AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“शिंदे उद्या राष्ट्रपती पदही मागतील, पण दिल्लीने डोळे वटारले की…”, संजय राऊतांचा टोला

एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रिपदासह तब्बल १२ मंत्रि‍पदाची मागणी केली आहे. मात्र याला भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून स्पष्ट नकार देण्यात आला आहे. आता यावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. त्यातच या मुद्द्यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. 

शिंदे उद्या राष्ट्रपती पदही मागतील, पण दिल्लीने डोळे वटारले की..., संजय राऊतांचा टोला
एकनाथ शिंदे, संजय राऊत Image Credit source: ANI
| Updated on: Nov 29, 2024 | 10:36 AM
Share

Sanjay Raut On Eknath shinde : महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सध्या मुंबईसह दिल्लीत महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेवर विविध बैठका, चर्चासत्र रंगताना दिसत आहेत. त्यातच काल झालेल्या दिल्लीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. तर दुसरीकडे याच बैठकीत एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रिपदासह तब्बल १२ मंत्रि‍पदाची मागणी केली आहे. मात्र याला भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून स्पष्ट नकार देण्यात आला आहे. आता यावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. त्यातच या मुद्द्यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.

संजय राऊत यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना एकनाथ शिंदेंच्या गृहमंत्रिपदाच्या मागणीवर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना जबरदस्त टोला लगावला. “एकनाथ शिंदे, अजित पवार यांना जे हवंय ते त्यांना कधीच मिळणार नाही. अजित पवार, एकनाथ शिंदे यांचा स्वाभिमान राहिलेला नाही. त्यांनी शरणागती घेतली”, असे संजय राऊत म्हणाले.

“महाराष्ट्राचे नेतृत्व त्यांच्यासमोर मान झुकवून उभं”

“महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असावं, महाराष्ट्रातील प्रशासन कसं असावं, पोलीस महासंचालक कोण असावं, मुंबई पोलीस आयुक्त कोणं असाव, महाराष्ट्राच्या कोणत्या नेत्याकडे कोणती खाती असावीत, महाराष्ट्रातील कोणता व्यापार कोणी करावा हे सर्व मोदी शाह दिल्लीतून ठरवतात. आमच्या महाराष्ट्राचे नेतृत्व त्यांच्यासमोर मान झुकवून उभं आहे आणि जी हुजर करत आहेत”, असे संजय राऊतांनी म्हटले.

“पदांचं वाटप कसं करावं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न”

“महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जर महाराष्ट्रात ठरवला जात नसेल तर महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमानाच्या गोष्टी या सरकारने करु नये. सध्या ते तीन पक्ष एकत्र आहेत. त्यांच्या पक्षाला ५० पेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. अजित पवारांना ४० पेक्षा जागा मिळाल्या आहेत. भाजपला १३० पेक्षा जास्त जागा मिळाल्या. पदांचं वाटप कसं करावं हा त्यांच्या अंतर्गत प्रश्न आहे”, असेही संजय राऊतांनी म्हटले.

“महाराष्ट्र कमजोर करून झालेला आहे”

“एकनाथ शिंदे हे उद्या संरक्षण मंत्रीपदही मागू शकतात. ते उद्या राष्ट्रपती, उपराष्ट्रपती पद मागू शकतात. माणसं चर्चेत काहीही मागू शकतात. त्यांचं काही मनावर घेऊ नका. एकदा दिल्लीने डोळे वटारले की त्यांना गप्प बसावं लागतं. अजित पवार, एकनाथ शिंदे यांचा स्वाभिमान राहिलेला नाही. त्यांनी शरणागती घेतली. त्यांना जे हवंय ते ते मागतील आणि नाही मिळालं तर सरकारमध्ये पडून राहतील. एकनाथ शिंदे, अजित पवार यांना जे हवंय ते त्यांना कधीच मिळणार नाही. भाजपला जे काम करून घ्यायचं होतं ते झालेलं आहे. महाराष्ट्र कमजोर करून झालेला आहे. जर उद्या भविष्यात यांचे पक्ष फुटले तर आश्चर्य वाटू नये”, असेही संजय राऊत म्हणाले.

Follow Us
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं.
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय...
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय....
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं.
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक..
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत....
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर.
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही.
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक.
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले....
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले.....
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर...
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर....