AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केल्यालं मतदान कुठं गेलंय ते आम्ही हुडाकतुय…; मारकडवाडीतील ग्रामस्थ संतापले

Markadvadi Villagers Reaction About Voting : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा क्षेत्रातील मारकडवाडी गावात आज बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात येणार आहे. या गावातील लोकांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे. वाचा सविस्तर बातमी....

केल्यालं मतदान कुठं गेलंय ते आम्ही हुडाकतुय...; मारकडवाडीतील ग्रामस्थ संतापले
मारकडवाडीत मतदान होणारImage Credit source: tv9
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Dec 03, 2024 | 10:22 AM
Share

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी गावातील नागरिकांनी आज पुन्हा एकदा मतदान प्रक्रिया राबवण्याचं ठरवलं आहे. मारकडवाडी गावात आज बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात येणार आहे. माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांच्या समर्थकांनी हा निर्णय घेतला आहे. मात्र या मतदान प्रक्रियेला प्रशासनाने विरोध केला आहे. मारकडवाडी गावात जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. तरिही मारकडवाडी गावातील नागरिक मतदानासाठी दाखल झाले आहेत. यावेळी एका वयस्कर आजोबांनी मनातील खंत बोलून दाखवली. 20 तारखेला मतदान झालं पण आमच्या मनासारखं झालं न्हायी म्हणून आम्ही हितं बसलुया… पहिल्या पासनं मारकडवाडीचं मतदान चांगलं हुतं आण आता ह्या बारीनं चांगलं झालं न्हाय. म्हणूनच आम्ही मतदान घितुया, असं एका वयस्कर आजोबांनी म्हटलं.

आजोबांचं म्हणणं काय?

पुलिसांच्या काय बापाचं भ्या हाय. आमचं मतदान हाय. आम्हाला मतदान कराचंच हाय. आम्ही पुलिसाला भितू व्हय तव्हा…. आम्हाला आडवलं. मारलं तरी मी मतदान करणार हाय. आमची चीड का, तर आमचं लीडवर गाव असताना आमचं मतदान कुठं गेलंय ती मतदान आम्ही हुडाकतुय, असंही ते म्हणाले. माझं वय 80 च्या वर झालंय. पहिल्यापासनं मतदान केलंय. इंदिरा गांधीच्या काळापासनं मतदान करतुया. आम्हाला मतदान कसं करायचं ते शिकायला 15 दिवस लागलं हुतं… आसं शिकून मतं दिल्यातीया आण आता ही आलं अन् बटान दाबलं की कुठं मतदान गेलंय ते आम्हाला काय माहितीय तव्हा, असंही या आजोबांनी म्हटलं आहे.

मारकडवाडी गावात ज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. गावात आधीपासून उत्तमराव जानकर यांना मानणारा वर्ग मोठा आहे. याआधीच्या निवडणुकांमध्ये उत्तमराव जानकर यांना सर्वाधिक मतं मिळालेली आहेत. मात्र यंदा पहिल्यांदाच भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना जास्त मतं मिळाली. त्यामुळे मारकडवाडीच्या नागरिकांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला. या गावात आज पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर मतदान होणार आहे.

मारकडवाडीत बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया दहा मिनिटात सुरू होणार आहे. संविधान वाचविण्यासाठी मारकडवाडीत बॅलेट पेपरवर मतदानप्रकिया राबविणार आहेत. आमदार उत्तम जानकर यांचे कार्यकर्ते भानुदास सालगुडे पाटील म्हणाले आहेत.

Follow Us
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?
खाडकन उघडले धरणाचे 4 दरवाजे, तापी नदीपात्रात भयंकर विसर्ग सुरू, काळजी
खाडकन उघडले धरणाचे 4 दरवाजे, तापी नदीपात्रात भयंकर विसर्ग सुरू, काळजी घेण्याचे आवाहन!
राजकारणात मोठा ट्विस्ट! ठाकरे सेना-शिंदे सेना-भाजप एकाच मंचावर
राजकारणात मोठा ट्विस्ट! ठाकरे सेना-शिंदे सेना-भाजप एकाच मंचावर; औरंगाबादमध्ये नवं समीकरण
एकच खळबळ! माणूस मॅनहोलमध्ये कसा काय पडला? CCTV तून धक्कादायक माहिती
एकच खळबळ! माणूस मॅनहोलमध्ये कसा काय पडला? CCTV तून धक्कादायक माहिती समोर
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट खोल मॅनहोलमध्ये...
आता ऑपरेशन तुतारी! कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट
Sanjay Shirsat On Amol Kolhe | ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी! अमोल कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट, म्हणाले...
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक सियाच्या घरी पोहोचलं, पुढे काय घडलं?
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन अहिर असं काय म्हणाले?