AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“अजूनही सावित्रींच्या लेकींचा संघर्ष सुरूच”; रुपाली चाकरणकर यांनी ‘तिच्या’ दुःखाची कारणच सांगितली…

सोशल मीडियावरील उर्फी जावेद अभिनेत्रीच्या फोटोवरून चित्रा वाघ यांनी तिचे थोबाड रंगवण्याची भाषा केली आहे. त्यावर रुपाली चाकणकर यांनी महाराष्ट्रात राज्यात कायद्याचे राज्य आहे.

अजूनही सावित्रींच्या लेकींचा संघर्ष सुरूच; रुपाली चाकरणकर यांनी 'तिच्या' दुःखाची कारणच सांगितली...
| Edited By: महादेव कांबळे | Updated on: Jan 03, 2023 | 9:08 PM
Share

नायगावः सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी नायगाव येथील शाळेला भेट दिली. त्यावेळी त्यांनी समाजातील व्यक्ती बदलल्या पण प्रवृत्ती तशाच राहिल्या असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. समाजातील व्यक्ती बदलल्या असल्या तरी समाजातील प्रवृत्ती कायमस्वरूपी त्याच राहिल्या असल्याने आजच्या काळातही सावित्रींच्या लेकींचा संघर्ष सुरूच असल्याची भावनाही रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केली.

सावित्रीबाई फुले यांच्या 175 वर्षांचा इतिहास पाहता, सावित्रीबाई फुले यांनी समाजातील अनिष्ठ आणि कर्मठ शक्तींविरोधात लढत त्यांनी सावित्रींच्या लेकींसाठी ज्ञानाची कवाडे खुली केली आहेत.

तरीही आजच्या काळात व्यक्ती बदलल्या आहेत, मात्र प्रवृत्ती त्याच राहिल्या आहेत, त्यामुळे सावित्रींच्या लेकींचा हा संघर्ष सुरूच असल्याचेही त्यांनी सांगितले.

सावित्रीबाई फुले यांची जयंती होत असतानाच राज्यात अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांचाही वाद शिगेला पोहचला आहे.

सोशल मीडियावरील उर्फी जावेद अभिनेत्रीच्या फोटोवरून चित्रा वाघ यांनी तिचे थोबाड रंगवण्याची भाषा केली आहे. त्यावर रुपाली चाकणकर यांनी महाराष्ट्रात राज्यात कायद्याचे राज्य आहे.

प्रत्येक ठिकाणी एक व्यवस्था काम करत असते. त्यामुळे कोणीही थोबाड रंगवण्याची आणि कायदा हातात घेण्याची भाषा करू नये असंही रुपाली चाकणकर यांनी सांगितले.

समाजातील कोणत्याही व्यक्तीवर अन्याय, अत्याचार झाला असेल तर तुम्ही कायद्यानुसार त्याच्यावर कारवाई करू शकता मात्र कोणालाही कायदा हातात घेण्याची गरज नाही असं म्हणत त्यांनी चित्रा वाघ यांना टोला लगावला आहे.

अभिनेत्री उर्फी जावेद असेल किंवा इतर गोष्टी असतील त्यांनी जर समाजातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला तर कारवाई ही केलीच जाईल.

मात्र त्याच वेळी उर्फी जावेद हिच्या जीविताला धोका निर्माण करायचा कोणी प्रयत्न केला जात असेल तर त्याला सुरक्षा व्यवस्था पोहचवण्याचं कामही कायदा सुव्यवस्था करत असते असंही त्यांना यावेळी सांगितले.

Follow Us
मनोज जरांगे पाटील चर्चेला आले तर सरकार सामोरे जाणार; भरत गोगावले...
मनोज जरांगे पाटील चर्चेला आले तर सरकार सामोरे जाणार; भरत गोगावले यांचे मोठे विधान
लालबागच्या राजाच्या दर्शनाचे कव्हरेज करताना पत्रकारांना अडवले; वैध...
लालबागच्या राजाच्या दर्शनाचे कव्हरेज करताना पत्रकारांना अडवले; वैध पास असूनही पोलिसांची अडवणूक
मरण पत्करेन, पण सरकारला शरण जाणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार
मरण पत्करेन, पण सरकारला शरण जाणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार, मुंबईला रवाना
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर भोजन...
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर स्नेहभोजन अन् बाप्पाचे दर्शन
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह...
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह संध्याकाळी ७ वाजता उपस्थिती
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?
दिशा सालियान प्रकरणात मोठा ट्विस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरे...
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणात नवा ट्वीस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरेंचं नाव नाहीच...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णायक सुनावणी? शिंदेंचे वकील करणार...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णयाक सुनावणी... शिंदेंचे वकिल करणार युक्तिवाद
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन