AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज जरांगे यांनी माघार घेताच ठाकरे गटाची सर्वात आधी प्रतिक्रिया; संजय राऊत यांच्याकडून त्या गोष्टीचा उल्लेख

मराठा आंदोलनक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मागच्या अनेक दिवसांपासून उमेदवारांच्या निवडीसाठी खल सुरु होता. पण आता मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांच्या या निर्णयावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मनोज जरांगे यांनी माघार घेताच ठाकरे गटाची सर्वात आधी प्रतिक्रिया; संजय राऊत यांच्याकडून त्या गोष्टीचा उल्लेख
मनोज जरांगे यांनी माघार घेताच ठाकरे गटाची प्रतिक्रिया
| Updated on: Nov 04, 2024 | 11:37 AM
Share

मराठा आंदोलनक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.  गेल्या अनेक दिवसांपासून उमेदवारांच्या निवडीसाठी खल सुरु होता. पण आता मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांच्या या निर्णयावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सर्वात आधी प्रतिक्रिया दिली आहे. ‘  जरांगेचा संघर्ष समाजासाठी आहे. समाज त्यांच्या पाठिशी आहे. त्यांच्या लढ्याला आमचा पाठिंबा आहे’ असं संजय राऊत म्हणालेत.

मनोज जरांगे पाटील यांचा सातत्याने महाराष्ट्रात जो संघर्ष सुरू आहे, तो त्यांच्या समाजाच्या विकासासाठी, उद्धारासाठी आहे. आणि त्यासाठी त्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावली, हे मान्य केलं पाहिजे. समाज त्यांच्या पाठिशी एकसंघपणे उभा आहे. निवडणुकीसंदर्भात काय भूमिका घ्यावी हा त्यांचा प्रश्न आहे.  त्यांचा जो लढा आहे तो राजकीय नव्हे , सामाजिक आहे अस आम्ही मानतो. ती एक सामाजिक चळवळ आहे. त्यामुळे जरांगे यांनी काय आणि कशी भूमिका घ्यावी, याचं मार्गदर्शन आम्ही करणार नाही. त्यांच्या लढ्याला आमच्या कायम शुभेच्छा आणि पाठबळ असेल, असं राऊत म्हणाले.

एकाच जातीवर निवडणूक लढवणं शक्य नाही

मुस्लीम आणि दलित समाजाच्या प्रतिनिधींकडून यादी न आल्याने आपण लढणार नाही, असं जरांगे यांनी सांगितलं. आमच्या मित्र पक्षाची आणखी यादी आली नाही. लढायचं जमेल का? यादीच नाही म्हणल्यावर… एका जातीवर कस निवडून यायचं, त्यामुळे नाईलाज आहे. यादी न आल्यामुळे नाईलाजाने एका जातीवर जिंकणे शक्य नाही त्यामुळे थांबून घेतलेलं बरं राहीन, असं मनोज जरांगे म्हणाले होते.

23 तारखेला अणुबॉम्ब फुटू दे

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला दणक्यात सुरूवात झाली आहे. येत्या 23 तारखेला ॲटम बॉम्ब फुटेल असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत. त्यावर संजय राऊत यांनी चोख प्रत्युत्तर दिलं. 23 तारखेला ॲटम बॉम्ब कशाला पाहिजे अणू बॉम्ब फुटू दे ना ! पाद्रे पावटे काय फोडणार अजून ?

पाद्रे वापटे आजूबाजूला दुर्गंधी निर्माण करतात, तशी महाराष्ट्रात अडीच वर्षांपासून सुरूच आहे. ॲटम बॉम्ब फुटेल म्हणजे काय करणार ? अजून काय करणार ?  नरेंद्र मोदी काय त्यांच्या गटात प्रवेश करणार आहेत का ? स्वप्न पहायला 50 खोके लागत नाहीत, असा खोचक टोला राऊत यांनी लगावला.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.