AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तपोवन वृक्षतोडीवरून सयाजी शिंदेंचा सरकारला थेट सवाल, “निवडून दिलं म्हणजे सगळे…”

कुंभमेळ्यासाठी तपोवनातील वृक्षतोडीविरोधात अभिनेते सयाजी शिंदे यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे. मोठी झाडं तोडायची आणि नवीन झाडं लावायची हे चूक आहे. काही माणसं मारायची आणि त्यांना मूल बक्षिस म्हणून द्यायचं, अस कुठे होतं का, असा सवाल त्यांनी केला.

तपोवन वृक्षतोडीवरून सयाजी शिंदेंचा सरकारला थेट सवाल, निवडून दिलं म्हणजे सगळे...
Devendra Fadnavis and Sayaji ShindeImage Credit source: Instagram
| Updated on: Dec 04, 2025 | 12:03 PM
Share

नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी तपोवनासाठी वृक्षतोडीविरोधात अभिनेते सयाजी शिंदे यांनी ठाम भूमिका मांडली आहे. निवडून दिलं म्हणजे म्हणजे सगळे अधिकार तुमच्याकडे आहेत असं नाही, अशी रोखठोक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. “मी जागरूक नाशिककरांना पाठिंबा द्यायला गेलो होते. जिथे झाडं तुटतील तिथे आपण उभं राहिलं पाहिजे. उजाड माळरानाच्या ठिकाणी आम्ही झाडं लावणार. तिथे झाडं नाहीत, कारण तिथली माती चांगली नाही. तिथे कुंभ मेळा भरवला पाहिजे. निवडून दिलं म्हणजे म्हणजे सगळे अधिकार तुमच्याकडे आहेत असं नाही. सर्वसामान्य माणसाचा विचार केला पाहिजे. मोठी झाडं तोडायची आणि नवीन झाडं लावायची हे चूक आहे. काही माणसं मारायची आणि त्यांना मूल बक्षिस म्हणून द्यायचं, अस कुठे होतं का,” असा सवाल सयाजी शिंदेंनी केला.

राजकारणाबदल माझा अभ्यास नाही, पण झाडाबद्दल राजकारण करू नका. अजितदादांनी पाठिंबा दिला तसा भाजपच्याही काही लोकांनी पाठिंबा दिला आहे. 50 फूटी झाडं तोडायची आणि त्या बदल्यात नवी झाडं लावायची.. एवढी मोठी पळवाट शोधू नका. चुकीचा निर्णय होता कामा नये. सगळी झाडे जगली पाहिजेत. झाडांचा आधी विचार नंतर माणसांचा विचार केला पाहिजे. सगळं आनंदाने व्हावं, अशी प्रतिक्रिया सयाजी शिंदेंनी दिली.

गुणरत्न सदावर्तेंना प्रत्युत्तर

साधू आले-गेले काही फरक पडत नाही, पण झाडं गेली तर फरक पडतो, असं वक्तव्य सयाजी शिंदेंनी केलं होतं. त्यावर गुणरत्न सदावर्ते यांनी साधू-संतांचा अपमान सहन करणार नाही, असं म्हटलं होतं. त्यावर आपण आपले बरे आहोत तिथे खरे, असं प्रत्युत्तर सयाजी शिंदेंनी दिलं. बाकीचे लोक काय बोलतात, त्यांचं त्यांनाच धन्यवाद. त्यांना त्याचं लखलाभ, मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही, असंही ते म्हणाले.

अजित पवार-देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिक्रिया

तपोवनातील वृक्षतोडीविरोधात कलाकार मैदानात उतरले आहेत. सयाजी शिंदेंनी घेतलेली भूमिका पर्यावरणहिताची आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तर काहीजण राजकीय कारणाने पर्यावरणवादी बनलेत, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

नाशिकमधल्या आगामी कुंभमेळ्यासाठी तपोवनातील झाडं तोडण्याला अभिनेते सयाजी शिंदे यांनी विरोध केला आहे. सयाजी शिंदेंच्या या भूमिकेला अजित पवारांनी ट्विट करत पाठिंबा दिला. तपोवनातील वृक्षतोडीच्या संदर्भात समोपचारानं तोडगा काढला पाहिजे. यासंदर्भात अभिनेते सयाजी शिंदे यांनी घेतलेली भूमिका पर्यावरण हिताची आहे. विकासाबरोबर पर्यावरणाचा समतोल राखणं ही देखील काळाजी गरज आहे. पर्यावरण वाचलं तरच पुढची पिढी सुरक्षित राहील, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे, असं ट्विट अजित पवारांनी केलंय.

कुंभमेळा हा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, पर्यावरणही महत्त्वाचं आहे. काही लोकं राजकीय कारणानंदेखील पर्यावरणवादी बनले आहेत. काही लोकांना असं वाटतंय की कुंभमेळ्यात अडथळेच यावेत, अशा लोकांना आम्ही सांगतो की अडथळे येऊ देणार नाही, असं फडणवीस म्हणाले.

वृक्षतोडीविरोधात कलाकार एकवटले

तपोवनातील वृक्षतोडीविरोधात कलाकारसुद्धा मैदानात उतरले आहेत. नाशिकमधील अनेक नाट्य, चित्रपट, संगीत, कला क्षेत्रातील कलाकार मंडळींनी एकत्र येत भव्य निषेध आंदोलन केलं. अनिता दाते, चिन्मय उदगीरकर यांच्यासह इतरही कलाकार मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. लहानपणापासून तपोवन बघतेय, इथली वनसंपदा टिकली पाहिजे, असं अनिता दाते म्हणाली. तर तपोवन वाचवा, तपोवन वाढवा हा आमचा नारा आहे, असं चिन्मय म्हणाला.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला