AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jayant Patil : असा शब्द वापरण्याची गरज नाही, कारण दादांच्या निधनानंतर सीन..जयंत पाटलांनी जे काय आहे ते स्पष्टच सांगून टाकलं

Jayant Patil : जयंत पाटील काल रात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर त्यांना भेटायला गेले होते. त्यावेळी तिथे प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे असल्याने वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. यामुळे निर्माण होणाऱ्या बऱ्याच प्रश्नांवर जयंत पाटील यांनी उत्तर दिलं आहे.

Jayant Patil : असा शब्द वापरण्याची गरज नाही, कारण दादांच्या निधनानंतर सीन..जयंत पाटलांनी जे काय आहे ते स्पष्टच सांगून टाकलं
Jayant Patil
| Updated on: Jul 15, 2026 | 12:00 PM
Share

काल रात्री वर्षावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी तिथे सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल होते. त्यावरुन राजकारणात विविध चर्चा, तर्क-वितर्क सुरु झाले आहेत. आता यावर स्वत: जयंत पाटील यांनी समोर येऊन स्पष्टीकरण दिलं आहे. “मी ईश्वपूर नगराध्यक्ष अपात्रतेसंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलेलो. निर्णय चुकीचा झाला एवढच मला त्यांच्या कानावर घालायचं होतं. निवदेन दिलं नाही. अशी काही भानगड नाही” असं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिलं.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या मुद्यावर ते म्हणाले की, “प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत माझी विलिनीकरणासंदर्भात कधी भेट झाली नाही. त्यामुळे विलिनीकरणाचा प्रश्नच उदभवत नाही” त्यावर पत्रकाराने विचारलं की, मग, विलिनीकरणाची चर्चा आता थांबलाीय का, त्यावर जयंत पाटील म्हणाले की, “अजितदादांच्या निधनानंतर अशी कोणतीही चर्चा कोणाबरोबरही झालेली नाही. त्यामुळे ती थांबलीय असा शब्दा वापरण्याची गरज नाही. जे सुरु असतं, ते थांबतं. दादांच्या निधनानंतर सीन वेगळा आहे” अजितदादा हयात असताना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाच्या चर्चा झाल्याचं जयंत पाटील यांनी अप्रत्यक्षपणे मान्य केलं.

म्हणून काही योगायोग असेल तरी त्यातून राजकीय अर्थ निघतोय

विनोद तावडे यांच्यासोबत पंचतारांकीत हॉटेलमध्ये झालेल्या भेटीसंदर्भातही जयंत पाटील बोलले. “विधानसभा संयुक्त संसदीय समितीची ओबेरायच्या वरच्या मजल्यावर बैठक होती. दुसऱ्याबाजूला बँकर्सची बैठक होती. टेबल मांडलेले तिथे. सुप्रिया ताईना तिथे मी भेटण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी विनोद तावडेंसोबत कॉफी घेतली” असं जयंत पाटील यांनी सांगितलं. महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार हे भाजपसोबत जाणार अशा चर्चा रंगल्या आहेत. त्यात सध्या काही घडामोडी अशा घडतायत की त्यातून दोन्ही पक्ष जवळ येत चालल्याचं चित्र दिसत आहे. म्हणून काही योगायोग असेल तरी त्यातून राजकीय अर्थ निघत आहेत.

Follow Us
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?
छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! VIDEO पाहून तुम्हीही...
Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…
एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही!
Laxaman Hake | एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही! लक्ष्मण हाके भडकले; OBC आरक्षणावरून सरकारलाही घेरलं