AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar on Raj Thackeray : छत्रपतींचं नाव का घेत नाहीत? राज ठाकरेंच्या सवालाला शरद पवारांचं पुराव्यानिशी उत्तर

ठाण्यातील उत्तर सभेत राज ठाकरे यांनी शरद पवारांवर जातीयवादी राजकारण केल्याचा आरोप केला. त्यावर शरद पवार यांनी सडेतोड स्पष्टीकरण दिलं.

Sharad Pawar on Raj Thackeray : छत्रपतींचं नाव का घेत नाहीत? राज ठाकरेंच्या सवालाला शरद पवारांचं पुराव्यानिशी उत्तर
राज ठाकरेंच्या आरोपांना शरद पवार यांचं उत्तर Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Apr 13, 2022 | 1:43 PM
Share

मुंबई : महाराष्ट्र हा नेहमीच सर्वात आधी छत्रपती शिवरायांचा (Chatrapati Shivaji Maharaj) आहे, पण शरद पवार छत्रपतींचं नाव न घेता आपल्या सभांमध्ये शाहू फुले आंबेडकरांचंच नाव घेतात, असा थेट आरोप राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केला. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी स्पष्टीकरण दिलं. फुले शाहू आंबेडकरांचं मी नाव घेतो, याचा मला अभिमान आहे. पण शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रासाठीचं योगदानही मी मानतो. दोनच दिवसांपूर्वी मी अमरावतीतलं भाषण मागवून घेतलं. शिवाजी महाराजांचं योगदान या विषयावर मी 25 मिनिटं बोललो आहे. त्यात मी अनेक गोष्टी सांगितल्या. पण कोण काय बोलंलंय, हे वृत्तपत्र न वाचताच वक्तव्य करणाऱ्यांचं असं होतं, असा टोला शरद पवार यांनी लगावला.

छत्रपतींचं नाव का घेत नाही?

छत्रपती शिवरायांचं नाव शरद पवार का घेत नाही, या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार यांनी दोन मुद्दे सादर केले. एक म्हणजे त्यांनी अमरावतीत दोन दिवसांपूर्वी केलेल्या भाषणाचा उल्लेख केला. हे भाषण मी काही वेळापूर्वीच मागवून घेतलं असून त्यात मी छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रासाठीच्या योगदानावर पंचवीस मिनिटे बोललो आहे, त्यात मी अनेक गोष्टी सांगितल्याचे पवारांनी सांगितले. दुसरा मुद्दा सांगताना पवार म्हणाले, ‘ माझ्या भाषणात फुले शाहू आंबेडकर यांचाच उल्लेख केला जातो. त्याचा मला अभिमान आहे. या राज्यात शिवाजी महाराजांबाबत सविस्तर वृत्त काव्यात पहिल्यांदा कोणी लिहिलं असेल तर ते फुल्यांनी लिहिलं. आंबेडकर , शाहू आणि फुले हे शिवाजी महाराजांवर आस्था असणारे घटक आहेत. महाराजांचा आदेश लक्षात घेऊन आपल्या हातातील सत्तेचा वापर कसा करावा याची भूमिका त्यांनी मांडली. त्यांचा उल्लेख करणं म्हणजे शिवाजी महाराजांचा विचारच मांडणं आहे, असं स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिलं.

पुरंदरेंबाबत काय म्हणाले शरद पवार?

शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासून जातीपातीचं राजकारण करतात, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. यावर पुढे स्पष्टीकरण देताना शरद पवार म्हणाले, ‘ पुरंदरेंबाबत मी बोललो असेन. त्यांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख करताना जिजामातेनं शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्त्व घडवलं हे सांगण्याऐवजी दादाजी कोंडदेव यांनी योगदान दिलं असं सांगितलं. त्याला माझा सख्त विरोध होता. शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्त्व हे राजमाता जिजामातेने कष्टाने उभं केलं. त्या व्यक्तिमत्त्वाचं मोठेपण या पदापर्यंत पोहोचायला कुणाचं योगदान होतं तर ते जिजाऊंचं होतं. पण पुरंदरेंनी त्याबाबत वेगळं मत मांडलं. ते योग्य नव्हतं. ते माझं मत आजही आहे. तेव्हाही होता.

इतर बातम्या-

Kisan Morcha : लढा हमीभावाचा, देशभर जनजागृती, संयुक्त किसान मार्चाचे धोरण काय ?

Jitendra Awhad: राजकीय व्यासपीठावर नवा ‘जॉनी लिव्हर’ आलाय; आव्हाडांचे राज यांना शालजोडीतून फटकारे

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली