AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar on Raj Thackeray : छत्रपतींचं नाव का घेत नाहीत? राज ठाकरेंच्या सवालाला शरद पवारांचं पुराव्यानिशी उत्तर

ठाण्यातील उत्तर सभेत राज ठाकरे यांनी शरद पवारांवर जातीयवादी राजकारण केल्याचा आरोप केला. त्यावर शरद पवार यांनी सडेतोड स्पष्टीकरण दिलं.

Sharad Pawar on Raj Thackeray : छत्रपतींचं नाव का घेत नाहीत? राज ठाकरेंच्या सवालाला शरद पवारांचं पुराव्यानिशी उत्तर
राज ठाकरेंच्या आरोपांना शरद पवार यांचं उत्तर Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Apr 13, 2022 | 1:43 PM
Share

मुंबई : महाराष्ट्र हा नेहमीच सर्वात आधी छत्रपती शिवरायांचा (Chatrapati Shivaji Maharaj) आहे, पण शरद पवार छत्रपतींचं नाव न घेता आपल्या सभांमध्ये शाहू फुले आंबेडकरांचंच नाव घेतात, असा थेट आरोप राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केला. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी स्पष्टीकरण दिलं. फुले शाहू आंबेडकरांचं मी नाव घेतो, याचा मला अभिमान आहे. पण शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रासाठीचं योगदानही मी मानतो. दोनच दिवसांपूर्वी मी अमरावतीतलं भाषण मागवून घेतलं. शिवाजी महाराजांचं योगदान या विषयावर मी 25 मिनिटं बोललो आहे. त्यात मी अनेक गोष्टी सांगितल्या. पण कोण काय बोलंलंय, हे वृत्तपत्र न वाचताच वक्तव्य करणाऱ्यांचं असं होतं, असा टोला शरद पवार यांनी लगावला.

छत्रपतींचं नाव का घेत नाही?

छत्रपती शिवरायांचं नाव शरद पवार का घेत नाही, या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार यांनी दोन मुद्दे सादर केले. एक म्हणजे त्यांनी अमरावतीत दोन दिवसांपूर्वी केलेल्या भाषणाचा उल्लेख केला. हे भाषण मी काही वेळापूर्वीच मागवून घेतलं असून त्यात मी छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रासाठीच्या योगदानावर पंचवीस मिनिटे बोललो आहे, त्यात मी अनेक गोष्टी सांगितल्याचे पवारांनी सांगितले. दुसरा मुद्दा सांगताना पवार म्हणाले, ‘ माझ्या भाषणात फुले शाहू आंबेडकर यांचाच उल्लेख केला जातो. त्याचा मला अभिमान आहे. या राज्यात शिवाजी महाराजांबाबत सविस्तर वृत्त काव्यात पहिल्यांदा कोणी लिहिलं असेल तर ते फुल्यांनी लिहिलं. आंबेडकर , शाहू आणि फुले हे शिवाजी महाराजांवर आस्था असणारे घटक आहेत. महाराजांचा आदेश लक्षात घेऊन आपल्या हातातील सत्तेचा वापर कसा करावा याची भूमिका त्यांनी मांडली. त्यांचा उल्लेख करणं म्हणजे शिवाजी महाराजांचा विचारच मांडणं आहे, असं स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिलं.

पुरंदरेंबाबत काय म्हणाले शरद पवार?

शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासून जातीपातीचं राजकारण करतात, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. यावर पुढे स्पष्टीकरण देताना शरद पवार म्हणाले, ‘ पुरंदरेंबाबत मी बोललो असेन. त्यांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख करताना जिजामातेनं शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्त्व घडवलं हे सांगण्याऐवजी दादाजी कोंडदेव यांनी योगदान दिलं असं सांगितलं. त्याला माझा सख्त विरोध होता. शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्त्व हे राजमाता जिजामातेने कष्टाने उभं केलं. त्या व्यक्तिमत्त्वाचं मोठेपण या पदापर्यंत पोहोचायला कुणाचं योगदान होतं तर ते जिजाऊंचं होतं. पण पुरंदरेंनी त्याबाबत वेगळं मत मांडलं. ते योग्य नव्हतं. ते माझं मत आजही आहे. तेव्हाही होता.

इतर बातम्या-

Kisan Morcha : लढा हमीभावाचा, देशभर जनजागृती, संयुक्त किसान मार्चाचे धोरण काय ?

Jitendra Awhad: राजकीय व्यासपीठावर नवा ‘जॉनी लिव्हर’ आलाय; आव्हाडांचे राज यांना शालजोडीतून फटकारे

Follow Us
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.