AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज-उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं का?; अजितदादांनी असं दिलं उत्तर

AI टेक्नॉलॉजी वापर चांगला होऊ शकतो तेवढाच चुकीचा पण होऊ शकतो, यामुळेच बाळासाहेब ठाकरे यांचा आवाजाचा वापर झाला पण सर्वांना माहित आहे त्यांचा मृत्यू झाला आहे, लोक समजूतदार आहेत असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

राज-उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं का?; अजितदादांनी असं दिलं उत्तर
ajit pawar, raj thackeray and uddhav thackeray
| Updated on: Apr 19, 2025 | 10:37 PM
Share

राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात समेट घडणार का? अशी चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. राज ठाकरे यांनी एका पॉडकास्टमध्ये जर महाराष्ट्राचे कल्याण होणार असेल कौटुंबिक भांडणासारख्या शुल्लक गोष्टी मी विसरुन जाईन असे म्हटल्याने पुन्हा एकदा हे ठाकरे बंधू एकत्र येतात का ? याविषयी आज दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा झडू लागल्या आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर राष्ट्रवादीचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे.

सातारा येथील फलटण विधानसभा मतदारसंघांमध्ये आज आम्ही पिंपोडे गावात आज शेतकरी मेळावा घेतला होता.गेल्या शंभर दिवसांमध्ये आमच्या सरकारने काय काम केले आणि पुढील उद्दिष्ट काय आहे. याविषयी मेळाव्यात चर्चा करण्यात आली आहे. यानंतर ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडके यांच्या वाढदिवसानिमित्त साताऱ्यातील एका कार्यक्रमात अजितदादांनी हजेरी लावली. त्यानंतर मी उंडाळकर यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेची परंपरा ही अशीच अखंड अबाधित बँकेचे चेअरमन तथा खासदार नितीन पाटील यांनी ठेवली आहे. याबाबत मी समाधान व्यक्त केलं. सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलून या बँकेच्या निगडित काही प्रश्न असतील ते सोडवणार आहे असेही अजित पवार यांनी सांगितले.

राज आणि उद्धव ठाकरे यांचा समेट

राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याविषयी अजित पवार यांना विचारता ते म्हणाले की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकाच कुटुंबातील आहे, त्यांनी काय करावे हे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यामध्ये आपण काय करणार.? यामध्ये पत्रकारांना काय त्रास आहे ? दोघेही पक्ष चालवतात, याबाबत दोघांनी काय निर्णय घ्यावा हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. दोघांनी एकत्र यावं यावर कोणी राजकीय पक्षांनी बोलण्याचं कारण नाही असेही अजित पवार यांनी सांगितले. माझं एकच मत आहे, सद्सद विवेकबुद्धीला पटेल असे दोघांनी निर्णय घ्यावेत असेही अजितदादा यावेळी म्हणाले.

माझ्या पक्षाची काळजी तुम्ही करु नका

अजित पवार पुढे म्हणाले की रामराजे नाईक निंबाळकर यांनी मला फोन करून सांगितले त्यांच्या पत्नीची तब्येत ठीक नाही. असा मला येता येणार नसल्याचा निरोप त्यांनी दिला आहे. त्यामुळे माझ्या पक्षाची काळजी तुम्ही पत्रकारांनी करू नये आणि तुमच्या पत्रकारितेची काळजी घ्या असा टोलाही अजितदादांनी यावेळी लगावला.

सुप्रीम कोर्टाचा निकाल लवकर लागो

जनतेचा पाठिंबा असेल तर आमचा राष्ट्रवादी नक्कीच वाढेल. या पुढील काळात देखील जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका या निवडणुकीबाबत देखील सर्वजण डोळे लावून बसले आहेत, पण सुप्रीम कोर्टाचा निकाल लवकर मिळावा अशी अपेक्षा आहे. हा निकाल लागला तर आम्हाला पण निवडून आलेली ही टीम मदतीला मिळते असेही अजितदादा यावेळी म्हणाले.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.