AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RSSने ठरवलं तर मोदींचं सरकार 15 मिनिटंही सत्तेत राहणार नाही – संजय राऊत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पडद्यामागे राहू नये, प्रवचन न झोडता या देशाच्या जनतेला दिशा द्यावी. RSSने ठरवलं तर मोदींचं सरकार 15 मिनिटंही सत्तेत राहू शकणार नाही, असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले. माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपवर तसेच मोदींवर टीकास्त्र सोडलं.

RSSने ठरवलं तर मोदींचं सरकार 15 मिनिटंही सत्तेत राहणार नाही - संजय राऊत
संजय राऊतImage Credit source: ANI
| Updated on: Jun 14, 2024 | 11:03 AM
Share

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पडद्यामागे राहू नये, प्रवचन न झोडता या देशाच्या जनतेला दिशा द्यावी. RSSने ठरवलं तर मोदींचं सरकार 15 मिनिटंही सत्तेत राहू शकणार नाही, असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले. माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपवर तसेच मोदींवर टीकास्त्र सोडलं. भाजपचं सध्याचं जे मोदींचं सरकार आहे ते अहंकारी सरकार आहे. त्याला सुरुंग लावण्याचं काम जर त्यांची मातृसंस्था ( आरएसएस) करत असेल तर ते राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत आहेत, असं मी मानतो, असंही राऊत म्हणाले.

काय म्हणाले संजय राऊत ?

लोकसेवकाला अहंकार नसावा, असं काल सरसंघचालक मोहन भागवतही म्हणाले. पण गेल्या 10 वर्षांत या देशात फक्त अहंकार, इर्षा, बदल्याचं राजकारण हेच पहायला मिळालं. सत्तेचा गैरवापर झाला. आणि या सगळ्या गोष्टी भाजपची मातृसंस्था असलेली आरएसएस पहात होती. 10 वर्षांत आपल्या सगळ्यांनाच आरएसएसकडून खूप अपेक्षा होत्या, की संघाचे प्रमुख लोक हे निर्भयपणे समोर येतील आणि या बदल्याचे राजकारण, अहंकाराच्या राजकारणाला रोखण्याचा प्रयत्न करतील, असे देशातील जनतेची, विरोधकांची अपेक्षा होती. पण तसं काहीच झालं नाही.

जेव्हा १९७५ साली आणीबाणी घोषित झाली तेव्हा तत्कालीन सरसंघचलाकांनी त्या आणीबाणीचा विरोध केला होता. या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी संघाच्या काही लोकांनी अमूल्य योगदान दिले, त्यासाठी ते तुरूंगातही गेले. पण गेल्या १० वर्षांत अतिशय विरुद्ध परिस्थिती पहायला मिळाली. मात्र अहंकाराचे हे राजकारण जनतेने रोखलं आहे. येत्या काळात आरएसएसची भूमिका राहील आणि सत्तेवर जे अहंकारी नेते बसले आहेत, त्यांना तुम्ही लौकरच सत्तेवरून दूर करण्याचा प्रयत्न कराल, असा आम्हाला विश्वास आहे, अशा शब्दात राऊत यांनी सुनावले.

अण्णा हलले, अण्णा बोलले , मी अभिनंदन करतो

अण्णा हजारे जागे झाले त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. राळेगणसिद्धीमध्ये अजित पवारांविरोधात हालचाल सुरू झाली. अण्णा हलले, अण्णा बोलले या बद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि अभिनंदन करतो. पण या महाराष्ट्रात फक्त शिखर बँक घोटाळा झालेला नाही. गेल्या १० वर्षांत राज्यात आणि देशात घोटाळेच घोटाळे झाले आहेत. घोटाळ्यांचा पाऊस सुरू झाला आहे. अण्णांनी त्या इतर घोटाळ्यांविरोधातही आवाज उठवला पाहिजे, अशी मागणी राऊत यांनी केली.

ही बातमी अपडेट होत आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.