AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बालाजीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला, भीषण अपघातात सोलापूरच्या तिघा भक्तांचा मृत्यू

चालकाचा जीपवरील ताबा सुटला आणि गाडी महामार्गाच्या सुरक्षा कठड्याला धडकून मोठा अपघात झाला.

बालाजीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला, भीषण अपघातात सोलापूरच्या तिघा भक्तांचा मृत्यू
| Updated on: Feb 17, 2020 | 11:21 AM
Share

सोलापूर : तिरुपती बालाजीच्या दर्शनाला निघालेल्या सोलापुरातील भक्तांवर काळाने घाला घातला. तेलंगणात झालेल्या जीपच्या भीषण अपघातात तिघा भक्तांचा मृत्यू (Solapur Pilgrims Telangana Accident) झाला, तर तिघांची प्रकृती गंभीर आहे. दोन बालकांसह पाच जण किरकोळ जखमी आहेत.

तेलंगणातील वनपरती जिल्ह्यातील कोत्ताकोटाजवळ रविवारी संध्याकाळी हा अपघात झाला. अपघातात 25 वर्षीय सपना राजू कुनी, 50 वर्षीय शारदा कुनी, 45 वर्षीय दत्तात्रय धुळम या तिघांना प्राण गमवावे लागले.

कृष्णाहरी कुनी, यल्लप्पा कुनी, शैलेश धुळम, श्रेयस धुळम, कृष्णा कुनी, राजू कुनी, भक्ती कुनी हे सात जण अपघातात जखमी आहेत.

हेही वाचा : अस्थीविसर्जनाहून परतताना अपघात, यवतमाळमध्ये सात जणांचा मृत्यू

सोलापुरातील पूर्व भागात राहणारे धुळम आणि घरकुल परिसरात राहणारे कुनी कुटुंबातील सदस्य तिरुपती येथील बालाजीच्या दर्शनासाठी निघाले होते. कोत्ताकोटा भागात चालकाचा जीपवरील ताबा सुटला आणि गाडी महामार्गाच्या सुरक्षा कठड्याला धडकून मोठा अपघात झाला.

अपघातातील जखमींना स्थानिकांनी बाहेर काढून हैदराबाद आणि मेहबूब नगरला उपचारासाठी पाठवले. या अपघाताची नोंद तेलगंणातील कोत्ताकोटा पोलिस स्थानकात करण्यात आली (Solapur Pilgrims Telangana Accident) आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.