AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Pawar : शेतकऱ्यांशी चुकूनही दगाफटका करू नये ही विनंती, अन्यथा..कर्जमाफी योजनेवरुन रोहित पवारांचा इशारा

Rohit Pawar : शेतकरी कर्जमाफी योजनेवरुन वादविवाद सुरु आहेत. कारण सरसकट सर्व शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार नाहीय. त्यावरुनच रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

Rohit Pawar : शेतकऱ्यांशी चुकूनही दगाफटका करू नये ही विनंती, अन्यथा..कर्जमाफी योजनेवरुन रोहित पवारांचा इशारा
Rohit Pawar
| Updated on: Jun 08, 2026 | 11:37 AM
Share

शेतकरी कर्जमाफी योजनेमुळे खरंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला पाहिजे. पण महाराष्ट्र सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेवरुन वाद वाढत चालला आहे. याचं मुख्य कारण आहे, सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळणार नाहीय. महायुती सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी जवळपास 36 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पण या योजनेत काही अटी सुद्धा घालण्यात आल्या आहेत. ज्याचा राज्यातील 12 लाख 71 हजार शेतकऱ्यांना फटका बसेल असा अंदाज आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या या शेतकरी कर्जमाफी योजनेवरुन वातावरण तापत चाललं आहे. आता शरद पवार पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी एक्सवरुन पोस्ट करुन इशारा दिला आहे.

मंत्रिमंडळ बैठकीची एक नोट बाहेर आली आहे. या नोटमधला मजकूर रोहित पवार यांनी पोस्ट केला आहे. “मंत्रिमंडळ बैठकीच्या नोटमध्ये स्वतः सरकारच सांगत आहे की ‘अटी-शर्ती टाकल्याने कर्जमाफीसाठी कमीत कमी निधी लागेल’, हा आहे या फसव्या सरकारचा फसवा चेहरा ! आहे” अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे. “हा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांना सर्वात आधी हाणले पाहिजे, शेतकऱ्यांप्रती संवेदना नसणारे अधिकारी सरकारमध्ये असले तरी काही प्रमाणात शेतकरीपुत्र देखील आहेत, ही नोट बाहेर आणणाऱ्या अधिकाऱ्याचे सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आभार…!” असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

शेतकऱ्यांशी चुकूनही दगाफटका करू नका

“मंत्रिमंडळ बैठकीत ही नोट मांडली गेली असताना एकाही मंत्र्याने तोंड उघडले नाही, सर्व मूग गिळून गप्प बसले याच दुःख आहे, कदाचित या योजनेतून टक्केवारीचा मालिदा मिळणार नाही म्हणून गप्प बसले असावेत” असा आरोप रोहित पवार यांनी केला. “सरकारने स्वतःची चूक दुरुस्त करून कर्जमाफीच्या अटी-शर्ती काढाव्यात, शेतकऱ्यांशी चुकूनही दगाफटका करू नये ही विनंती ! सरकार करत असलेल्या या दगाफटक्यातून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी, रक्षणासाठी, #अन्नदात्यासाठी_अन्नत्याग….!” असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे. ही शेतकरी कर्जमाफी योजना स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता संपल्यावर लागू होईल.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात