AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Crime | बीडच्या दाम्पत्यावर 15 ते 20 जणांच्या टोळक्याचा शस्त्रधारी हल्ला; नेमकं काय घडलं?

प्रवासादरम्यान उस्मानाबाद येथे दाम्पत्यावर15 ते 20 जणांच्या टोळक्याने हल्ला केला. चारचाकी वाहनाच्या काचा फोडत त्या दोघांनाही गाडीतून खाली खेचल. त्यानतंर पीडित महिलेच्या ओढणीला धरून मारहाण केली. त्यानंतर तिच्या गळ्यातले हिसकावले. दोघांकडूनही मोबाईल काढून घेतले. हल्लेखोरांकडं बिअरच्या बॉटलसह काठ्या, कोयते यासारखी हत्यारे होती अशी माहिती पीडित महिलेनं दिली आहे.

Crime | बीडच्या दाम्पत्यावर  15 ते 20 जणांच्या टोळक्याचा शस्त्रधारी हल्ला; नेमकं काय घडलं?
Attack On Couple in SolapurImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 20, 2022 | 5:22 PM
Share

सोलापूर – सोलापुरवरून बीडकडे येत असताना उस्मानाबादच्या वाशीजवळ वाहन अडवून बीडच्या (Beed) दाम्पत्यावर शस्त्रधारी हल्ला (Armed attack) करण्यात आलाय. घटना 18 मार्च रोजी सायंकाळी घडलीय. रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या 15 ते 20 जणांनी गाडीवर हल्ला चढविला. एवढंच नाही तर दोघा पती-पत्नीला   अमानुष मारहाण केली. या घटनेत वर्षा बडे आणि विलास बडे हे गंभीर जखमी झाले आहेत. रस्त्यावरून जाणाऱ्या दोघेजण मदतीसाठी आले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. काही वेळानंतर पोलीस दाखल झाले तेंव्हा आरोपींनी पलायन केले. पोलिसांनी (Police) जखमींना रुग्णालयात दाखल केले. आरोपीत महिलांचाही समावेश आहे. विलास बडे हे बीडमध्ये अधिकारी आहेत.

अशी घडली घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोलापूरहून बडे दांम्पत्य बीडकडे निघाले होते. प्रवासादरम्यान उस्मानाबाद येथे दाम्पत्यावर15 ते 20 जणांच्या टोळक्याने हल्ला केला. चारचाकी वाहनाच्या काचा फोडत त्या दोघांनाही गाडीतून खाली खेचल. त्यानतंर पीडित महिलेच्या ओढणीला धरून मारहाण केली. त्यानंतर तिच्या गळ्यातले हिसकावले. दोघांकडूनही मोबाईल काढून घेतले. हल्लेखोरांकडं बिअरच्या बॉटलसह काठ्या, कोयते यासारखी हत्यारे होती अशी माहिती पीडित महिलेनं दिली आहे. याच दरम्यान हल्लेखोरांनी पीडितांच्या मदतीला आलेल्या दोघांनाही मारहाण केली. मदत करणाऱ्या लोकांनी 112 नंबरल कॉल केला. त्यानंतर पोलीस घटनास्थळावर दाखल झाले. हल्ला करणाऱ्या काही लोकांना तब्यत घेतले. मात्र काहीजण पळून जाण्यात यशस्वी झाले आहे. मात्र पोलिसांच्या सहकार्यामुळे आमचा जीव वाचल्याची माहिती पीडितांनी दिली आहे. या घटनेतील काही आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Kolhapur North Assembly election : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीच्या मैदानात करूणा शर्मा, पंढरीतून फुंकलं रणशिंग

काश्मिरी पंडितांच्या विस्थापनासाठी पाकिस्तान आणि दहशतवाद जबाबदार, गुलाम नबी आझाद यांचा दावा

धुळवड खेळणाऱ्यांची मजा, रिक्षातून जाणाऱ्यांना फुकटची सजा! पाण्यानं भरलेला फुगा रिक्षावर भिरकावला आणि…

Follow Us
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात.
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.