AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी बोलले उद्धव ठाकरे यांना सोडायचं नव्हतं, आता अमित शाह यांच्या भेटीला, मंत्री संजय राठोड यांच्या मनात नेमकं काय?

मंत्री संजय राठोड यांनी दोन दिवसांपूर्वीच बीडमध्ये आपल्याला उद्धव ठाकरे यांची साथ सोडायची नव्हती. पण समाजाच्या विकासासाठी आपल्याला शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घ्यावा लागला, असं मोठं वक्तव्य केलेलं. त्यानंतर ते आज दिल्लीत दाखल झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आधी बोलले उद्धव ठाकरे यांना सोडायचं नव्हतं, आता अमित शाह यांच्या भेटीला, मंत्री संजय राठोड यांच्या मनात नेमकं काय?
| Edited By: | Updated on: Jun 06, 2023 | 3:58 PM
Share

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे नेमक्या काय घडामोडी घडत आहेत त्यांना सध्याच्या घडीला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकर होण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात केवळ 14 जणांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. अर्थात याबाबतच्या घडामोडी एकीकडे घडत असताना दिल्लीत आज वेगळंच काहीतरी बघायला मिळालं आहे. महाराष्ट्राचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री आज चक्क दिल्लीत दाखल झाले आहेत. ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी दिल्लीत दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. त्यानुसार ते आज अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे राठोड यांनी दिल्लीत पोहोचल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

मंत्री संजय राठोड यांनी दोन दिवसांपूर्वीच बीडमधील कार्यक्रमात मोठं वक्तव्य केलं होतं. राज्यात सत्तांतर झालं त्यावेळी आपल्याला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत राहायचं होतं. पण धर्मगुरू बाबूसिंग महाराज यांनी शिंदे गटासोबत जाण्याचा सल्ला दिला होता. पोहरादेवीच्या विकासासाठी शिंदे गटात जाण्याचा सल्ला धर्मगुरुंनी दिला. त्यामुळे आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आल्याचं संजय राठोड नुकतंच म्हणाले होते.

संजय राठोड नेमकं काय म्हणाले?

संजय राठोड दोन दिवसांपूर्वी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणात महत्त्वाचं वक्तव्य केलं. “जेव्हा राज्यात घडामोडी झाल्या पक्षात फूट पडली तेव्हा मी ठरवले होते आपण उद्धव ठाकरे यांना सोडून जायचे नाही. बाबू महाराज यांनी मला सांगितले, आपल्या पोहरादेवी गडाचा विकास करायचा असेल तर आपल्याला शिंदे गटासोबत जावे लागेल. त्यानुसार मी शिंदे गटात गेलो”, असं संजय राठोड म्हणाले.

“मला गुहावटीला जायचं नव्हतं. आमचे धर्मगुरू बाबूसिंग महाराज यांनी जायला सांगितले. समाजासाठी मला जावे लागले. पोहरादेवीचा आदेश माझ्यासाठी अंतिम आहे. समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी मला महाराजांनी सांगितले. आमच्या समाजाचे नेते हरिभाऊ राठोड केसीआरमध्ये गेले, मी त्यांना शुभेच्छा दिल्या”, असंही ते म्हणाले.

“संख्याबळ ज्याचा तो मुख्यमंत्री होईल. या सरकारमधून समाजाचे अनेक विकास कामे मार्गी लागली. पोहरादेवीचा देखील विकास होणार आहे”, असा दावा संजय राठोड यांनी केला.

संजय राठोड यांच्या मनात नेमकं काय?

संजय राठोड एकीकडे आपल्याला उद्धव ठाकरे यांची साथ सोडायची नव्हती, असं सांगत आहेत. दुसरीकडे समाजासाठी आपण शिंदे गटासोबत जाण्याचं ठरवलं, असं ते म्हणत आहेत. तर पडद्यामागे वेगळंच काहीतरी घडत आहेत. ते आज थेट दिल्लीत दाखल झाले आहेत. ते अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेमक्या घडामोडी काय घडतात याकडे अनेकांचं लक्ष लागलेलं आहे.

चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...