AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sambhaji Bhide : संभाजी भिडे समर्थकांवर लाठीचार्ज, सोलापूरमध्ये तणावाचं वातावरण

संभाजी भिडेंनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सर्वत्र त्यांच्याविरोधात निदर्शने करण्यात येत आहेत. मात्र भिडे समर्थक त्यांच्या फोटोला दुग्धाभिषेक घालत असल्याचं पाहायला मिळत आहे. सोलापूरमध्येही भिडे समर्थक जमले असताना त्यांच्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे.

Sambhaji Bhide : संभाजी भिडे समर्थकांवर लाठीचार्ज, सोलापूरमध्ये तणावाचं वातावरण
| Updated on: Aug 02, 2023 | 5:59 PM
Share

सोलापूर : शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राज्यभर त्यांचा निषेध केला जात आहे. तर दुसरीकडे संभीजी भिडे यांचे समर्थक त्यांना समर्थन देताना दुग्धाभिषेक घालत आहेत. अशाच प्रकारे सोलापुरमध्ये भिडेंच्या समर्थकांकडून पोलीस प्रशासना विरोधात आंदोलन करण्यात आलं होतं. फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्येच भिडे समर्थकांनी घोषणाबाजी केली. या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. त्यासोबतच भिडे समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी, साई बाबा, महात्मा फुले आणि बाहेर राज्यातील समाजसेवकांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्याविरोधात राज्यभर निदर्शने करण्यात येत आहेत. त्यासोबतच त्यांना अटक करण्याची मागणीही केली जात आहे.

विधानसभेतही संभाजी भिंडेंच्या अटकेची मागणी

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्येही संभाजी भिडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी, संभाजी भिडे जिथे असतील तिथून त्यांना उलचून अटक करण्याची मागणी केलीये. तर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. सरकार भिडेंना संरक्षण देत असल्याचं वाटत आहे, असं आव्हाड म्हणाले.

यशोमती ठाकूर यांनी संभाजी भिडेंना अटक करण्याची मागणी केली होती. त्यानंतर यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. आजही पत्रकारांशी बोलताना, माझ्यासोबत काही बर-वाईट झालं तर त्याला जबाबदार कोण असा सवाल ठाकूर यांनी केला.

दरम्यान, संभाजी भिडेंबाबत शासनाने ठाम भूमिका घ्यावी, इतिहासामध्ये गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं ठाकरे गटाचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.