या संकटात सापडले आहे. एकीकडे संपूर्ण जग इंधन टंचाईच्या मोठ्या संकटात सापडलं असताना दुसरीकडे मात्र याचदरम्यान भारतासाठी सात सर्वात मोठ्या गुडन्यूज समोर आल्या आहेत. त्यातील पहिली गुड न्यूज म्हणजे शनिवारी भारताचे दोन सर्वात मोठे तेल वाहतूक करणारे दोन जहाजं शिवालिक आणि नंदादेवी यांनी होर्मुजची सामुद्रधुनी पार केली आहे. या जहाजांमध्ये तब्बल 92700 मेट्रिक टन एलपीजी गॅस असून हे जहाज आता भारताच्या दिशेनं येत आहेत. 16 -17 मार्च पर्यंत ही जहाजं भारतात दाखल होण्याची शक्यता आहे.

आखाती क्षेत्रात अडकलेले सर्व भारतीय खलाशी सुरक्षित – दुसरी मोठी गुड न्यूज म्हणजे युद्धाच्या पार्श्वभूमीवर आखाती क्षेत्रात अडकलेले सर्व भारतीय खलाशी सुरक्षित आहेत, याबद्दल शिपिंग मंत्रालयाचे सचिव राजेश कुमार सिन्हा यांनी माहिती दिली आहे. गेल्या 24 तासांमध्ये त्यांच्यासोबत कोणतीही दुर्घटना घडली नसून ते सर्व सुरक्षित असल्याची माहिती सिन्हा यांनी दिली आहे.

253 खलाशी सुरक्षित भारतामध्ये परतले – याबाबत देखील राजेश सिन्हा यांच्याकडून माहिती देण्यात आली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 30 भारतीय खलाशांना सुरक्षितपणे भारतात आणण्यात आलं आहे. आता भारतात सुरक्षितरित्या परतलेल्या खलाशांची संख्या 253 वर पोहचल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

ऊर्जा पुरवठा आणि नागरिकांच्या सुरक्षेवर भर – पत्रकार परिषदेमध्ये बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी याबाबत बोलताना मोठा खुलासा केला आहे. वस्तू आणि ऊर्जेची वाहतूक विनाअडथळा कशी सुरू राहील याकडे आमचं विशेष लक्ष आहे. तसेच देशभरात युद्धाच्या पार्श्वभूमीवर कुठेही इंधनाचा तुटवडा निर्माण होणार नाही, याकडे विशेष लक्ष दिले जात असल्याचंही ते म्हणाले आहेत.

होर्मुज सामुद्रधुनीमधून जहाजांना जाण्याची परवानगी – पाचवी मोठी गुड न्यूज म्हणजे इराणने होर्मुज स्ट्रेटमधून जाण्यास भारतीय जहाजांना परवानगी दिली आहे. या वृत्ताला भारतामधील इराणच्या दुतासावासाकडून देखील दुजोरा देण्यात आला आहे.

भारतात अडकलेले इराणी नागरिक सुरक्षितरित्या पाठवले – दरम्यान युद्ध सुरू झाल्यामुळे अनेक इराणी नागरिक भारतामध्ये अडकून पडले होते, त्यांच्यासाठी खास विमानाची व्यवस्था करण्यात आली, जे इराणी पर्यटक भारतामध्ये अडकून पडले होते, त्यांना पुन्हा एकदा इराणला पाठवण्यात आलं आहे.

1.72 लाख भारतीय नागरिकांची घरवापसी- युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेक भारतीय नागरिक आखाती देशांमध्ये अडकले होते, त्यातील अनेक नागरिकांची सुटका करून त्यांना भारतात परत आणण्यात आलं आहे.

Follow Us
मनोज जरांगेंचा नवा अल्टिमेटम, 1.40 लाख नोंदी सापडल्या तरी...सरकारवर
Manoj Jarange | मनोज जरांगेंचा नवा अल्टिमेटम, 1.40 लाख नोंदी सापडल्या तरी...सरकारवर आता पुन्हा दबाव!
महावितरण अधिकाऱ्यांवर बांगड्या फेकत शिवसेनेचा संताप
Kalyan | महावितरण अधिकाऱ्यांवर बांगड्या फेकत शिवसेनेचा संताप; स्मार्ट मीटरवरून कल्याणमध्ये हल्लाबोल!
शिंदेंचं नाव का वगळं? जाब विचारण्यसाठी शिवसैनीक थेट पालिकेत दाखल
शिंदेंचं नाव का वगळं? जाब विचारण्यसाठी शिवसैनीक थेट पालिकेत दाखल, काय मिळालं उत्तर?
वयाच्या 30 व्या वर्षी अभिनेत्री संचिता उगालेने संपवलं जीवन
मोठी बातमी! मनोरंजन विश्व हादरलं; वयाच्या 30 व्या वर्षी अभिनेत्री संचिता उगालेने संपवलं जीवन, नेमकं काय घडलं?
महायुतीत मोठी खळबळ! आम्हाला वेगळंच... इकडे निमंत्रण पत्रिकेवरून बिनसल
महायुतीत मोठी खळबळ! आम्हाला वेगळंच... इकडे निमंत्रण पत्रिकेवरून बिनसलं तिकडे स्वबळाची भाषा; राजकारणात मोठं वादळ?
संघ, विश्व हिंदू परिषदेतील कार्यकर्त्यांना घडवा; ठाकरेंचा भाजपला सल्ला
Sharmila Thackeray | आमची पोरं कशाला चोरता, संघ, विश्व हिंदू परिषदेतील कार्यकर्त्यांना घडवा; शर्मिला ठाकरेंचा भाजपला सल्ला
शाळेच्या पहिल्या दिवशी चिमुकल्यांच्या स्वागतासाठी CM फडणवीस उपस्थित
शाळेच्या पहिल्या दिवशी चिमुकल्यांच्या स्वागतासाठी CM फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, सुनेत्रा पवार शाळांमध्ये उपस्थित
सरकारवर विश्वास वाढला, पण...; मनोज जरांगेंचं मोठं विधान चर्चेत
Manoj Jaranage | सरकारवर विश्वास वाढला, पण...; मनोज जरांगेंचं मोठं विधान चर्चेत
पुन्हा तेच घडलं! नवी मुंबईतील निमंत्रण पत्रिकेत शिंदेंचं नाव वगळलं?
पुन्हा तेच घडलं! नवी मुंबईतील निमंत्रण पत्रिकेत शिंदेंचं नाव वगळलं? भाजप नेता म्हणाला, महायुतीत सगळं...
2 महिन्यांनंतर शाळा सुरू! कुठे ढोल-ताशे, कुठे फुलांचा वर्षाव!
2 महिन्यांनंतर शाळा सुरू! कुठे ढोल-ताशे, कुठे फुलांचा वर्षाव; विद्यार्थ्यांचं जंगी स्वागत