AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“अजूनही सावित्रींच्या लेकींचा संघर्ष सुरूच”; रुपाली चाकरणकर यांनी ‘तिच्या’ दुःखाची कारणच सांगितली…

सोशल मीडियावरील उर्फी जावेद अभिनेत्रीच्या फोटोवरून चित्रा वाघ यांनी तिचे थोबाड रंगवण्याची भाषा केली आहे. त्यावर रुपाली चाकणकर यांनी महाराष्ट्रात राज्यात कायद्याचे राज्य आहे.

अजूनही सावित्रींच्या लेकींचा संघर्ष सुरूच; रुपाली चाकरणकर यांनी 'तिच्या' दुःखाची कारणच सांगितली...
| Edited By: महादेव कांबळे | Updated on: Jan 03, 2023 | 9:08 PM
Share

नायगावः सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी नायगाव येथील शाळेला भेट दिली. त्यावेळी त्यांनी समाजातील व्यक्ती बदलल्या पण प्रवृत्ती तशाच राहिल्या असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. समाजातील व्यक्ती बदलल्या असल्या तरी समाजातील प्रवृत्ती कायमस्वरूपी त्याच राहिल्या असल्याने आजच्या काळातही सावित्रींच्या लेकींचा संघर्ष सुरूच असल्याची भावनाही रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केली.

सावित्रीबाई फुले यांच्या 175 वर्षांचा इतिहास पाहता, सावित्रीबाई फुले यांनी समाजातील अनिष्ठ आणि कर्मठ शक्तींविरोधात लढत त्यांनी सावित्रींच्या लेकींसाठी ज्ञानाची कवाडे खुली केली आहेत.

तरीही आजच्या काळात व्यक्ती बदलल्या आहेत, मात्र प्रवृत्ती त्याच राहिल्या आहेत, त्यामुळे सावित्रींच्या लेकींचा हा संघर्ष सुरूच असल्याचेही त्यांनी सांगितले.

सावित्रीबाई फुले यांची जयंती होत असतानाच राज्यात अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांचाही वाद शिगेला पोहचला आहे.

सोशल मीडियावरील उर्फी जावेद अभिनेत्रीच्या फोटोवरून चित्रा वाघ यांनी तिचे थोबाड रंगवण्याची भाषा केली आहे. त्यावर रुपाली चाकणकर यांनी महाराष्ट्रात राज्यात कायद्याचे राज्य आहे.

प्रत्येक ठिकाणी एक व्यवस्था काम करत असते. त्यामुळे कोणीही थोबाड रंगवण्याची आणि कायदा हातात घेण्याची भाषा करू नये असंही रुपाली चाकणकर यांनी सांगितले.

समाजातील कोणत्याही व्यक्तीवर अन्याय, अत्याचार झाला असेल तर तुम्ही कायद्यानुसार त्याच्यावर कारवाई करू शकता मात्र कोणालाही कायदा हातात घेण्याची गरज नाही असं म्हणत त्यांनी चित्रा वाघ यांना टोला लगावला आहे.

अभिनेत्री उर्फी जावेद असेल किंवा इतर गोष्टी असतील त्यांनी जर समाजातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला तर कारवाई ही केलीच जाईल.

मात्र त्याच वेळी उर्फी जावेद हिच्या जीविताला धोका निर्माण करायचा कोणी प्रयत्न केला जात असेल तर त्याला सुरक्षा व्यवस्था पोहचवण्याचं कामही कायदा सुव्यवस्था करत असते असंही त्यांना यावेळी सांगितले.

Follow Us
गृहमंत्री अमित शहांनी गोळीबाराचे आदेश दिले असो की नसो दोषी तेच, कारण..
गृहमंत्री अमित शहांनी गोळीबाराचे आदेश दिले असो की नसो दोषी तेच, कारण.... बड्या नेत्याच्या विधानानं खळबळ
तुकाराम मुंढेंविरोधात तब्बल 29 कर्मचाऱ्यांचा एल्गार...
मोठी बातमी! तुकाराम मुंढेंविरोधात तब्बल 29 कर्मचाऱ्यांचा एल्गार; थेट मंत्र्यांकडे घेतली धाव
तिला' मंत्रिमंडळात ठेवलं आहे, अन्... गिरीश महाजन आणि विजय चौधरींमधील..
तिला' मंत्रिमंडळात ठेवलं आहे, अन्... गिरीश महाजन आणि विजय चौधरींमधील कथित व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय?
धनुष्यबाण कोणाच्या हाती? ठाकरे की शिंदे?; सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Shiv Sena | धनुष्यबाण कोणाच्या हाती? ठाकरे की शिंदे?; शिवसेना चिन्ह वादावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत...
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय, त्यांनीच... दिल्ली लाठीचार्जबाबत राहुल गांधींचा धक्कादायक दावा
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे...
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे भोपाळ शहरात तणाव, नेमकं प्रकरण काय?
तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता विना परवाना शाळांमध्ये...
Tukaram Mundhe | तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता परवाना नसेल तर शाळांमध्ये अन्न पुरवठा करता येणार नाही; 50 मीटर परिसरात...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन म्हणत केलं वादग्रस्त वक्तव्य!
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside...
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside Story समोर