AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“खारघरमधील दुर्घटनेप्रकरणी आप्पासाहेब धर्माधिकारी यांना अटक करुन गुन्हा दाखल करा”; नेमका आरोप कुणाचा…

छत्रपती शिवाजी महाराज,फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राच्या काँग्रेस-राष्ट्रवादी-भाजप, शिवसेना या पक्षांनी रामदासी संप्रदायाचे विचार लादण्याचे काम केले आहे. त्यामुळे आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण देऊन शिवसेना भाजप सरकारने महाराष्ट्राचा व थोर महापुरुषांचा घोर अपमान केला आहे

खारघरमधील दुर्घटनेप्रकरणी आप्पासाहेब धर्माधिकारी यांना अटक करुन गुन्हा दाखल करा; नेमका आरोप कुणाचा...
| Edited By: | Updated on: Apr 20, 2023 | 10:48 PM
Share

सोलापूर : आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार खारघरमध्ये प्रदान करत असताना उष्माघाताचा त्रास होऊन 14 साधकांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. त्यानंतर राज्यात सत्ताधारी विरूद्ध विरोधकांनी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत त्या गोष्टीवरून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावरूनच इतिहासकार श्रीमंत कोकाटे यांनी सत्ताधाऱ्यांसह ज्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला त्यांनाही धारेवर धरले आहे. डॉ. श्रीमंत कोकाटे हे एवढ्यावरच न थांबता त्यांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यामुळेच 14 लोकांचा जीव गेला असून, त्यांच्या मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी खारघरमधील घटना दुर्देवी घटना घडल्यानंतर मृतांविषयी संवेदना व्यक्त करून त्यांनी श्रीसेवकांच्या मृत्युस आप्पासाहेब धर्माधिकारी हेच जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

या कार्यक्रमामध्ये निष्पाप लोकांचा मृत्यू झाल्याने -आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करुन अटक करावी अशी मागणीही श्रीमंत कोकाटे यांनी केली आहे.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रम हा धर्माधिकारी यांच्या अट्टाहासामुळे कार्यक्रम दुपारी घेण्यात आला. त्यांच्या या हट्टाहासामुळेच साधकांच्या हत्याही झाल्या असल्याचा गंभीर आरोप करत सांधकाचे झालेले मृत्यू हे नैसर्गिक नसून हत्या झाल्या आहेत असा गंभीर आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

महाराष्ट्र सरकारला जर मृत्यू झालेल्या श्रीसेवकांविषयी आपुलकी असेल तर पोलीस खात्याने धर्माधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

छत्रपती शिवाजी महाराज,फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राच्या काँग्रेस-राष्ट्रवादी-भाजप, शिवसेना या पक्षांनी रामदासी संप्रदायाचे विचार लादण्याचे काम केले आहे. त्यामुळे आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण देऊन शिवसेना भाजप सरकारने महाराष्ट्राचा व थोर महापुरुषांचा घोर अपमान केला आहे असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

43 अंश सेल्सिअस तापमान असतानादेखील श्री सेवकांना 7 तास पाणीदेखील दिले गेले नाही. तर पुरस्कार वितरण करणारे मात्र राज्यकर्ते एकाच मंचावर एसीमध्ये उपस्थित होते असा टोला त्यांनी आयोजकांना लगावला आहे.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.