AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : दराडे हरले कसे? नाशिकच्या धक्कादायक निकालावर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

Eknath Shinde : राज्यातील 11 विधान परिषदेच्या जागांचा निकाल जाहीर होत आहे. यात सर्वाधिक धक्कादायक निकालाची नोंद नाशिकमध्ये झाली आहे. इथून महायुतीचे एकनाथ शिंदे शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव झाला आहे. त्यावर आता एकनाथ शिंदे स्वत: व्यक्त झाले आहेत.

Eknath Shinde : दराडे हरले कसे? नाशिकच्या धक्कादायक निकालावर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde
| Updated on: Jun 22, 2026 | 10:44 AM
Share

विधान परिषद निवडणुकीत नाशिकमध्ये सर्वात मोठा उलटफेर झाला आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव झाला आहे. स्वत: एकनाथ शिंदे यांनी या पराभवाची दखल घेतली आहे. शिवसेना उमेदवार नरेंद्र दराडे यांचा नाशिक मध्ये पराभव झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सर्व माहिती मागवली आहे. या पराभवावर एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महायुती धर्माचे पालन का झालं नाही ? याबद्दल एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. नाशिकमधले पदाधिकारी आणि उदय सामंत यांच्याकडून एकनाथ शिंदे यांनी माहिती मागवली असं सूत्रांनी सांगितलं. अपक्ष उमेदवार गोकुळ गीते विजयी झाले आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 17 जागांसाठी विधान परिषदेची ही निवडणूक झाली. त्यात 6 जागा आधीच बिनविरोध आल्या होत्या. आज उर्वरित 11 जागांसाठी मतमोजणी झाली. त्यात नाशिकच्या निकालाबद्दल सर्वांनाच उत्सुक्ता होती. कारण नाशिकमध्ये भाजपशी संबंधित असलेल्या गीते बंधुंनी बंडखोरी केली होती. गणेश गीते आणि गोकुळ गीते या दोघांनी उमेदवारी दाखल केली होती. हे गीते बंधु भाजप नेते गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातं. त्यामुळे नाशिकच्या निकालाबद्दल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला शेवटपर्यंत धाकधुक होती. ती चुकीची नव्हती हे निकालाच्या दिवशी स्पष्ट झालं.

भाजपने किती युती धर्म पाळला ते स्पष्ट होतं

गोकुळ गीते या अपक्ष उमेदवाराच्या विजयातून भाजपने किती युती धर्म पाळला ते स्पष्ट होतं. कारण नाशिकमध्ये भाजपचं बळ जास्त आहे. त्यामुळे त्यांचे सदस्य कोणाच्या बाजूने मतदान करणार त्यावर विजयाच पारडं झुकणार होते. भाजप सदस्यांनी त्यांच्याशी संबंधित असलेल्या गोकुळ गीते यांना मतदान केल्याचे स्पष्ट होतय. गोकुळ गीते यांनी नरेंद्र दराडे यांना पाठिंबा द्यावा यासाठी गिरीश महाजन आणि उदय सामंत यांनी त्यांच्या बऱ्याच नाकदुऱ्या काढल्या. पण त्यात यश आलं नाही हेच आजच्या निकालावरुन दिसलं. गोकुळ गीते यांनी नरेंद्र दराडेंना पाठिंबा जाहीर करावा ही मागणी त्यांनी मान्य केली नाही. त्यांनी फक्त प्रचार थांबवला. पण पडद्याआडून प्रचार सुरुच होता, हे निकालावरुन स्पष्ट झालं आहे.

Follow Us
अखेर तेच घडलं! नाशिकमध्ये महायुतीतील नेत्यांमध्ये बिनसलं; नरेंद्र दराड
अखेर तेच घडलं! नाशिकमध्ये महायुतीतील नेत्यांमध्ये बिनसलं; नरेंद्र दराडे म्हणाले, शिंदेच...
नाशिकमध्ये राजकीय भूकंप! अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांचा मोठा विजय
Nashik Gokul Gite | नाशिकमध्ये राजकीय भूकंप! अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांचा मोठा विजय, महायुतीला धक्का
अखेर ठरलं! ओमराजे निंबाळकरांचा ठाकरे गटाला रामराम, शिंदे गटात...
tv9 Marathi Special Report | अखेर ठरलं! ओमराजे निंबाळकरांचा ठाकरे गटाला रामराम, शिंदे गटात प्रवेश निश्चित
विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी मतमोजणीला सुरुवात!
Nagpur Vidhan Parishad | विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी मतमोजणीला सुरुवात!; महायुतीचे वर्चस्व कायम राहणार की उलटफेर होणार?
ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत राऊतांचा संताप
Sanjay Raut EXCLUSIVE | ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत संजय राऊतांचा संताप
राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही...
Sushma Andhare | राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही भ्रमात नाही...
धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या निर्णयाने बदलणार राजकीय गणित
Omraje Nimbalkar | धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या एका निर्णयाने बदलणार राजकीय गणित, घडामोडींना वेग
गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट
Viral Photos | गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट
सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट
Jayant Patil UNCUT | सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट; भ्रष्टाचारावरून घणाघात!
एल निनो, दुष्काळ आणि लाडकी बहीण... जाधवांनी अधिवेशनाआधीच सरकारला घेरलं
Bhaskar Jadhav UNCUT | एल निनो, दुष्काळ आणि लाडकी बहीण...भास्कर जाधवांनी अधिवेशनाआधीच फडणवीस सरकारला घेरलं!