AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेनेचा गुजराती बांधवांचा मेळावा स्थगित

शिवसेनेचा गुजराती बांधवांचा मेळावा आणि लोकप्रिय 'डायरो' हा कार्यक्रम स्थगित करण्यात आला असल्याची माहिती हेमराज शाह यांनी दिली आहे (Shivsena Gujarati Programme Postpone )

शिवसेनेचा गुजराती बांधवांचा मेळावा स्थगित
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
| Updated on: Feb 20, 2021 | 1:28 PM
Share

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शिवसेनेचा ‘डायरो’ आणि गुजराती बांधवांचा मेळावा स्थगित करण्यात आला आहे. कोरोनामुक्तीसाठी शासकीय यंत्रणेला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. शिवसेनेच्या गुजराती विभागातर्फे मुंबईमध्ये ‘जलेबी फाफडा, उद्धव ठाकरे आपणा’ ही घोषणा देत एकापाठोपाठ एक असे दोन मेळावे प्रचंड प्रमाणात यशस्वी झाले. पहिला जलेबी फाफडा, दुसरा रासगरबा कमालीचा यशस्वी झाला. रविवार, 21 फेब्रुवारी 2021 रोजी ‘डायरो’ हा लोकप्रिय कार्यक्रम शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शाह यांनी आयोजित केला होता. (Shivsena Gujarati Programme Postpone Due to Corona outbreak)

सर्व तयारी पूर्ण झाली होती. परंतु गेल्या काही दिवसांत कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. मुंबई आणि परिसरात या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. महाविकास आघाडी सरकारने यावर नियंत्रण आणण्यासाठी पराकोटीचे प्रयत्न सुरु केले आहेत. नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे शिवसेनेचा गुजराती बांधवांचा मेळावा आणि लोकप्रिय ‘डायरो’ हा कार्यक्रम स्थगित करण्यात आला असल्याची माहिती हेमराज शाह यांनी दिली आहे. मुंबईमधील परिस्थिती निवळल्यानंतर हा कार्यक्रम दणदणीतपणे आयोजित करण्यात येईल, असेही हेमराज शाह यांनी आवर्जून नमूद केले आहे.

‘एक वचन, तीन नियम’

‘एक वचन, तीन नियम’ या अंतर्गत मास्क च्या वापराची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, हात स्वच्छ धुवावेत आणि सामाजिक अंतर योग्य पद्धतीने राखण्यात यावे, असे कळकळीचे आवाहन करुन हेमराज शाहांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा, विनाकारण कुठेही गर्दी करु नका, विशेषतः वरिष्ठ नागरिक आणि दहा वर्षाखालील मुलांना घराबाहेर पाठवू नका, असेही स्पष्ट केले आहे.

कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी राज्य सरकार, मुंबई महानगरपालिका आणि यंत्रणेला सर्वतोपरी सहकार्य करावे, अशीही विनंती हेमराज शाह यांनी केली आहे.

‘मुंबई मा जलेबी ने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर असलेल्या गुजराती मतदारांना आकर्षिक करण्यासाठी शिवसेनेने मुंबईत ‘मुंबई मा जलेबी ने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ अशी घोषणा देत जिलेबी, फाफडा आणि वडापावचा मुंबईत बेत आखला होता. या कार्यक्रमाला गुजराती बांधवांना बोलवण्यात आलं होतं. शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शाह आणि कल्पेश मेहता यांच्या नेतृत्वात या भोजन समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याला गुजराती बांधवांनी चांगला प्रतिसाद दिला होता.

संबंधित बातम्या :

‘जिलेबी-फाफडा डिप्लोमसी’ सक्सेस, आता ‘रासगरबा’; 21 गुजराती उद्योगपतींचा रविवारी शिवसेनेत प्रवेश!

‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’; मुंबई जिंकण्यासाठी शिवसेनेची गुजराती मतदारांना साद

(Shivsena Gujarati Programme Postpone Due to Corona outbreak)

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.