AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदे गटाच्या या आमदाराचा विजय बोगस मतदारांमुळे, रावसाहेब दानवे यांच्या दाव्याने महाराष्ट्र हादरला

BJP vs Shiv Sena : भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी शिंदे गटाच्या एका आमदाराचा विजय हा बोगस मतदारांमुळे झाल्याचा दावा केला आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

शिंदे गटाच्या या आमदाराचा विजय बोगस मतदारांमुळे, रावसाहेब दानवे यांच्या दाव्याने महाराष्ट्र हादरला
Raosaheb DanveImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Dec 09, 2025 | 10:24 PM
Share

रामू ढाकणे, प्रतिनिधी :  देशभरातील विरोधी पक्षांनी बोगस मतदानाचा मुद्दा उपस्थित केला आहे. खासकरून राहुल गांधी अनेकदा सत्ताधारी पक्षांवर मतचोरीचाही आरोप केला आहे. अशातच आता भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी शिंदे गटाच्या एका आमदाराचा विजय हा बोगस मतदारांमुळे झाल्याचा दावा केला आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. विरोधी पक्ष बोगस मतदानाचा मुद्दा उपस्थित करत असताना आता सत्ताधारी पक्षातील नेतेही तीच भाषा वापरू लागले आहेत. रावसाहेब दानवे यांनी कोणत्या आमदारावर हा आरोप केला ते जाणून घेऊयात.

भाजपचा विजय होणार – दानवे

भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांचा विजय बोगस मतदारांमुळे झालेला आहे असा दावा केला आहे. ‘स्थानिक स्वराज्य संस्थांचा निकाल भाजपच्या बाजूने लागेल, परंतु ज्या ठिकाणी सामाजिक समीकरण बिघडलेले आहे त्या ठिकाणचा निकालाची आम्ही खात्री देऊ शकत नाही असं रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.

अब्दुल सत्तार यांचा विजय बोगस मतदारांमुळे झाला – दानवे

पुढे बोलताना दानवे यांनी, मी बोगस मतदारांचा पुरावा दिलेला आहे, नाव एकाच फोटो दुसऱ्याचा. भोकरदन मधील 3 हजार 200 नाव सिल्लोडमध्ये आहेत आणि ते मी निवडणूक आयोगाला देणार आहे. बाहेरून मतदार घेऊन आणि त्यांचं मतदान डबल टिबल करून जिंकणं यात काही फार शौर्य नाही. विधानसभेला सुद्धा तेच झालं आणि 100% अब्दुल सत्तारांचा विजय हा बोगस मतदारांमुळे झालेला आहे असा दावा केला आहे.

काँग्रेस नेत्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही – दानवे

काँग्रेस नेत्यांनी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यावर बोलताना दानवे यांनी म्हटले की, ‘त्यांचा लोकशाहीवर कुठे भरोसा आहे आणि ते कुठे लोकशाही मानतात? त्यांनी जर लोकशाही मानली असती तर विरोधी पक्षाच्या लोकांना आणीबाणी मध्ये जेलमध्ये टाकलं नसतं. यांचा सरकारवर भरोसा नाही, निवडणूक आयुक्तावर भरोसा नाही, जनतेवर भरोसा नाही. यांनी मत चोरीचा मुद्दा घेऊन बिहारची निवडणूक लढवली तर तिथल्या जनतेने यांना उत्तर दिलेले आहे. शेवटी असं होईल राहुल गांधी जर व चोरीचा मुद्दा नेहमी उपस्थित करतात आणि नेहमी हरत आहेत. त्यामुळे त्यांचे जे मित्र आहेत ते सुद्धा यांच्याबरोबर राहणार नाहीत.

Follow Us
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
Girish Mahajan | रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड