AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“सरकार मायबाप, पावसाआधी आमची शाळा दुरुस्त करा”; विद्यार्थ्यांचा अधिकाऱ्यांसमोर टाहो…

शाळेची दुरवस्था झाल्यामुळेच संतप्त विद्यार्थी आणि पालकांनी साईओंची भेट घेऊन शाळा दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी आम्हाला पावसाळा सुरु होण्याआधी चार वर्ग खोल्या बांधून देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

सरकार मायबाप, पावसाआधी आमची शाळा दुरुस्त करा; विद्यार्थ्यांचा अधिकाऱ्यांसमोर टाहो...
| Edited By: | Updated on: May 15, 2023 | 6:07 PM
Share

सोलापूर : सध्या मे महिना सुरु असल्याने आणि पावसाळ्याआधी काही इमारतींच्या डागडूजींची कामं सुरु आहेत. मात्र राज्याील काही शाळांची दुरावस्था असल्याने आता पालकांबरोबरच शाळेतील विद्यार्थ्यानीही आपल्या शाळेसाठी प्रशासनाचे दार ठोठावले आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यामधील आळगी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचीही दुरावस्था झाली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या पालकांबरोबरच विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या सीईओंकडे शाळा दुरुस्तीची मागणी करत ते वेळेत पूर्ण झाले नाही तर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. शाळेतील सातवीच्या विद्यार्थ्यांनी सीईओ यांची भेट घेऊन आपल्या शाळेबद्दलची झालेली दुरवस्था सांगितल्याने आळगी शाळा आता राज्यभरात चर्चेत आली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील आळगीमधील शाळेचा स्लॅबमधून पावसाचे पाणी गळत असते. त्यामुळे येत्या पावसाळ्यात तरी शाळेची इमारत दुरुस्त करुन द्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

शाळेच्या इमारतीची अवस्था वाईट झाल्यामुळेच सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी त्या दुरावस्थेविरोधात साईओंचे कार्यालय गाठले आहे. त्यामुळे या घटनेची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

गेल्या काही दिवसांपासून शाळेची अवस्था दयनीय झाली होती. त्यामुळे पालकांतून चिंता व्यक्त केली जात होती. यावर्षी अनेक वेळा अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यावेळीही अनेक वेळा शाळेत पावसाच्या पाण्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय झाली होती.

याबाबत अनेक वेळा शाळा दुरुस्त करण्याची मागणी करुनही प्रशासनाकडून दुर्लक्षे केले गेल्याने विद्यार्थी व पालकांनी जिल्हा परिषदेच्या सीईओंची थेट भेट घेतली आहे.

आळगी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेची मोठ्याप्रमाणात दुरावस्था झाली आहे. विद्यार्थी ज्या वर्गात बसतात त्या खोल्यांचे स्लॅब आता कोसळण्याच्या मार्गावर असल्याची तक्रार विद्यार्थ्यांसह पालकांनी केली आहे.

पाऊस आला की, संपूर्ण वर्गात पाणी गळती सुरु होते. तसेच वर्गातील स्लॅब केव्हाही कोसळू शकते अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे विध्यार्थी आणि पालकांचा जीव टांगणीला लागला आहे.

शाळेची दुरवस्था झाल्यामुळेच संतप्त विद्यार्थी आणि पालकांनी साईओंची भेट घेऊन शाळा दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी आम्हाला पावसाळा सुरु होण्याआधी चार वर्ग खोल्या बांधून देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे निवेदन दिले आहे. तसेच लवकरात लवकर निर्णय झाला नाही तर आमरण उपोषण करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.