AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘एकीकडे लाडकी बहीण योजना सुरू करायची अन् दुसरीकडे…’, शरद पवारांचा पुन्हा फडणवीसांवर हल्लाबोल

शरद पवार यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते माणमध्ये बोलत होते.

'एकीकडे लाडकी बहीण योजना सुरू करायची अन् दुसरीकडे...', शरद पवारांचा पुन्हा फडणवीसांवर हल्लाबोल
| Updated on: Nov 16, 2024 | 9:37 PM
Share

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा महायुती सरकार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते माणमध्ये प्रचारसभेत बोलत होते. असं कोणतंही खातं नाही ज्यामध्ये मान तालुक्यातील अधिकारी नाही. सर्व क्षेत्रात या ठिकाणी अधिकारी आहेत. माण तालुक्यातील सर्व नेते एकत्रित आहे, हा संदेश या भागातील लोकांसाठी अत्यंत चांगला आहे. ही एकी अशीच पुढे ठेवायची आहे, असे जर सर्वजण एकत्र उभे राहिले तर या भागातील सर्व प्रश्न सुटतील आणि आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू, या भागातील अनेक प्रश्न आपल्यासमोर आहेत. अलीकडच्या दिवसांमध्ये आम्ही एक संघटन केलं आहे, त्याचं नाव महाविकास आघाडी आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले शरद पवार? 

पुढे बोलताना ते म्हणाले की, आताचे पंतप्रधान 400 पारची घोषणा देत होते. याचा अर्थ जाणून घेतला. त्यांना एकतर संविधानामध्ये बदल करायचा असेल किंवा डॉक्टर बाबासाहेबांची घटना बदलायची असेल. यासाठीच चारशे पारचा नारा दिला जात होता. यासाठी आम्ही लोकसभेत निवडून आल्यानंतर एकत्र येऊन घटनेला धक्का लावायचा नाही यासाठी निर्णय घेतला.  आपल्या भागातील प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्या हातात अधिकार पाहिजेत, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

फडणवीसांवर हल्लाबोल   

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले आम्ही महिलांच्या समस्या सोडवू, काय सोडवल्या तर लाडकी बहीण योजना सुरू केली. एका बाजूला लाडक्या बहिणीचे कौतुक करायचे तर दुसऱ्या बाजुला महिलांवर अत्याचार होत आहेत आणि महाराष्ट्रातील महिला आणि मुली बेपत्ता देखील झाल्या आहेत. एका बाजुला लाडकी बहीण म्हणायचं दुसरीकडे संरक्षणाबाबत काही निर्णय घ्यायचा नाही. अशा सर्व गोष्टीवर एकत्र येऊन नियंत्रण आणण्याची गरज आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही गंभीर बाब आहे. नुसत्या एमआयडीसीने सर्व प्रश्न सुटत नाहीत, आपल्या सर्वांची साथ आवश्यकता आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Follow Us
प्रहारचा आवाज ठाम; एकनाथ शिंदेंचा पाईक होईन पण तडजोड नाही....
प्रहारचा आवाज ठाम; एकनाथ शिंदेंचा पाईक होईन पण तडजोड नाही.....
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! पश्चिम बंगालमध्ये मतदान केंद्रावरील CCTV
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! पश्चिम बंगालमध्ये मतदान केंद्रावरील CCTV.
नाशिक, परतवाड्यानंतर अकोल्यातही लव्ह जिहाद? आधी अपहण नंतर 5 दिवस... प
नाशिक, परतवाड्यानंतर अकोल्यातही लव्ह जिहाद? आधी अपहण नंतर 5 दिवस... प.
99 टक्के ठाकरेच उमेदवार, पण...बॉस इज ऑल्वेज राईट म्हणत नार्वेकरांचे...
99 टक्के ठाकरेच उमेदवार, पण...बॉस इज ऑल्वेज राईट म्हणत नार्वेकरांचे....
सुनेत्रा पवारच विधानपरिषदेसाठी उमेदवार जाहीर करणार? संध्याकाळीच...
सुनेत्रा पवारच विधानपरिषदेसाठी उमेदवार जाहीर करणार? संध्याकाळीच....
मोठी बातमी! बापरे...राज्यात उष्माघाताचा धोका वाढला; तापमान वाढीसोबत...
मोठी बातमी! बापरे...राज्यात उष्माघाताचा धोका वाढला; तापमान वाढीसोबत....
शब्दाचा पक्का माणूस' विलिनीकरणाच्या चर्चेतच बच्चू कडूंचं मोठं विधान
शब्दाचा पक्का माणूस' विलिनीकरणाच्या चर्चेतच बच्चू कडूंचं मोठं विधान.
चक्क 'अरे सोड रे...' म्हणत राऊतांनी पत्रकाराचा 'तो' प्रश्न धुडकावला
चक्क 'अरे सोड रे...' म्हणत राऊतांनी पत्रकाराचा 'तो' प्रश्न धुडकावला.
मस्साजोग ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मोठा उलटफेर, अश्विनी देशमुख....
मस्साजोग ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मोठा उलटफेर, अश्विनी देशमुख.....
ममता बॅनर्जींच्या पराभवासाठी पॅरामिलिटरी फोर्स म्हणत राऊतांचे.....
ममता बॅनर्जींच्या पराभवासाठी पॅरामिलिटरी फोर्स म्हणत राऊतांचे......